५२५ कोटींचा प्रकल्प रखडला

By Admin | Updated: June 11, 2014 01:16 IST2014-06-11T01:16:24+5:302014-06-11T01:16:24+5:30

शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा

525 crores project paused | ५२५ कोटींचा प्रकल्प रखडला

५२५ कोटींचा प्रकल्प रखडला

महापालिका : कोहळे यांचा अधिकाऱ्यांवर दिरंगाईचा आरोप
नागपूर : शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला.
पेंच टप्पा-४ अंतर्गत पेंच ते महादुला अशी २३०० मि.मी.व्यासाची व २७.५ कि.मी. लांबीची पाईप लाईन टाकण्याचे काम मागील काही वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. परंतु मौजा घोगली येथील ८०० मीटर लांबीच्या पाईप लाईनसाठी जमीन अधिग्रहित करताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी चुकीचे अवॉर्ड केले. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात गेले. त्यामुळे काम ठप्प पडले आहे.
सात महिन्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गेल्या सात महिन्यात कोणतीही कार्यवाही केली नाही. अवॉर्डमध्ये वेळीच दुरुस्ती न केल्याने मनपाला जादाचा २३ क ोटींचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचा आरोप कोहळे यांनी केला.घोगली येथील शेतकरी भांगे, पारवे, जुनघरे, कोल्हे व राऊ त कोर्टात गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली असती तर प्रकल्प मार्गी लागला असता, अशी माहिती कोहळे यांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: 525 crores project paused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.