शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

३० हजार कि.मी.चे रस्ते लवकरच पक्के होणार : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:06 IST

शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड/नागपूर : शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०२० मधील नरखेड तालुक्यातील खापरी केने येथील रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती नरखेडच्या सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, जिल्हा परिषद सदस्या पूनम जोध, नरखेड पंचायत समिती सदस्या माया मोढोरिया, खापरी केने ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी केने, उपसरपंच नेत्राम सोनेकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, अधीक्षक अभियंता एन. एस. अन्सारी, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, उपअभियंता राजेंद्र जैन आदी उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या सहकायार्तून येत्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासोबतच उच्च दर्जाच्या दळणवळण सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिले. गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. बेरोजगारांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच अवैध सावकारीला चाप लावण्यासाठी याबाबत अडचणी असल्यास थेट माझ्याजवळ तक्रार नोंदवावी, असे आवाहनही केले.ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न : हसन मुश्रीफराज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामविकास विभागाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था उच्च दर्जाची करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या कालावधीत ग्रामीण क्षेत्रात ३० हजार कि. मी. चे रस्ते लवकरच बांधण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर