शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

राजकीय नेते वेगळा विदर्भ देऊ शकत नाही; प्रशांत किशोर यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 19:03 IST

Nagpur News राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

ठळक मुद्देविदर्भवाद्यांनी लोकांना आंदोलनाशी जोडावे

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला ७० वर्ष झाली. ज्या राजकीय नेत्यांच्या खांद्यावर विदर्भाच्या आंदोलनाची धुरा दिली त्यांनी आंदोलनाच्या नावावर स्वत:च्या पोळ्या शेकल्या. त्यामुळे राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

‘मिशन ३० राज्य विदर्भ’ या अभियानाअंतर्गत विदर्भाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून किशोर यांची टीम विदर्भाची माहिती संकलित करीत असून, या संदर्भात स्थानिक लोकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. या मिशन अंतर्गत समन्वयकाची जबाबदारी माजी आमदार आशिष देशमुख यांनी घेतली असून, त्यांच्या नेतृत्वात मंगळवारी चिटणवीस सेंटरमध्ये विदर्भावाद्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. फिरदोस मिर्झा, विजया धोटे, माजी आमदार चरण वाघमारे, सेवक वाघाये, ॲड. मुकेश समर्थ, प्रदीप माहेश्वरी, अहमद कादर उपस्थित होते. बैठकीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून विदर्भवादी सहभागी झाले होते. प्रशांत किशोर यांनी बैठकीत सहभागी लोकांच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

- मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे

वेगळा विदर्भ होऊ शकतो. त्यामागची कारणे वेगवेगळी आहे. आतापर्यंत आंदोलन झाले; पण त्याला का यश आले नाही. नव्या आंदोलनासाठी वेगळा पक्ष, वेगळा मंच स्थापन करावा, नेतृत्व कुणाला द्यावे, याबाबत कुठलेही नियोजन अजून केले नाही. मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे. त्या माहितीला एका साच्यात बसवून, हे आंदोलन कसे पुढे नेता येईल, याची रणनीती लवकरच आखणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

- जून २०२३ पर्यंत ॲक्टिव्ह सदस्य जोड

या आंदोलनात मी आपली शक्ती व बुद्धी लावणार आहे. सुरुवातीला ५० लोकांची वर्किंग ग्रुप कमिटी बनवायची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतून एक सदस्य या आंदोलनाशी जोडायचा आहे. विदर्भातून १० हजार ॲक्टिव्ह लोकं जुळल्यानंतर एक जॉईंट ॲक्शन कमिटी स्थापन करायची आहे. त्यासाठी पुढच्या २३ जून पर्यंत १० हजार ॲक्टिव्ह लोकांना आंदोलनाशी जोडा असे आवाहन प्रशांत किशोर यांनी केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ