शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

३० लाख मंदिरे घडवू शकतात बदल, मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम स्वीकारावा - हावरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 08:00 IST

‘एमबीए इन टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास या क्षेत्रात सुजाण पिढी निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबत मंदिरांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य वापर होईल आणि देशात क्रांतिकारी बदल घडेल, असेही ते म्हणाले.

- गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : देशभरात मंदिरांची संख्या थोडीथोडकी नव्हे तर ३० लाखांवर आहे. लहान-मोठी मंदिरे मिळून ती एक कोटीपर्यंत जाईल. मंदिरांना येणारी रोजची देणगी कोटींच्या घरात आहे. मंदिरे ही श्रद्धास्थाने असली तरी अपवाद वगळता एकसूत्रपणा, योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने मंदिरे आणि त्यांच्या संपत्तीचा पुरेसा वापर समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा होत नाही. यासाठी विद्यापीठांनी टेंपल मॅनेजमेंट अभ्यासक्रम स्वीकारावा. त्यातून घडलेली नवी पिढी या कार्यात उतरली तर हीच ३० लाख मंदिरे देशात क्रांतिकारी बदल घडवू शकतील, असा विश्वास श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे माजी अध्यक्ष तथा अणुशास्त्रतज्ज्ञ डाॅ. सुरेश हावरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

श्री साईबाबा संस्थान येथे चार वर्षे अध्यक्षपदावर काम करताना आलेल्या अनुभवावरून मंदिर व्यवस्थापन हा फार मोठा विषय असल्याची जाणीव झाल्याचे सांगून डॉ. हावरे म्हणाले, बिझिनेस मॅनेजमेंटमधील मॅनपॉवर, मशिनरी, मनी, मटेरिअल आणि मार्केटिंग ही पाचही तत्त्वे ‘टेंपल मॅनेजमेंट’मध्येही लागू होतात. या क्षेत्राचा आजवर कुणी अभ्यासच केला नव्हता. त्यातून ‘टेंपल मॅनेजमेंट’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते म्हणाले.

हा अभ्यासक्रम देशातील विद्यापीठांनी स्वीकारावा, यासाठी अलीकडेच नागपूरसह अमरावती, पुणे तसेच विद्यालंकार विद्यापीठ, मुंबई येथील कुलगुरूंशी चर्चा केली. ‘एमबीए इन टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास या क्षेत्रात सुजाण पिढी निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबत मंदिरांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य वापर होईल आणि देशात क्रांतिकारी बदल घडेल, असेही ते म्हणाले.

‘टेंपल टुरिझम’ दुर्लक्षितडॉ. सुरेश हावरे म्हणाले, देशात अनेक सुंदर व ऐतिहासिक मंदिरे आहेत. ती देशाची संस्कृती सांगतात. विदेशात मंदिरांचे ऑडिओ गॅझेट असल्याचे आपण पाहिले आहे. त्यातून मंदिरे, मूर्तींचा इतिहास कळतो. मात्र, पर्यटकांपर्यंत पोहाेचण्यासाठी आपल्याकडे या तंत्राचा अभाव आहे. या अभ्यासक्रमातून बराच वाव आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा मंदिरेच जपू शकतात. 

सेवाभिमुख कार्यमंदिरांचा चेहरा सेवाभिमुख आणि समाजाभिमुख व्हावा. अन्नदान, शाळा-महाविद्यालये, आरोग्यसेवा, क्षेत्रीय गरजेनुसार सामाजिक उपक्रम चालतात. असे उपक्रम सर्वच मंदिरांमधून चालविण्यासाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज आहे. ती अभ्यासक्रमातूनच पूर्ण होऊ शकते. मंदिरात येणारे स्वेच्छेने आणि भक्तिभावाने येतात. त्यांच्या भावनांचे बाजारीकरण न करता श्रद्धा व भावनेचा आदर व्हावा. मंदिरांचा योग्य वापर झाला तर दानपेटी हवी कशाला, असे विचारणाऱ्यांना उत्तर मिळेल, असेही डॉ. हावरे म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर