शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कधीही उभी फूट न पडलेला पक्ष म्हणजे भाजप, वर्धापनदिनानिमित्त फडणवीसांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 10:25 IST

DCM Devendra Fadnavis On BJP : काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या मोजताही येणार नाही. कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली, समाजवादी पक्षाची इतकी शकलं झाली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल, असं म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला.

भारतीय जनता पक्षाचा ४५ वा वर्धापन दिन सोहळा नागपुरात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. "भाजपचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत. भारतात ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार, आमदार, विधानपरषद सदस्य, महापौर, सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य असा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जातं," असं फडणवीस म्हणाले. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं भारतातच नाही, पंतप्रधानांच्या माध्यमातून संपूर्ण जगात भारताची एक प्रतिमा तयार केली आहे. मजबूत, न झुकणारा आणि विकासाकडे झेप घेणारा भारत अशी प्रतिमा तयार केली आहे, याचा कार्यकर्ता म्हणून सर्वांना अभिमान आहे. भाजपनं जी वाटचाल सुरू केली आहे, देशाच्या इतिहासातील हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, ज्यात कधीही उभी फूट पडली नाही," असं फडणवीस म्हणाले. 

"देशातील कोणताही पक्ष उचलला, त्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी उभी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या मोजताही येणार नाही. कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली, समाजवादी पक्षाची इतकी शकलं झाली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल. भाजप बनल्यापासून आजपर्यंत कधीही फूट पडली नाही, तो एकसंध राहिला," असंही त्यांनी नमूद केलं. 

"विचारांवर चालणारा पक्ष" 

"पक्षात फूट पडली नाही, याचं एकमेव कारण आहे, या पक्षाने नेते कधी आत्मकेंद्रित नव्हते, स्वार्थी नव्हते, कार्यकर्ते स्वार्थी नव्हते. हा पक्ष कोणाला पंतप्रधान बनवण्यासाठी, कोणाला मुख्यमंत्री बनवण्याकरिता, कोणाला खुर्ची देण्याकरिता तयार करण्यात आलेला नाही. एका विचाराकरिता, भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरिता हा पक्ष तयार करण्यात आला. विचारांवर चालणारा पक्ष आहे म्हणूनच उभी फूट पडली नाही," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर