शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेल्या ३३ मुली-महिला अद्यापी गायबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 08:00 IST

Nagpur News महिला अत्याचारांसोबतच शहरात महिला व मुलींच्या अपहरणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक वाढले.

ठळक मुद्देशहरात अपहरणाचे प्रमाण वाढीस ९३ टक्के प्रकरणांचा उलगडा

योगेश पांडे

नागपूर : पोलिस प्रशासनाकडून महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असले, तरी महिला अत्याचारांचे वाढते गुन्हे जळजळीत वास्तव स्पष्ट करत आहेत. महिला अत्याचारांसोबतच शहरात महिला व मुलींच्या अपहरणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक वाढले. आश्चर्याची बाब म्हणजे, २०२२ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांतील ९३ टक्के प्रकरणांचा उलगडा झाला असला, तरी ३३ मुली-महिलांचा शोध लागलेला नाही.

नागपूर पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२१ साली ४१५ महिला-मुलींचे अपहरण झाले होते व त्यातील ३५६ जणांचा शोध लागला होता. २०२२ मध्ये या आकड्यांत वाढ झाली. वर्षभरात अपहरणाचे ४६० गुन्हे नोंदविले गेले व त्यातील ४२७ जणींचा शोध लागला. याची टक्केवारी ९३ टक्के इतकी होती. मात्र, ३३ मुली व महिला गायबच आहेत. या महिला व मुली नेमक्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन वर्षांत ८० हून अधिक जणांचा शोध नाही

२०२१ व २०२२ या दोन वर्षांतील आकडेवारीकडे नजर टाकली असता, ९२ मुली व महिलांचा काहीच पत्ता लागला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही मुली व महिलांची माहिती मिळाली असून, अद्यापही ८० हून अधिक जणांचा शोध सुरूच आहे.

दरवर्षी सरासरी ४४८ अपहरणाचे गुन्हे

मागील पाच वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता, महिला व मुलींच्या अपहरणाचे २ हजार २४३ गुन्हे दाखल झाले. दरवर्षी सरासरी ४४८ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये सर्वाधिक ५३६ अपहरणाची प्रकरणे समोर आली होती.

यामुळे वाढत आहेत गुन्हे

- अल्पवयीन मुली विविध कारणांमुळे घर सोडून जातात. त्या हरवल्या असल्या, तरी नियमांनुसार अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद होते.

- घरातील वादांना कंटाळून अनेक जण घर सोडतात किंवा पळून जातात.

- प्रेमप्रकरणांत प्रियकरासोबत पळ काढला जातो व मग अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद होते.

- आपापसातील वादातून अनेकदा महिला-मुलींचे अपहरण होते.

 

अपहरण दरात देशात आठव्या स्थानी

लॉकडाऊन असूनही गुन्हेगार निर्ढावलेले होते व २०२१ मध्ये महिलांच्या अपहरणाचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरातच नोंदविण्यात आला. २०२० मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचा दर २०.१ तर २०२१ मध्ये १६.६ इतका होता. नागपूरचा देशात आठवा क्रमांक होता.

टॅग्स :Kidnappingअपहरण