शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतीत भरतात वर्ग; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 16:27 IST

जिल्ह्यातील शाळांचे बांधकाम रखडले

नागपूर : निधी नसल्याने ग्रामीण भागातील धोकादायक शाळांचे बांधकाम रखडले आहे. अशा मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिकावे लागत आहे. नागपूर जिल्ह्यात ८८ शाळांच्या इमारती जीर्ण व धोकादायक झाल्या आहेत. काही ठिकाणी याच इमारतीत वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कळमेश्वर तालुक्यातील ९७ वर्गखोल्या जीर्ण

कळमेश्वर तालुक्यात प्राथमिक शाळांसाठी ३२८ वर्गखोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ९७ वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. १०३ वर्गखोल्यांना दुरुस्तीची तर नवीन ५६ वर्गखोल्यांची गरज आहे. या तालुक्यातील जि.प.च्या ९० शाळांपैकी तेलकामठी, धापेवाडा, रेल्वे गेट घोराड तसेच म्हसेपठार येथील ४ शाळा बंद करण्यात आल्याने, सध्या ८६ शाळा अस्तित्वात आहेत. या शाळांतून ३६९६ विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्वेक्षणानुसार तालुक्यातील ९७ वर्गखोल्या धोकादायक आहेत.

आठ शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक

कळमेश्वर तालुक्यात आठ केंद्रांतून ८६ शाळांचा कारभार चालत असून, सर्वात जास्त धोकादायक वर्गखोल्या उच्च प्राथमिक शाळा तोंडाखैरी येथील ३, धुरखेडा येथील ३, तिडंगी येथील ६, उबाळी येथील ६, पिपळा (किनखेडे) येथील ४, मोहगाव येथील ३, सुसुंद्री येथील ४ वर्गखोल्यांचा समावेश आहे.

जीव मुठीत घेऊन विद्यार्थी घेतात शिक्षणाचे धडे

मौदा तालुक्यातील पिंपळगाव मुरमाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आल्यामुळे येथे नवी इमारत बांधण्यात आली. सर्व शिक्षण अभियानांतर्गत हे काम करण्यात आले. मात्र या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने शाळेच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या बांधकामाची चौकशी करावी. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा. नवीन बांधकाम करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

निधी रोखल्याने बांधकाम थांबले

नरखेड तालुक्यातील सावरगावात जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. त्यापैकी शाळा क्रमांक २ ची इमारत मोडकळीस आली आहे. त्यातील काही वर्गखोल्या बंद केल्या आहेत, तर काही खोल्यांमध्ये वर्ग भरवले जात आहेत. या खोल्या व त्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे. शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शाळा दुरुस्ती निधी शासनाने रोखल्यामुळे बांधकामाची गती थंडावली आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत २०० विद्यार्थ्यांच्या आसपास विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. धोकादायक इमारतीमुळे पालकांची चिंता वाढली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटची गरज

जि. प. शाळांच्या जीर्ण इमारतींचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जि. प. शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या दुरुस्तीसाठी तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :Educationशिक्षणzpजिल्हा परिषदSchoolशाळाnagpurनागपूर