शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरिता ८२,२७३ मेट्रिक टन तांदूळ मंजूर

By गणेश हुड | Updated: June 10, 2023 17:39 IST

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची सप्टेंबरपर्यंतची चिंता मिटली!

नागपूर : जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. विदर्भातील ११ जिल्ह्याकरिता भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) सप्टेंबर पर्यंतचा तांदळाचा ८२,२७३ मेट्रिक टन  कोटा मंजूर झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंतच्या मध्यान्ह भोजन आहाराची चिंता मिटली आहे.

इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना या शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी आवश्यक असलेला तांदूळ हा प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ पर्यंत नागपूरसह विदर्भातील  ११ जिल्ह्यांकरिता तांदूळ मंजूर झाला आहे. त्यापैकी ४०,००९.३६ मेट्रिक टन शाळांना वितरीतही झाला आहे. ४२४६३.६४ मेट्रिक टन तांदूळाचे लवकरच वितरण होणार आहे. त्यामुळे येत्या ३० जून २०२३ पासून सुरु होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवसापासून शापोआ चे वितरण होणार आहे.

धान्य अर्थात तांदूळ देण्याची जबाबदारी ही एफसीआयवर निश्चित केली असून, त्याचा शाळांमध्ये पुरवठा करण्यासाठी पुरवठादाराच्या माध्यमातून करण्यात येतो. नागपूर जिल्ह्यात शापोआ अंतर्गत २७४९ शाळा येत असून, येथे १ ते ८ पर्यंतचे सुमारे ३ लाख ५ हजारांवर लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आहेत. तर मध्यान्ह भोजन शिजविण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर धान्यादी मालाच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्ह्याकरिता श्रीकृष्ण असोसिएट्स यांच्याकडे आले. ते विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाकरिता शाळांना खाद्य तेल, तिखट, डाळी, मसाले, मीठ आदींचा पुरवठा करत असतात. एफसीआयकडून मंजूर झालेल्या तांदूळ हा १ ते ५ च्या विद्यार्थ्याला प्रति दिन प्रती विद्यार्थ्याकरिता १०० ग्राम आणि ६ ते ८ च्या विद्यार्थ्याकरिता १५० ग्राम याप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.

इंधन, भाजीपाला खरेदीची जबाबदारी शाळांवर

शाळा स्तरावर भाजीपाला व इंधनाची खरेदीची जबाबदारी असते. यासाठी शाळांना प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. शाळांना १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता प्रती दिन प्रती विद्यार्थ्याकरिता इंधन भाजीपाल्याचे २.०८ रुपये तर ६ ते ८ च्या विद्यार्थ्यासाठी ३.११ रुपये मिळतात. यामध्ये शाळांना १ ते ५ च्या प्रती दिन प्रती विद्यार्थ्याला ५० ग्राम भाजीपाला व १ ते ८ साठी ७५ ग्राम भाजीपाल्याचा खर्च मिळतो.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStudentविद्यार्थीSchoolशाळाfoodअन्नnagpurनागपूर