शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या

By नरेश डोंगरे | Updated: October 30, 2023 22:12 IST

विविध भागातील मार्गावर लागला ब्रेक : लाखोंचे नुकसान

नागपूर : राज्यातील अनेक भागात पेटलेल्या मराठा आंदोलनाची तीव्र झळ राज्य परिवहन महामंडळाला बसली आहे. चार दिवसांत राज्यात ३ एसटी बसेस जाळण्यात आल्या असून ८५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जाळपोळ, तोडफोडीतून होणारे प्रचंड नुकसान आणि आंदोलनाचा जागोजागी ब्रेकर (अडथळा) लागल्याने एसटी महामंडळाला रोज लाखोंचा फटका बसत आहे. परिणामी एसटी महामंडळांत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याने मराठा आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत आहे. परिणामी राज्याच्या विविध भागात रास्ता रोको, तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. कुण्या एखाद-दुसऱ्या गावाकडे नव्हे तर राज्याच्या अनेक भागात हे लोण पसरले असून आंदोलकांसाठी एसटी महामंडळाची 'लालपरी सॉफ्ट टार्गेट' ठरली आहे. विविध पक्षाच्या नेत्यांसोबतच आंदोलक त्यांचा राग 'वड्याचे तेल वांग्यावर' या उक्तीप्रमाणे एसटीच्या लालपरीवर काढत आहेत.

केवळ चार दिवसांत राज्यात ३ बसेस पेटविण्यात आल्या असून ८५ गाड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाला चांगलीच धडकी भरली आहे. एकीकडे जाळपोळ तोडफोडीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे आंदोलनाचा अडथळा पार करता येत नसल्याने विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी अडून पडल्या आहेत. परिणामी ठिकठिकाणच्या फेऱ्यांवर विपरीत परिणाम होऊन एसटीला रोज लाखोंच्या उत्पन्नापासून मुकावे लागत आहे.

विदर्भातील वऱ्हाडात कोंडी;नागपूर-विदर्भात आंदोलनामुळे वऱ्हाडाकडील भाग एसटीची कोंडी करणारा ठरला आहे. यवतमाळ मार्गे धावणाऱ्या पंढरपूर - नागपूर, सोलापूर - नागपूर आणि परतीच्या मार्गावरील बसेसपैकी काही बसेस पुसद, उमरखेड, अंबेजोगाई आदी ठिकाणी अडून उभ्या आहेत. तर, अमरावती मार्गे धावणाऱ्या नागपूर ते पूणे चिखलीपर्यंत आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ही बसअकोल्यापर्यंतचा प्रवास करून अडकून पडली आहे.

७७०९ किलोमिटरच्या २२ फेऱ्या प्रभावितअधिकाऱ्यांच्या मते विदर्भातील ७७०९ किलोमिटरच्या मार्गावर धावणाऱ्या २२ फेऱ्यांना आंदोलनाचा जबर फटका बसला आहे. बसेसचे संचालन बंद पडल्याने एसटीला रोज लाखोंचा फटका बसत आहे.

आर्थिक कोंडीची भीतीहे आंदोलन आणखी किती दिवस चालेल, याचा नेम नाही. मात्र, अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास एसटी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही चांगलीच धडकी भरली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfireआग