शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अपहरण झालेल्या ३३ मुली-महिला अद्यापी गायबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 08:00 IST

Nagpur News महिला अत्याचारांसोबतच शहरात महिला व मुलींच्या अपहरणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक वाढले.

ठळक मुद्देशहरात अपहरणाचे प्रमाण वाढीस ९३ टक्के प्रकरणांचा उलगडा

योगेश पांडे

नागपूर : पोलिस प्रशासनाकडून महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असले, तरी महिला अत्याचारांचे वाढते गुन्हे जळजळीत वास्तव स्पष्ट करत आहेत. महिला अत्याचारांसोबतच शहरात महिला व मुलींच्या अपहरणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक वाढले. आश्चर्याची बाब म्हणजे, २०२२ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांतील ९३ टक्के प्रकरणांचा उलगडा झाला असला, तरी ३३ मुली-महिलांचा शोध लागलेला नाही.

नागपूर पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२१ साली ४१५ महिला-मुलींचे अपहरण झाले होते व त्यातील ३५६ जणांचा शोध लागला होता. २०२२ मध्ये या आकड्यांत वाढ झाली. वर्षभरात अपहरणाचे ४६० गुन्हे नोंदविले गेले व त्यातील ४२७ जणींचा शोध लागला. याची टक्केवारी ९३ टक्के इतकी होती. मात्र, ३३ मुली व महिला गायबच आहेत. या महिला व मुली नेमक्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन वर्षांत ८० हून अधिक जणांचा शोध नाही

२०२१ व २०२२ या दोन वर्षांतील आकडेवारीकडे नजर टाकली असता, ९२ मुली व महिलांचा काहीच पत्ता लागला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही मुली व महिलांची माहिती मिळाली असून, अद्यापही ८० हून अधिक जणांचा शोध सुरूच आहे.

दरवर्षी सरासरी ४४८ अपहरणाचे गुन्हे

मागील पाच वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता, महिला व मुलींच्या अपहरणाचे २ हजार २४३ गुन्हे दाखल झाले. दरवर्षी सरासरी ४४८ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये सर्वाधिक ५३६ अपहरणाची प्रकरणे समोर आली होती.

यामुळे वाढत आहेत गुन्हे

- अल्पवयीन मुली विविध कारणांमुळे घर सोडून जातात. त्या हरवल्या असल्या, तरी नियमांनुसार अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद होते.

- घरातील वादांना कंटाळून अनेक जण घर सोडतात किंवा पळून जातात.

- प्रेमप्रकरणांत प्रियकरासोबत पळ काढला जातो व मग अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद होते.

- आपापसातील वादातून अनेकदा महिला-मुलींचे अपहरण होते.

 

अपहरण दरात देशात आठव्या स्थानी

लॉकडाऊन असूनही गुन्हेगार निर्ढावलेले होते व २०२१ मध्ये महिलांच्या अपहरणाचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरातच नोंदविण्यात आला. २०२० मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचा दर २०.१ तर २०२१ मध्ये १६.६ इतका होता. नागपूरचा देशात आठवा क्रमांक होता.

टॅग्स :Kidnappingअपहरण