शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

नागपुरातील ३६ रुग्णांचा श्वास एका सिलेंडरच्या भरवशावर; आयुष इस्पितळ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 07:00 IST

Nagpur News सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते.

ठळक मुद्दे दर १५ मिनिटांनी बदलावा लागत आहे सिलेंडर

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते. सुमारे तीन तास दुरुस्तीचे काम चालले. जर थोडासा जरी उशीर झाला असता तर अनेक रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता होती.

इस्पितळात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन नातेवाईक दाखल नसते तर इतकी तत्परता कुणीच दाखविली नसती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा वाहिनीला चार सिलेंडर जुळले होते. यातील एक नोजल बंद होते, दोन नोजल खराब झाले होते व पुरवठा वाहिनीच्या केवळ एकाच नोजलच्या भरवशावर ३६ रुग्णांना प्राणवायू जात होता. दुपारी ४.०५ वाजता जेव्हा लिकेजची समस्या लक्षात आली तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कसेतरी नोजल ठीक केले. मात्र हे पर्याप्त नव्हते. जर काम करणारे एक नोजल बंद झाले असते तर रुग्णांच्या जीवाला धोका होता.

मनपाच्या तीन रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना भरती केले जात आहे. यात गांधीनगरस्थित इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडास्थित आयसोलेशन इस्पितळ, सदरस्थित आयुष इस्पितळ यांचा समावेश आहे. तेथे केवळ ऑक्सिजन असलेले बेड आहेत. इंदिरा गांधीमध्ये ९२, आयसोलेशनमध्ये ३२ व आयुष इस्पितळात ४२ रुग्ण भरती आहेत.

मनपाकडे पाहणीची व्यवस्थाच नाही

कोरोनाची स्थिती पाहता मनपातर्फे तडकाफडकी तेथे ऑक्सिजन पुरवठ्याची वाहिनी टाकण्यात आली. कंत्राटाच्या आधारावर काम करविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्या पाहणीची जबाबदारी आहे. हा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंगशी जुळला आहे. पुरवठा वाहिनीची डागडुजी, पाहणीसाठी इस्पितळात तंत्रज्ञ नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु मनपाकडे याची काहीच व्यवस्था नाही. अशास्थितीत अपघात झाला तर त्याची थेट जबाबदारी मनपावर असेल. पाचपावली व केटीनगर इस्पितळात ऑक्सिजन वाहिनी टाकणे व रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची भरती

इस्पितळांमध्ये ऑक्सिनजची पुरवठा वाहिनी टाकण्यासोबतच क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. इस्पितळांमध्ये विद्युत वाहिन्यांसोबतच इतर सुविधा जुन्या आहेत. अशास्थितीत भार वाढल्याने आग लागणे, लिकेज होणे अशा घटना होत आहेत, अशी माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस