शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

६६ जीवघेण्या ‘ब्लॅक स्पॉट’ने घेतले ३ वर्षात १,७४९ जणांचे जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 1:52 PM

वाढते शहर, वाढती वाहने, त्या तुलनेत अरुंद होत असलेले रस्ते, रस्त्यावरील व उड्डाण पुलाचे चुकीचे बांधकाम यामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील तीन वर्षांतील धक्कादायक स्थिती सर्वाधिक ब्लॅक स्पॉट नागपूर ग्रामीणमध्ये

सुमेध वाघमारे

नागपूर : दहा व त्यापेक्षा जास्त अपघात झाल्यास आणि या अपघातात पाच व त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्यास त्याला अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखले जाते. नागपूर जिल्ह्यात ६६ ‘ब्लॅक स्पॉट’ असून मागील ३ वर्षांत ४,८०१ अपघात झाले. यात १,७४९ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.

वाढते शहर, वाढती वाहने, त्या तुलनेत अरुंद होत असलेले रस्ते, रस्त्यावरील व उड्डाण पुलाचे चुकीचे बांधकाम यामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले आहेत. नागपूर जिल्ह्यातील शहर आरटीओ कार्यालयांर्तगत ११, पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत १३, तर ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत ४२ असे एकूण ६६ ब्लॅक स्पॉट आहेत. या ‘स्पॉट’वर २०१९ मध्ये झालेल्या १,७०२ अपघातांत ५७४ व्यक्तींचा मृत्यू व १८३८ जण जखमी झाले. २०२०मध्ये १,३५३ अपघातांत ५०८ व्यक्तींचा मृत्यू व १२५७ जण जखमी झाले, तर २०२१ मध्ये १७४६ अपघातांत ६६७ लोकांचा मृत्यू व १६९७ व्यक्ती जखमी झाले.

-ग्रामीणच्या तुलनेत शहरात वाढले अपघात

२०१९ ते २०२१ (जानेवारी ते नोव्हेंबर ) या तीन वर्षांत ग्रामीणच्या तुलनेत शहरात अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण ग्रामीणमध्ये वाढले आहे. शहरात या तीन वर्षांत २,४७२ अपघात झाले असून ६४० व्यक्तींचे मृत्यू झाले, तर याच कालावधीत नागपूर ग्रामीणमध्ये २,३२९ अपघात व ११०९ मृत्यू झालेत.

-नागपूर जिल्ह्यातील तीन वर्षांतील अपघात

वर्ष : अपघात : मृत्यू : जखमी (जानेवारी ते नोव्हेंबर)

२०१९ : १७०२ : ५७४ : १८३८

२०२० :१३५३ :५०८ :१२५७

२०२१ : १७४६ :६६७ : १६९७

-शहर आरटीओ कार्यालयांतर्गत : ११ ब्लॅक स्पॉट

-पूर्व आरटीओ कार्यालयांतर्गत : १३ ब्लॅक स्पॉट

-ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत : ४२ ब्लॅक स्पॉट

टॅग्स :Accidentअपघातroad transportरस्ते वाहतूक