शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय नेते वेगळा विदर्भ देऊ शकत नाही; प्रशांत किशोर यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 19:03 IST

Nagpur News राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

ठळक मुद्देविदर्भवाद्यांनी लोकांना आंदोलनाशी जोडावे

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला ७० वर्ष झाली. ज्या राजकीय नेत्यांच्या खांद्यावर विदर्भाच्या आंदोलनाची धुरा दिली त्यांनी आंदोलनाच्या नावावर स्वत:च्या पोळ्या शेकल्या. त्यामुळे राजकीय नेते कधीही विदर्भ वेगळा करू शकणार नाही. त्यासाठी विदर्भवाद्यांनी विदर्भाच्या आंदोलनात लोकांना जोडावे लागेल. तरच या आंदोलनाचा दबाव दिल्लीत वाढेल, असे स्पष्ट मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

‘मिशन ३० राज्य विदर्भ’ या अभियानाअंतर्गत विदर्भाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून किशोर यांची टीम विदर्भाची माहिती संकलित करीत असून, या संदर्भात स्थानिक लोकांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. या मिशन अंतर्गत समन्वयकाची जबाबदारी माजी आमदार आशिष देशमुख यांनी घेतली असून, त्यांच्या नेतृत्वात मंगळवारी चिटणवीस सेंटरमध्ये विदर्भावाद्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ॲड. फिरदोस मिर्झा, विजया धोटे, माजी आमदार चरण वाघमारे, सेवक वाघाये, ॲड. मुकेश समर्थ, प्रदीप माहेश्वरी, अहमद कादर उपस्थित होते. बैठकीला विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून विदर्भवादी सहभागी झाले होते. प्रशांत किशोर यांनी बैठकीत सहभागी लोकांच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

- मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे

वेगळा विदर्भ होऊ शकतो. त्यामागची कारणे वेगवेगळी आहे. आतापर्यंत आंदोलन झाले; पण त्याला का यश आले नाही. नव्या आंदोलनासाठी वेगळा पक्ष, वेगळा मंच स्थापन करावा, नेतृत्व कुणाला द्यावे, याबाबत कुठलेही नियोजन अजून केले नाही. मी फक्त विदर्भाची माहिती घेत आहे. त्या माहितीला एका साच्यात बसवून, हे आंदोलन कसे पुढे नेता येईल, याची रणनीती लवकरच आखणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.

- जून २०२३ पर्यंत ॲक्टिव्ह सदस्य जोड

या आंदोलनात मी आपली शक्ती व बुद्धी लावणार आहे. सुरुवातीला ५० लोकांची वर्किंग ग्रुप कमिटी बनवायची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतून एक सदस्य या आंदोलनाशी जोडायचा आहे. विदर्भातून १० हजार ॲक्टिव्ह लोकं जुळल्यानंतर एक जॉईंट ॲक्शन कमिटी स्थापन करायची आहे. त्यासाठी पुढच्या २३ जून पर्यंत १० हजार ॲक्टिव्ह लोकांना आंदोलनाशी जोडा असे आवाहन प्रशांत किशोर यांनी केले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ