शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

देशात ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 10:00 PM

out of school children भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जाहीर केले. सरकारने हे धोरण निश्चित करताना दिलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार देशात ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य असल्याचे वास्तव मांडले.

ठळक मुद्देराष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अहवालात नमूद ही मुले बालमजूर तर झाली नाही ना?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जाहीर केले. सरकारने हे धोरण निश्चित करताना दिलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार देशात ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य असल्याचे वास्तव मांडले. शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील मुले ही शाळेतच असायला हवी. पण सरकारच्या आकडेवारीत जर ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य असेल तर ही मुले बालमजूर तर झाली नाहीत ना? आज जागतिक बालमजूर दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार, देशात प्रत्येक ११ बालकांमागे १ बालक मजूर आहे. या संस्थेने देशातील पाच राज्यात सर्वाधिक बालमजूर असल्याचे सांगितले आहे. यात बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्राचा समावेश आहे. भारत सरकारची आकडेवारी असो की एका आंतरराष्ट्रीय मजूर संस्थेची यातून देशात असलेल्या बालमजुराची भीषण समस्या असल्याची पुष्टी होत आहे.

सरकारची पुन्हा दुसरी एक आकडेवारी जी २०११ मध्ये जनगणना केल्यानंतर प्रसिद्ध केली होती. ही आकडेवारी आंतरराज्यीय स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांच्या बाबतीत आहे. यात ० ते ४ वयोगटातील ५४.२१ लाख, ५ ते ९ वर्ष वयोगटातील ६१.१४ लाख, १० ते १४ वयोगटतील ३४.२० लाख आणि १५ ते १९ वयोगटातील ८०.६४ लाख मुले स्थलांतरित आहेत. या आकडेवारीने पुन्हा एक स्पष्ट केले की, ६ ते १४ वयोगटातील १.७५ कोटी मुले-मुली स्थलांतरित होत असून, ते शिक्षणापासून वंचित आहेत.

सरकार आणि समाजासाठी हा विषय चिंता आणि चिंतनाचा आहे. बालकांच्या संदर्भात सरकारनेही कायद्यापासून स्वतंत्र मंत्रालयाची यंत्रणा तयार केली होती. शिक्षण हक्क कायदा हा तर बालमजुरी रोखण्याचे प्रभावी शस्त्र आहे. पण हा कायदा केवळ नामांकित शाळेत बालकांच्या प्रवेशापुरताच मर्यादित राहिला आहे. एवढेच नाही तर महिला व बालकल्याण विभाग, कामगार विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग ही यंत्रणासुद्धा बालकांना बालमजुरीपासून रोखण्यासाठी कार्यरत आहे. पण यांना बालमजूरच सापडत नाही. बालकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांच्या मते शाळाबाह्य असलेली बहुतांश मुले ही बालमजूरच आहेत.

- आपल्या देशात बालकांच्या हक्काचे कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणाही आहेत. पण बालकांच्या बाबतीत गंभीर नाही. स्थलांतरित बालके छोटे-मोठे व्यवसाय, विटभट्ट्या, ऊसतोड कामगार, शेतीची कामे, रस्त्यावर भीक मागणे अशा अनेक ठिकाणी आहेत. पण यंत्रणा तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे बालमजुरीचे निर्मूलन होऊ शकत नाही.

दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्षवाहिनी

- बालमजुरी निर्मूलनासाठी यंत्रणा आहे. पण या यंत्रणेकडे किती कारवाई झाल्या, किती बालमजूर सापडले, याची आकडेवारी नाही. खरेतर सरकारी यंत्रणेला बालमजूरीशी घेणे-देणेच नाही.

मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी