शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरातील ३६ रुग्णांचा श्वास एका सिलेंडरच्या भरवशावर; आयुष इस्पितळ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 07:00 IST

Nagpur News सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते.

ठळक मुद्दे दर १५ मिनिटांनी बदलावा लागत आहे सिलेंडर

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते. सुमारे तीन तास दुरुस्तीचे काम चालले. जर थोडासा जरी उशीर झाला असता तर अनेक रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता होती.

इस्पितळात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन नातेवाईक दाखल नसते तर इतकी तत्परता कुणीच दाखविली नसती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा वाहिनीला चार सिलेंडर जुळले होते. यातील एक नोजल बंद होते, दोन नोजल खराब झाले होते व पुरवठा वाहिनीच्या केवळ एकाच नोजलच्या भरवशावर ३६ रुग्णांना प्राणवायू जात होता. दुपारी ४.०५ वाजता जेव्हा लिकेजची समस्या लक्षात आली तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कसेतरी नोजल ठीक केले. मात्र हे पर्याप्त नव्हते. जर काम करणारे एक नोजल बंद झाले असते तर रुग्णांच्या जीवाला धोका होता.

मनपाच्या तीन रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना भरती केले जात आहे. यात गांधीनगरस्थित इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडास्थित आयसोलेशन इस्पितळ, सदरस्थित आयुष इस्पितळ यांचा समावेश आहे. तेथे केवळ ऑक्सिजन असलेले बेड आहेत. इंदिरा गांधीमध्ये ९२, आयसोलेशनमध्ये ३२ व आयुष इस्पितळात ४२ रुग्ण भरती आहेत.

मनपाकडे पाहणीची व्यवस्थाच नाही

कोरोनाची स्थिती पाहता मनपातर्फे तडकाफडकी तेथे ऑक्सिजन पुरवठ्याची वाहिनी टाकण्यात आली. कंत्राटाच्या आधारावर काम करविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्या पाहणीची जबाबदारी आहे. हा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंगशी जुळला आहे. पुरवठा वाहिनीची डागडुजी, पाहणीसाठी इस्पितळात तंत्रज्ञ नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु मनपाकडे याची काहीच व्यवस्था नाही. अशास्थितीत अपघात झाला तर त्याची थेट जबाबदारी मनपावर असेल. पाचपावली व केटीनगर इस्पितळात ऑक्सिजन वाहिनी टाकणे व रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची भरती

इस्पितळांमध्ये ऑक्सिनजची पुरवठा वाहिनी टाकण्यासोबतच क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. इस्पितळांमध्ये विद्युत वाहिन्यांसोबतच इतर सुविधा जुन्या आहेत. अशास्थितीत भार वाढल्याने आग लागणे, लिकेज होणे अशा घटना होत आहेत, अशी माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस