शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धावत्या रेल्वेत बांधल्या अपहरणकर्त्याच्या मुसक्या, अपहृत चिमुकल्याची सुटका

By नरेश डोंगरे | Updated: December 29, 2022 18:29 IST

लहानग्या बहिणींचे प्रसंगावधान : रेल्वे पोलिसांची तत्परता : राजस्थानमधील आरोपी गजाआड

नागपूर : भल्या सकाळी लहानग्या बहिणी आपल्या भावासह खेळत असल्याचे पाहून त्याने या तिघांना चॉकलेटचे आमिष दाखवून उचलले. नागपूर स्थानकावर आणले. दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये तीनही बहिण भावंडांना जबरदस्तीने बसवण्याचे तो प्रयत्न करू लागला. मात्र, ८ आणि ९ वर्षे वय असलेल्या 'त्या' दोघींना त्याचे कलुषित मनसुबे लक्षात आल्याने त्यांनी दूर पळ काढला. त्यामुळे त्यांच्या ५ वर्षीय भावाला घेऊन तो निघून गेला. धडधडत्या ट्रेनमध्ये आपल्या भावाला नेल्याने त्या दोघी सैरभैर झाल्या. रेल्वेस्थानकावरील चाईल्ड लाईनचे सहकारी तसेच रेल्वे पोलिसांनी त्यांना हेरले. विश्वासात घेऊन विचारपूस केली अन् एका पाच वर्षीय चिमुकल्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा उजेडात आला. मुलींच्या माहितीवरून त्यांच्या महादुला कोराडी येथील नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. तिकडे मुले गायब झाल्यामुळे ते कोराडी पोलिसांकडे पोहचले होते.

हिवाळी अधिवेशन सुरू असताना घडलेल्या या चिमुकल्याच्या अपहरणाच्या गुन्ह्याने पोलीस यंत्रणा हादरली. रेल्वे पोलिसांनी एकीकडे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. दुसरीकडे आरोपीचे नाव, पत्ता शोधणे सुरू झाले. त्याचे नाव रामपाल असून तो राजस्थानमधील नागाैर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे आणि त्यानेच पाच वर्षीय युगचे अपहरण केल्याचे पुढे आले. त्याला घेऊन तो तेलंगणा एक्सप्रेसच्या कोच नंबर एस - ७ मध्ये बसून गेल्याचेही स्पष्ट झाले. रेल्वे पोलिसांनी त्या बोगीत कर्तव्यावर असलेल्या तिकिट तपासणीसाचा (टीसी) नाव आणि नंबर मिळवून आरोपी रामपाल अन अपहृत चिमुकला त्या कोचमध्ये आहे की नाही, त्याची शहानिशा करवून घेतली. रामपाल मुलाला घेऊन बसून असल्याचे स्पष्ट झाले. तोवर ही रेल्वेगाडी मध्यप्रदेशातील आमला स्थानकाजवळ पोहचली होती.

रेल्वेच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद यांनी ही गाडी आमला स्थानकावर थांबवून घेतली. तेथे आरोपी रामपालच्या तावडीतून अपहृत चिमुकल्याची सुटका करून त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, ईकडे हे ऑपरेशन सुरू असताना कोराडीचे ठाणेदार रवी नागोसे, एपीआय चंद्रकांत पाटील यांनी आमला येथे आपली टीम पाठवून आरोपी तसेच चिमुकल्याला ताब्यात घेऊन बुधवारी नागपुरात आणले. अपहृत चिमुकल्याला पालकांच्या स्वाधिन करून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी रामपाल हा राजस्थानमधील नागाैर जिल्ह्यात राहतो. तो शेळ्यामेंढ्या चारतो. कधी भूट्टे विकतो. त्याची पत्नी नागपुरातील असून तिने त्याच्यापासून काडीमोड घेतला आहे.

अपहरणाचा उद्देश गुलदस्त्यात

काडीमोड घेतलेली बायको आणि तिचे नातेवाईक येथे राहत असल्याने रामपाल अधून मधून यायचा. नातेवाईकांकडे राहायचा अन् निघून जायचा. यावेळीही तो आला मात्र त्याने जाताना मोठा गुन्हा केला. अपहृत चिमुकला आरोपी रामपालचा नातू लागतो. त्याने कोणत्या उद्देशाने त्याचे अपहरण केले. ते स्पष्ट झाले नाही. मात्र, अपहृत चिमुकल्याच्या लहानग्या बहिणींनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे एक मोठा गुन्हा टळला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणrailwayरेल्वे