शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

१५ वर्षात नागपुरात ३८ तर राज्यात १८२ मांजाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 11:19 IST

मागील १५ वर्षात नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. ३५०० च्या आसपास लाेक गंभीर व अतिगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे.

ठळक मुद्दे१६०० प्राणी, १३ हजार पक्ष्यांनीही गमावले प्राण

निशांत वानखेडे

नागपूर : या दाेन दिवसांत नागपूर शहरात दाेन शिक्षक नायलाॅन मांजाचे बळी जाता जाता सुदैवाने बचावले. शस्त्रासारखे माणसांचे गळे, अवयव कापणाऱ्या आणि प्राणी-पक्ष्यांचाही बळी घेणाऱ्या नायलाॅन मांजावर ३० मार्च २०१५ साली उच्च न्यायालयाने बंदी घातली हाेती. मात्र शासन-प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही बंदी कुचकामी ठरली. राज्यात मागील १५ वर्षांत १८२ जणांचे तर, नागपुरात ३८ जणांचे जीव गेले आहेत. विशेष म्हणजे यात यात मुलांपासून प्राैढांचाही समावेश आहे.

मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडविणे हा देशातील माेठा उत्सव. असला तरी साधारण: २००६ पासून पतंगबाजीसाठी नायलाॅन मांजाचा वापर वाढल्याने हा उत्सव अनेकांसाठी जीवघेणा ठरला आहे. या जीवघेण्या मांजाविराेधात किंग काेब्रा ऑर्गनायझेशन युथ फाेर्सच्या माध्यमातून अरविंदकुमार रतुडी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर आणि न्यायालयात लढा दिला जात आहे. रतुडी यांनी राज्यभरात घडलेल्या घटनांचे आकडे गाेळा करून शासन, प्रशासनाला जागे करण्याचा सातत्याने प्रयत्न चालविला आहे. त्यांनी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे.

न्यायालयाच्या बंदीनंतर २०१६ पासून राज्यात ९५ ते १०० लाेकांचा नायलाॅन मांजाने जीव घेतला तर ११९ लाेक गंभीर जखमी झाले किंवा अपंग झाले. कुत्री, मांजरी, माकडे, जनावरे असे प्राणीही याचे बळी ठरले. पाच वर्षांत १६०० प्राण्यांनी जीव गमावला तर १३००० पक्ष्यांचाही बळी गेला आहे. ६५०० हजार पक्षी जखमी झाले असून यातले ५०-६० टक्के पक्ष्यांनी प्राण गमावला असण्याची शक्यता रतुडी यांनी व्यक्त केली

नागपुरात ३८ लाेकांचे जीव गेले

मागील १५ वर्षात नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. नायलाॅन मांजाने अपघाती निधनाची यात नाेंद नाही. ३५०० च्या आसपास लाेक गंभीर व अतिगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे.

राज्यात १५ वर्षात १८१ बळी

नायलाॅन मांजाचा वापर वाढल्यापासून मागील १५ वर्षांत राज्यात १८१ लाेकांनी प्राण गमावले आहेत. ८४ लाेक अपंग झाले. ७००० च्या जवळपास माणसे गंभीर, अतिगंभीर जखमी झाले आणि पाेलीस कर्मचाऱ्यांचा यात सर्वाधिक समावेश आहे. १२ हजार प्राणी आणि ४० हजारांवर पक्षी अतिगंभीर स्वरूपात जखमी झाले हाेते व यातील ७० ते ७५ टक्के पक्ष्यांनी प्राण गमावले असण्याची शक्यता रतुडी यांनी व्यक्त केली.

इतर कारणांची नाेंदच हाेत नाही

नायलाॅन मांजाने केवळ गळा कटून मृत्यू हाेताे असे नाही. अरविंदकुमार म्हणाले, मांजा अडकल्याने वाहनांचा अपघात हाेताे, मांजाच्या मागे धावताना बिल्डिंगवरून पडणे, वाहनांना धडकणे अशा कारणानेही मृत्यू हाेताे.

नायलाॅन मांजा पेटत्या विद्युत ताराला अडकल्याने करंट लागूनही प्राण गेले आहेत. जनावरांच्या पोटात जाऊनही मृत्यू होतो, अशा घटनांची नायलाॅन मांजाचे कारण म्हणून नाेंद हाेत नाही. 

मनुष्यवधाचा गुन्हा व्हावा दाखल

अनेक वर्षापासून रतुडी यांच्या संघटनेद्वारे न्यायालयात लढा दिला जात आहे. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या टीमने डीसीपी यांची भेट घेत नायलाॅन मांजा विकरणारे व वापरणाऱ्यांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मांजाची निर्मितीच बंद व्हावी म्हणून राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, लाेकसभा अध्यक्ष अशा माननीयांना पत्र पाठविले आहे. जिल्हाधिकारी, पाेलीस आयुक्त, मनपा आयुक्त, प्रदूषण मंडळ, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटूनही त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणkiteपतंगSocialसामाजिकAccidentअपघात