शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नागपूर शहरातील ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यालायक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 23:17 IST

आपली बस सेवामध्ये सामील शहरातील ३० ते ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यासारख्या नाहीत. या बसेस इतक्या खराब झाल्या आहेत की चालता चालता कधीही बंद पडत असतात. या बसेसमधून विषारी वायू निघत असतो. आत बसण्याच्या सीटही खराब झाल्या आहेत. ब्रेकपासून तर इंजिनपर्यंत सारेच काही खराब होण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देमनपा वाहतूक विभाग : बसेसचा घेतला जातोय आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपली बस सेवामध्ये सामील शहरातील ३० ते ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यासारख्या नाहीत. या बसेस इतक्या खराब झाल्या आहेत की चालता चालता कधीही बंद पडत असतात. या बसेसमधून विषारी वायू निघत असतो. आत बसण्याच्या सीटही खराब झाल्या आहेत. ब्रेकपासून तर इंजिनपर्यंत सारेच काही खराब होण्याच्या स्थितीत आहे.बसेससंदर्भात मिळत असलेल्या तक्रारी पाहता मनपाच्या वाहतूक विभागाने सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात ही बाबही स्पष्टपणे दिसून आली की प्रत्येक डेपोमध्ये १० ते १२ बसेसची अशीच परिस्थिती आहे. त्या बसेस धावण्याच्या परिस्थितीत नाही. परंतु या सर्वेक्षणाबाबत ना अधिकारी काही बोलायला तयार आहेत ना मनपाचे पदाधिकारी.वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मनपाला २४० स्टँडर्डस् बसेस मिळाल्या होत्या. यापैकी तीन बसेस जळाल्या होत्या. उर्वरित २३७ बसेस तीन आॅपेरटरमध्ये प्रत्येकी ७९-७९ प्रमाणे वाटप करण्यात आले. यातही १०-१० बसेस या डेपोमध्येच पडून असतात. सध्या प्रत्येक आॅपरेटर जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळालेल्या ६९-६९ बसेस चालवीत आहे. यासोबतच त्यांच्या स्वत:च्याही ३५-३५ मिनी बसेस शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.जेएनएनयूआरएमच्या २०७ बसेस आणि खासगी आॅपरेटरच्या एकूण १०५ बसेस शहर बस सेवेत सुरू आहेत.तज्ज्ञानुसर या खराब झालेल्या बसेसमुळे आपली बस सेवेची प्रतिमाही खराब होत आहे. ‘ग्रीन बस’ बंद झाल्याने राष्ट्रीय स्तरावर नागपूर वाहतूक सेवेची चर्चा होऊ लागली आहे. यामुळेच वाहतूक विभागानेही खराब झालेल्या बसेस शोधण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.शुक्रवारी बस डेपोचे सर्वेक्षण करून बसेसची पाहणी करण्यात आली. सर्वेक्षणाशी संबंधित अधिकाºयांना कुणाशीही चर्चा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी हवेतील प्रदूषणाचा स्तर, अग्निशमन उपकरणांची उपलब्धता, सीट, बसेसचा बाहेरचा भाग, ब्रेक, गिअर बॉक्स, इंजिनची अवस्था आदींना मानक धरण्यात आले आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षण करणाºया अधिकाºयांना बसेसमधील सीटस् उखडलेल्या, छत तुटलेले, खिळे निघालेले, गिअर बॉक्सला सपोर्टसाठी विटा ठेवलेल्या, खराब दरवाजे आदी दिसून आले. बसेसची ही परिस्थिती अशी आहे की तिला सुधारल्यानंतरही ती अधिक काळ चालू शकणार नाही.ब्रेकडाऊनचे प्रमाण ०.४० टक्केशहर बसेसच्या ब्रेकडाऊनचा डाटा तर अजिबात चांगला नाही. दर १० हजार किमी प्रवासानंतर ब्रेकडाऊनचे प्रमाण ०.४० टक्के आहे. दुसरीकडे एसटी महामंडळांच्या बसेसमध्ये हेच प्रमाण ०.०५ टक्के इतके आहे. आकडेवारीनुसार विचार केल्यास दररोज २५ ते ३० बसेस रस्त्यांवर खराब होऊन उभी ठेवावी लागत आहे. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले की ब्रेकडाऊनचे प्रमाण शहर बसेसमध्ये अधिक आहे. ते कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बस सेवा अधिकाधिक चांगली होण्यासाठ आवश्यक पावले उचलल्या जात आहे. आवश्यकता पडल्यास खराब झालेल्या बसेस रस्त्यांवरून बाहेर काढू.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक