शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नागपुरातील ३६ रुग्णांचा श्वास एका सिलेंडरच्या भरवशावर; आयुष इस्पितळ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 07:00 IST

Nagpur News सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते.

ठळक मुद्दे दर १५ मिनिटांनी बदलावा लागत आहे सिलेंडर

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते. सुमारे तीन तास दुरुस्तीचे काम चालले. जर थोडासा जरी उशीर झाला असता तर अनेक रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता होती.

इस्पितळात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन नातेवाईक दाखल नसते तर इतकी तत्परता कुणीच दाखविली नसती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा वाहिनीला चार सिलेंडर जुळले होते. यातील एक नोजल बंद होते, दोन नोजल खराब झाले होते व पुरवठा वाहिनीच्या केवळ एकाच नोजलच्या भरवशावर ३६ रुग्णांना प्राणवायू जात होता. दुपारी ४.०५ वाजता जेव्हा लिकेजची समस्या लक्षात आली तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कसेतरी नोजल ठीक केले. मात्र हे पर्याप्त नव्हते. जर काम करणारे एक नोजल बंद झाले असते तर रुग्णांच्या जीवाला धोका होता.

मनपाच्या तीन रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना भरती केले जात आहे. यात गांधीनगरस्थित इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडास्थित आयसोलेशन इस्पितळ, सदरस्थित आयुष इस्पितळ यांचा समावेश आहे. तेथे केवळ ऑक्सिजन असलेले बेड आहेत. इंदिरा गांधीमध्ये ९२, आयसोलेशनमध्ये ३२ व आयुष इस्पितळात ४२ रुग्ण भरती आहेत.

मनपाकडे पाहणीची व्यवस्थाच नाही

कोरोनाची स्थिती पाहता मनपातर्फे तडकाफडकी तेथे ऑक्सिजन पुरवठ्याची वाहिनी टाकण्यात आली. कंत्राटाच्या आधारावर काम करविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्या पाहणीची जबाबदारी आहे. हा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंगशी जुळला आहे. पुरवठा वाहिनीची डागडुजी, पाहणीसाठी इस्पितळात तंत्रज्ञ नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु मनपाकडे याची काहीच व्यवस्था नाही. अशास्थितीत अपघात झाला तर त्याची थेट जबाबदारी मनपावर असेल. पाचपावली व केटीनगर इस्पितळात ऑक्सिजन वाहिनी टाकणे व रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची भरती

इस्पितळांमध्ये ऑक्सिनजची पुरवठा वाहिनी टाकण्यासोबतच क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. इस्पितळांमध्ये विद्युत वाहिन्यांसोबतच इतर सुविधा जुन्या आहेत. अशास्थितीत भार वाढल्याने आग लागणे, लिकेज होणे अशा घटना होत आहेत, अशी माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस