शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

राजकीय नेते वेगळा विदर्भ देऊ शकत नाही; प्रशांत किशोर यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 19:03 IST

Nagpur News राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

ठळक मुद्देविदर्भवाद्यांनी लोकांना आंदोलनाशी जोडावे

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला ७० वर्ष झाली. ज्या राजकीय नेत्यांच्या खांद्यावर विदर्भाच्या आंदोलनाची धुरा दिली त्यांनी आंदोलनाच्या नावावर स्वत:च्या पोळ्या शेकल्या. त्यामुळे राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

‘मिशन ३० राज्य विदर्भ’ या अभियानाअंतर्गत विदर्भाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून किशोर यांची टीम विदर्भाची माहिती संकलित करीत असून, या संदर्भात स्थानिक लोकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. या मिशन अंतर्गत समन्वयकाची जबाबदारी माजी आमदार आशिष देशमुख यांनी घेतली असून, त्यांच्या नेतृत्वात मंगळवारी चिटणवीस सेंटरमध्ये विदर्भावाद्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. फिरदोस मिर्झा, विजया धोटे, माजी आमदार चरण वाघमारे, सेवक वाघाये, ॲड. मुकेश समर्थ, प्रदीप माहेश्वरी, अहमद कादर उपस्थित होते. बैठकीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून विदर्भवादी सहभागी झाले होते. प्रशांत किशोर यांनी बैठकीत सहभागी लोकांच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

- मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे

वेगळा विदर्भ होऊ शकतो. त्यामागची कारणे वेगवेगळी आहे. आतापर्यंत आंदोलन झाले; पण त्याला का यश आले नाही. नव्या आंदोलनासाठी वेगळा पक्ष, वेगळा मंच स्थापन करावा, नेतृत्व कुणाला द्यावे, याबाबत कुठलेही नियोजन अजून केले नाही. मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे. त्या माहितीला एका साच्यात बसवून, हे आंदोलन कसे पुढे नेता येईल, याची रणनीती लवकरच आखणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

- जून २०२३ पर्यंत ॲक्टिव्ह सदस्य जोड

या आंदोलनात मी आपली शक्ती व बुद्धी लावणार आहे. सुरुवातीला ५० लोकांची वर्किंग ग्रुप कमिटी बनवायची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतून एक सदस्य या आंदोलनाशी जोडायचा आहे. विदर्भातून १० हजार ॲक्टिव्ह लोकं जुळल्यानंतर एक जॉईंट ॲक्शन कमिटी स्थापन करायची आहे. त्यासाठी पुढच्या २३ जून पर्यंत १० हजार ॲक्टिव्ह लोकांना आंदोलनाशी जोडा असे आवाहन प्रशांत किशोर यांनी केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ