शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या

By नरेश डोंगरे | Updated: October 30, 2023 22:12 IST

विविध भागातील मार्गावर लागला ब्रेक : लाखोंचे नुकसान

नागपूर : राज्यातील अनेक भागात पेटलेल्या मराठा आंदोलनाची तीव्र झळ राज्य परिवहन महामंडळाला बसली आहे. चार दिवसांत राज्यात ३ एसटी बसेस जाळण्यात आल्या असून ८५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जाळपोळ, तोडफोडीतून होणारे प्रचंड नुकसान आणि आंदोलनाचा जागोजागी ब्रेकर (अडथळा) लागल्याने एसटी महामंडळाला रोज लाखोंचा फटका बसत आहे. परिणामी एसटी महामंडळांत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याने मराठा आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत आहे. परिणामी राज्याच्या विविध भागात रास्ता रोको, तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. कुण्या एखाद-दुसऱ्या गावाकडे नव्हे तर राज्याच्या अनेक भागात हे लोण पसरले असून आंदोलकांसाठी एसटी महामंडळाची 'लालपरी सॉफ्ट टार्गेट' ठरली आहे. विविध पक्षाच्या नेत्यांसोबतच आंदोलक त्यांचा राग 'वड्याचे तेल वांग्यावर' या उक्तीप्रमाणे एसटीच्या लालपरीवर काढत आहेत.

केवळ चार दिवसांत राज्यात ३ बसेस पेटविण्यात आल्या असून ८५ गाड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाला चांगलीच धडकी भरली आहे. एकीकडे जाळपोळ तोडफोडीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे आंदोलनाचा अडथळा पार करता येत नसल्याने विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी अडून पडल्या आहेत. परिणामी ठिकठिकाणच्या फेऱ्यांवर विपरीत परिणाम होऊन एसटीला रोज लाखोंच्या उत्पन्नापासून मुकावे लागत आहे.

विदर्भातील वऱ्हाडात कोंडी;नागपूर-विदर्भात आंदोलनामुळे वऱ्हाडाकडील भाग एसटीची कोंडी करणारा ठरला आहे. यवतमाळ मार्गे धावणाऱ्या पंढरपूर - नागपूर, सोलापूर - नागपूर आणि परतीच्या मार्गावरील बसेसपैकी काही बसेस पुसद, उमरखेड, अंबेजोगाई आदी ठिकाणी अडून उभ्या आहेत. तर, अमरावती मार्गे धावणाऱ्या नागपूर ते पूणे चिखलीपर्यंत आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ही बसअकोल्यापर्यंतचा प्रवास करून अडकून पडली आहे.

७७०९ किलोमिटरच्या २२ फेऱ्या प्रभावितअधिकाऱ्यांच्या मते विदर्भातील ७७०९ किलोमिटरच्या मार्गावर धावणाऱ्या २२ फेऱ्यांना आंदोलनाचा जबर फटका बसला आहे. बसेसचे संचालन बंद पडल्याने एसटीला रोज लाखोंचा फटका बसत आहे.

आर्थिक कोंडीची भीतीहे आंदोलन आणखी किती दिवस चालेल, याचा नेम नाही. मात्र, अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास एसटी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही चांगलीच धडकी भरली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfireआग