शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

नागपूर जिल्ह्यातील १४६ पैकी ७७ उमेदवारांना हजार मतेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:34 IST

छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.

ठळक मुद्देछोट्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले : बहुतांश अपक्षांची झोळी रिकामीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर निकालाचे पोस्टमार्टम केले जात आहे. हार-जिंकण्याची समीक्षा करून त्यांची कारणे शोधली जात आहेत. पहिल्या दोन उमेदवारांचीच चर्चा होत आहे. यादरम्यान उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.अशा उमेदवारांमध्ये अपक्षांचा तसेच छोट्या पक्षाच्या उमेदवारांचाही समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या प्रहार व दिल्लीची सत्ता काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीचाही समावेश आहे. प्रहारच्या उमेदवाराने रामटेकमध्ये मात्र चांगली मते घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शक्तिशाली असलेल्या खोरिपा असो की, बळीराजासारख्या पक्षाचा उमेदवार असो, मतदारांनी त्यांना तीन आकड्यापर्यंतच मर्यादित ठेवले. यापैकी अनेक पक्षाची नावे केवळ निवडणुकीतच ऐकायला मिळतात. नोटाला मात्र प्रत्येक मतदार संघात हजारापेक्षा अधिक मत मिळाली, हे विशेष.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्यासाठी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघातून सर्वाधिक २० उमेदवार मैदानात उतरले होते. मुख्यमंत्र्यांच्या विजयादरम्यान केवळ मोठ्या पक्षाच्या उमेदवारांनाच हजारापेक्षा अधिक मते मिळू शकली. १५ उमेदवार चार आकड्यापर्यंतही पोहोचू शकले नाही. यात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, सीपीआय (एमएल) रेड स्टार, बळीराजा पार्टी, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, खोरिपासारख्या पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. बहुतांश उमेदवार ५०० मताच्या आतच राहिले. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने कसेतरी एक हजारावर मते घेतली. दक्षिण नागपुरातही १० उमेदवारांचे तेच हाल राहिले. यात पिछडा समाज पार्टी, बहुजन महा पार्टी, भारतीय मानवाधिकार, फेडरल पार्टी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, देश जनहित पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, हम भारतीय पार्टीच्या उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले माजी उपमहापौर सतीश होले व किशोर कुमेरिया आणि प्रमोद मानमोडे हेच केवळ समाधानकारक मते घेऊ शकले.पश्चिम नागपुरातही हीच परिस्थिती राहिली. पश्चिम नागपुरातील १२ पैकी ७ उमेदवारही हजार मते घेऊ शकले नाहीत. मध्य नागपुरातील १३ पैकी ८, उत्तर नागपुरातील १४ पैकी ८ उमेदवार सुद्धा हजार मतांचा आकडा गाठू शकले नाहीत. राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतील उमेदवारांचा यात समावेश आहे. पूर्व नागपुरात छत्तीसगड स्वाभिमान मंचच्या उमेदवारासह चार उमेदवारांना एक हजार मते मिळवता आली नाहीत.  ग्रामीणमध्येही परिस्थिती वाईट  ग्रामीण भागातील सहा मतदार संघातही हीच परिस्थिती राहिली. रामटेकमध्ये मात्र शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशिष जयस्वाल यांना अपक्ष म्हणून जनतेने विधानसभेत पोहोचवले. परंतु इतर मतदार संघात अपक्ष आणि लहान पक्षाच्या उमेदवारांना जनतेने फारसे महत्व दिले नाही. कामठीमध्ये १२ उमेदवारांपकी चार उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. हिंगणामध्ये १२ पैकी ७ उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. येथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयबाबू घोडमारे यांचे नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवाराने केवळ ४८४ मते घेतली. उमरेडमध्ये ११ पैकी ५, सवनेरमध्ये ८ पैकी ४, काटोलमध्ये १० पैकी ४ उमेदवारांनी सुद्धा हजाराच्या आताच मते घेतली. लहान पक्ष आणि अपक्षांसाठी सर्वात चांगली परिस्थिती रामटेकमध्ये राहिली. येथे एकीकडे अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी विजय प्राप्त केला तर एकूण ९ उमेदवारांपैकी केवळ एकाच उमेदवाराने हजारापेक्षा कमी मते घेतली. तसेच प्रहारच्या उमेदवाराने एकीकडे काटोलमध्ये केवळ ८१७ मते घेतली तर रामटेकमध्ये त्याला २४,७३५ मते मिळाली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर