शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

नागपूर जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 22:51 IST

Scholarships, Issue, Students जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळा स्तरावरून पाठवावे लागतात. हे प्रस्ताव पाठविताना बँक खात्याची चुकीची माहिती भरल्याने ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होऊ शकली नाही.

ठळक मुद्देबँकेची चुकीची माहिती भरल्याचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळा स्तरावरून पाठवावे लागतात. हे प्रस्ताव पाठविताना बँक खात्याची चुकीची माहिती भरल्याने ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होऊ शकली नाही. मुलींचे शिक्षणात गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अनुसूचित जाती व विमुक्त जाती भटक्या जमातींना दिली जाते. तसेच अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांनासुद्धा समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजक ल्याण विभागाला सादर करावा लागलो. शासनाकडून शिष्यवृत्तीचे अनुदान आल्यानंतर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. शाळास्तरावरून शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती देताना मोठ्या प्रमाणात चुका होत आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होऊ शकली नाही. समाजकल्याण विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते चुकीचे आहे. काहींचे खाते आधारशी लिंक नाही. अशा काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३० सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील समाजकल्याण विभागात द्यायची होती. सध्या शाळा बंद असल्याने आणि कोरोनाच्या प्रकोपामुळे शाळांकडून त्रुटींची पूर्तता होऊ शकली नाही.येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँक खात्यातील त्रुटींची पूर्तता शाळेकडून करून न दिल्यास शिष्यवृत्तीची रक्कम शासनाच्या खात्यात परत जाणार आहे. कोरोनामुळे शाळा त्रुटींची पूर्तता करू शकली नाही. समाजकल्याण विभागातही शिष्यवृत्तीचा एकच टेबल आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना माहिती देण्यासाठी मुख्यालयातच यावे लागते. त्यामुळे त्रुटींची पूर्तता शक्य नाही. पंचायत समिती स्तरावरून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

-शरद भांडारकर, सरचिटणीस, मनसे शिक्षक सेना

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थी