शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

९९ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन : हे काही ‘सही’ नाही बुवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:20 IST

९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे दिमाखात नागपूर शहरात शनिवारी उद्घाटन झाले खरे, मात्र दिखावा करण्याच्या नादात नागपूरच्या नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यसंमेलनाला आलेल्या कलाकारांची मात्र फरफट केली आहे. आणि याचा मोठा फटका बसला दस्तुरखुद्द सुपरस्टार भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकांच्या कलाकारांनाच. नागपूरात प्रवेश केल्यावर सहीच्या कलाकारांना ३ तास हॉटेल मिळण्यासाठी तडफड करावी लागली.

ठळक मुद्दे‘सही रे सही’चे शिलेदार हॉटेलविना : नागपूर नाट्यपरिषदेच्या भोंगळ कारभाराचा फटका कलाकारांना

अजय परचुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे दिमाखात नागपूर शहरात शनिवारी उद्घाटन झाले खरे, मात्र दिखावा करण्याच्या नादात नागपूरच्या नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्यसंमेलनाला आलेल्या कलाकारांची मात्र फरफट केली आहे. आणि याचा मोठा फटका बसला दस्तुरखुद्द सुपरस्टार भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकांच्या कलाकारांनाच. नागपूरात प्रवेश केल्यावर सहीच्या कलाकारांना ३ तास हॉटेल मिळण्यासाठी तडफड करावी लागली. विशेष म्हणजे भरत जाधव हे खुद्द नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळावर असूनही त्यांच्या टीमला अशी वागणूक मिळाली .सर्व नागपूरांचे लक्ष लागलेल्या भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही नाटकाचा प्रयोग शनिवारी रात्री १० वाजता नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यासाठी सही रे सहीची टीमची बस नाटकाच्या सेटसह शुक्रवारी मुंबईतून निघाली. सर्व कलाकार,बॅकस्टेज आर्टिस्ट अश्या जवळपास २० जणांच्या टीमने तब्बल २४ तास बसने प्रवास केला. या प्रवासाने हे कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी पुरती दमली होती. शुक्रवारी संध्याताळी ७ वाजता ही टीम नागपूरमध्ये दाखल झाली. १० वाजताच्या प्रयोगाच्या आधी हॉटेलवर जाऊन तयारी करून पुन्हा नाट्यगृहात येण्याचा त्यांचा मनोदय होता. मात्र या कलाकारांची व्यवस्था करण्यासाठी नागपूरच्या नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमलेल्या माणसांनी या टीमला हॉटेलच्या नावावर नागपूरचं ३ तास दर्शन घडवलं. यात या कलाकारांना नाहक त्रास झाला.कोणतंही हॉटेल मिळेना आणि त्यात १० वाजता प्रयोग म्हणून ही सर्व कलाकारमंडळी बिना आंघोळीचे कलेच्या प्रेमापोटी सुरेश भट सभागृहात पोहचले. तिथेही या कलाकारांना चहा,कॉफी, न्याहरीची सोय करण्यासाठी प्रचंड त्रास झाला. परिषदेचे पदाधिकारी उद्घाटनाच्या कार्यक्रमात पुढे पुढे करण्यासाठी निघून गेल्याने या कलाकारांना सापत्न वागणूक मिळाली. भरत जाधव यांना ही बाब कळताच त्यांनी नागपूरच्या परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तेव्हा कुठे जाऊन या कलाकारांना सुरेश भट सभागृहाच्या ग्रीन रूममध्ये चहा,न्याहरीची सोय करण्यात आली. कलाकारांच्या या अपमानाबद्दल नागपूरच्या परिषदेचे वाभाडे निघाले आहेत. नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळावर असलेल्या भरत जाधव यांच्या टीमसोबत जर अशी अपमानास्पद वागणूक झाली असेल. तर महाराष्ट्रभरातून एकांकिका, नाटक करायला येणाºया रंगकर्मींची व्यवस्था याहीपेक्षा बिकट असल्याची भावना संमेलस्थळी बोलली जात आहे. या प्रकरणी भरत जाधव आणि त्यांच्या टीमची नाट्यपरिषदेने माफी मागावी अशी मागणी संमेलस्थळी जमलेल्या रंगकर्मींनी केली आहे.माझ्या कलाकारांचा अपमान हा माझा अपमानमाझी सहीची टीम हे माझं दुसरं कुटुंब आहे. २४ तास प्रवास करून ही मंडळी तासभर आपला थकवा घालवण्यासाठी हॉटेलमध्ये जाणार होती. मात्र परिषदेने त्यांना नागपूरची नाहक सफर घडवली. दुसरीकडे त्यांना सभागृहाच्या प्रसाधनगृहातच आंघोळ करा असं सांगण्यात आलं. हे जेव्हा मला माझ्या सहकलाकारांनी सांगितलं तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. संमेलन हे कलाकारांचं असतं. आणि त्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर हे मी कदापी सहन करणार नाही.. माझ्या हस्तेक्षेपानंतर कलाकारांना मध्यरात्री जेवणाची सोय करण्यात आली. पण मिळालेली अपमानास्पद वागणूक निश्चितच दुर्देवी आहे.भरत जाधव - अभिनेतापुन्हा सही रे सही नाटक बघण्याची नागपूरकरांना सुवर्ण संधी मिळाल्याने .शनिवारी रात्री १० वाजता सुरेश भट सभागृह तुडुंब भरलं होतं. सभागृहात २२०० लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. मात्र नागपूरच्या स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम संपण्यास ११ वाजून गेले. त्यानंतर नाटकाला सुरवात झाली आणि मध्यरात्री उशिरापर्यंत नाटकाचा प्रयोग सुरूच होता. नागपूरच्या बाहेरूनही प्रेक्षक मंडळी आर्वजून हे नाटक पाहायला आली होती. मात्र मध्यरात्री १ नंतर सभागृहातील काही व्यक्ती झोपलेल्या आढळून आल्या.

 

टॅग्स :marathiमराठीNatakनाटक