शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

३० हजार कि.मी.चे रस्ते लवकरच पक्के होणार : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:06 IST

शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड/नागपूर : शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०२० मधील नरखेड तालुक्यातील खापरी केने येथील रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती नरखेडच्या सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, जिल्हा परिषद सदस्या पूनम जोध, नरखेड पंचायत समिती सदस्या माया मोढोरिया, खापरी केने ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी केने, उपसरपंच नेत्राम सोनेकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, अधीक्षक अभियंता एन. एस. अन्सारी, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, उपअभियंता राजेंद्र जैन आदी उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या सहकायार्तून येत्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासोबतच उच्च दर्जाच्या दळणवळण सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिले. गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. बेरोजगारांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच अवैध सावकारीला चाप लावण्यासाठी याबाबत अडचणी असल्यास थेट माझ्याजवळ तक्रार नोंदवावी, असे आवाहनही केले.ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न : हसन मुश्रीफराज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामविकास विभागाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था उच्च दर्जाची करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या कालावधीत ग्रामीण क्षेत्रात ३० हजार कि. मी. चे रस्ते लवकरच बांधण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर