शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

नागपुरातील ४१ हजारावर शेतकरी होणार भूमिस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 9:52 PM

विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासूनचा लढा यशस्वी : शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम माफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत. एकट्या नागपुरातील ४१,७४६ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ते आता भूमिस्वामी होतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी वर्ग दोनच्या अशा भूमिधारी जमिनी आता भूमिस्वामी म्हणून रूपांतरित करून शेतकऱ्यांना त्या जमिनीचे स्वामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या जमिनीचा धारणाधिकार बदलताना शुल्क आकारण्याची तरतूद रद्द करून यासाठी कोणतीही रक्कम न आकारता शासनानेच ही प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून हा विषय प्रलंबित होता. गेल्या १५ वर्षांपासून आम्हीही हा विषय सभागृहात लावून धरला होता. त्याला यश आले असून नागपूरसह भंडारा व गोंदियातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.नागपुरात एकूण १ लाख २२ हजार ३६७ वर्ग २ खातेदारांची संख्या आहे. यापैकी मार्च २०१८ पर्यंत वर्ग १ मध्ये ८०,६२१ प्रकरणे रूपांतरित झाली आहेत. तब्बल ४१, ७४६ प्रकरणे शिल्लक आहेत. ती सर्व आता वर्ग एक मध्ये रूपांतरित होतील.पत्रपरिषदेला आ. समीर मेघे,. आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, अशोक धोटे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे