शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 22:51 IST

Scholarships, Issue, Students जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळा स्तरावरून पाठवावे लागतात. हे प्रस्ताव पाठविताना बँक खात्याची चुकीची माहिती भरल्याने ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होऊ शकली नाही.

ठळक मुद्देबँकेची चुकीची माहिती भरल्याचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळा स्तरावरून पाठवावे लागतात. हे प्रस्ताव पाठविताना बँक खात्याची चुकीची माहिती भरल्याने ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होऊ शकली नाही. मुलींचे शिक्षणात गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अनुसूचित जाती व विमुक्त जाती भटक्या जमातींना दिली जाते. तसेच अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांनासुद्धा समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजक ल्याण विभागाला सादर करावा लागलो. शासनाकडून शिष्यवृत्तीचे अनुदान आल्यानंतर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. शाळास्तरावरून शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती देताना मोठ्या प्रमाणात चुका होत आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होऊ शकली नाही. समाजकल्याण विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते चुकीचे आहे. काहींचे खाते आधारशी लिंक नाही. अशा काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील समाजकल्याण विभागात द्यायची होती. सध्या शाळा बंद असल्याने आणि कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळांकडून त्रुटींची पूर्तता होऊ शकली नाही.येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँक खात्यातील त्रुटींची पूर्तता शाळेकडून करून न दिल्यास शिष्यवृत्तीची रक्कम शासनाच्या खात्यात परत जाणार आहे. कोरोनामुळे शाळा त्रुटींची पूर्तता करू शकली नाही. समाजकल्याण विभागातही शिष्यवृत्तीचा एकच टेबल आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना माहिती देण्यासाठी मुख्यालयातच यावे लागते. त्यामुळे त्रुटींची पूर्तता शक्य नाही. पंचायत समिती स्तरावरून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

-शरद भांडारकर, सरचिटणीस, मनसे शिक्षक सेना

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी