शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

नागपूर जिल्ह्यातील १४६ पैकी ७७ उमेदवारांना हजार मतेही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:34 IST

छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.

ठळक मुद्देछोट्या पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले : बहुतांश अपक्षांची झोळी रिकामीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर निकालाचे पोस्टमार्टम केले जात आहे. हार-जिंकण्याची समीक्षा करून त्यांची कारणे शोधली जात आहेत. पहिल्या दोन उमेदवारांचीच चर्चा होत आहे. यादरम्यान उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास हे स्पष्टपणे दिसून येते की, छोट्या-छोट्या पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना मतदारांनी नाकारले आहे. जिल्ह्यातील १२ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या एकूण १४६ उमेदवारांपैकी ७७ उमेदवार एक हजार मतेही मिळवू शकले नाहीत.अशा उमेदवारांमध्ये अपक्षांचा तसेच छोट्या पक्षाच्या उमेदवारांचाही समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या प्रहार व दिल्लीची सत्ता काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीचाही समावेश आहे. प्रहारच्या उमेदवाराने रामटेकमध्ये मात्र चांगली मते घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शक्तिशाली असलेल्या खोरिपा असो की, बळीराजासारख्या पक्षाचा उमेदवार असो, मतदारांनी त्यांना तीन आकड्यापर्यंतच मर्यादित ठेवले. यापैकी अनेक पक्षाची नावे केवळ निवडणुकीतच ऐकायला मिळतात. नोटाला मात्र प्रत्येक मतदार संघात हजारापेक्षा अधिक मत मिळाली, हे विशेष.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्यासाठी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघातून सर्वाधिक २० उमेदवार मैदानात उतरले होते. मुख्यमंत्र्यांच्या विजयादरम्यान केवळ मोठ्या पक्षाच्या उमेदवारांनाच हजारापेक्षा अधिक मते मिळू शकली. १५ उमेदवार चार आकड्यापर्यंतही पोहोचू शकले नाही. यात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, सीपीआय (एमएल) रेड स्टार, बळीराजा पार्टी, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, खोरिपासारख्या पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. बहुतांश उमेदवार ५०० मताच्या आतच राहिले. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने कसेतरी एक हजारावर मते घेतली. दक्षिण नागपुरातही १० उमेदवारांचे तेच हाल राहिले. यात पिछडा समाज पार्टी, बहुजन महा पार्टी, भारतीय मानवाधिकार, फेडरल पार्टी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, देश जनहित पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, हम भारतीय पार्टीच्या उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले माजी उपमहापौर सतीश होले व किशोर कुमेरिया आणि प्रमोद मानमोडे हेच केवळ समाधानकारक मते घेऊ शकले.पश्चिम नागपुरातही हीच परिस्थिती राहिली. पश्चिम नागपुरातील १२ पैकी ७ उमेदवारही हजार मते घेऊ शकले नाहीत. मध्य नागपुरातील १३ पैकी ८, उत्तर नागपुरातील १४ पैकी ८ उमेदवार सुद्धा हजार मतांचा आकडा गाठू शकले नाहीत. राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतील उमेदवारांचा यात समावेश आहे. पूर्व नागपुरात छत्तीसगड स्वाभिमान मंचच्या उमेदवारासह चार उमेदवारांना एक हजार मते मिळवता आली नाहीत.  ग्रामीणमध्येही परिस्थिती वाईट  ग्रामीण भागातील सहा मतदार संघातही हीच परिस्थिती राहिली. रामटेकमध्ये मात्र शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशिष जयस्वाल यांना अपक्ष म्हणून जनतेने विधानसभेत पोहोचवले. परंतु इतर मतदार संघात अपक्ष आणि लहान पक्षाच्या उमेदवारांना जनतेने फारसे महत्व दिले नाही. कामठीमध्ये १२ उमेदवारांपकी चार उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. हिंगणामध्ये १२ पैकी ७ उमेदवार एक हजाराच्या आतच राहिले. येथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयबाबू घोडमारे यांचे नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवाराने केवळ ४८४ मते घेतली. उमरेडमध्ये ११ पैकी ५, सवनेरमध्ये ८ पैकी ४, काटोलमध्ये १० पैकी ४ उमेदवारांनी सुद्धा हजाराच्या आताच मते घेतली. लहान पक्ष आणि अपक्षांसाठी सर्वात चांगली परिस्थिती रामटेकमध्ये राहिली. येथे एकीकडे अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांनी विजय प्राप्त केला तर एकूण ९ उमेदवारांपैकी केवळ एकाच उमेदवाराने हजारापेक्षा कमी मते घेतली. तसेच प्रहारच्या उमेदवाराने एकीकडे काटोलमध्ये केवळ ८१७ मते घेतली तर रामटेकमध्ये त्याला २४,७३५ मते मिळाली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर