शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विदर्भातील अकरा जिल्ह्यांकरिता ८२,२७३ मेट्रिक टन तांदूळ मंजूर

By गणेश हुड | Updated: June 10, 2023 17:39 IST

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची सप्टेंबरपर्यंतची चिंता मिटली!

नागपूर : जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. विदर्भातील ११ जिल्ह्याकरिता भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) सप्टेंबर पर्यंतचा तांदळाचा ८२,२७३ मेट्रिक टन  कोटा मंजूर झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंतच्या मध्यान्ह भोजन आहाराची चिंता मिटली आहे.

इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना या शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी आवश्यक असलेला तांदूळ हा प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ पर्यंत नागपूरसह विदर्भातील  ११ जिल्ह्यांकरिता तांदूळ मंजूर झाला आहे. त्यापैकी ४०,००९.३६ मेट्रिक टन शाळांना वितरीतही झाला आहे. ४२४६३.६४ मेट्रिक टन तांदूळाचे लवकरच वितरण होणार आहे. त्यामुळे येत्या ३० जून २०२३ पासून सुरु होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवसापासून शापोआ चे वितरण होणार आहे.

धान्य अर्थात तांदूळ देण्याची जबाबदारी ही एफसीआयवर निश्चित केली असून, त्याचा शाळांमध्ये पुरवठा करण्यासाठी पुरवठादाराच्या माध्यमातून करण्यात येतो. नागपूर जिल्ह्यात शापोआ अंतर्गत २७४९ शाळा येत असून, येथे १ ते ८ पर्यंतचे सुमारे ३ लाख ५ हजारांवर लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आहेत. तर मध्यान्ह भोजन शिजविण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर धान्यादी मालाच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्ह्याकरिता श्रीकृष्ण असोसिएट्स यांच्याकडे आले. ते विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाकरिता शाळांना खाद्य तेल, तिखट, डाळी, मसाले, मीठ आदींचा पुरवठा करत असतात. एफसीआयकडून मंजूर झालेल्या तांदूळ हा १ ते ५ च्या विद्यार्थ्याला प्रति दिन प्रती विद्यार्थ्याकरिता १०० ग्राम आणि ६ ते ८ च्या विद्यार्थ्याकरिता १५० ग्राम याप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.

इंधन, भाजीपाला खरेदीची जबाबदारी शाळांवर

शाळा स्तरावर भाजीपाला व इंधनाची खरेदीची जबाबदारी असते. यासाठी शाळांना प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. शाळांना १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता प्रती दिन प्रती विद्यार्थ्याकरिता इंधन भाजीपाल्याचे २.०८ रुपये तर ६ ते ८ च्या विद्यार्थ्यासाठी ३.११ रुपये मिळतात. यामध्ये शाळांना १ ते ५ च्या प्रती दिन प्रती विद्यार्थ्याला ५० ग्राम भाजीपाला व १ ते ८ साठी ७५ ग्राम भाजीपाल्याचा खर्च मिळतो.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStudentविद्यार्थीSchoolशाळाfoodअन्नnagpurनागपूर