शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

अजनी पुलाजवळील २७ दुकाने 'साफ'; नवीन केबल पुलाच्या निर्मितीसाठी मध्य रेल्वेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:46 IST

रामझुल्यासारखाच अजनीत केबल पूल : 'महारेल'कडे काम

नागपूर : अजनीमध्ये प्रस्तावित नवीन केबल पुलाचे निर्माण करण्यासाठी रेल्वे कॉलनीतील २७ दुकाने मध्य रेल्वेच्या इंजिनीअरींग विभागाच्या टीमकडून जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी रेल्वे पोलिस दलाने कडक बंदोबस्त लावला होता. ही दुकाने लीजवर देण्यात आली होती. मध्य रेल्वेने दुकाने खाली करण्यासाठी वारंवार नोटीस बजावल्या होत्या. अखेर बुधवारी सकाळपासून कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, रेल्वे पोलिस दलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या उपस्थितीत इंजिनीअरींग विभागाचे २० व रेल्वे पोलिसांच्या ५० जवानांच्या उपस्थितीत दुकाने तोडण्यात आली. अजनी पूल ते कम्युनिटी हॉल चौकदरम्यान २७ दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे आता पाच हजार चौरस फुटाची जागा रिकामी झाली आहे. ही जागा मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रशासनातर्फे अजनी केबल पुलासाठी ‘महारेल’ला देण्यात आली आहे.

- २२० मीटर लांब पूल, १९० कोटींचे टेंडर

१९२७ मध्ये इंग्रजांनी बनविलेल्या अजनी रेल्वे पुलाची स्थिती खस्ता झाली आहे. या पुलाच्या जागी राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून रामझूल्याच्या धर्तीवर २२० मीटर लांब पूल बनविण्यात येत आहे. हा पूल रामझुल्याप्रमाणे केबलवर आधारित असेल. या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी महापालिकेने महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन म्हणजे महारेलला दिली आहे.

महारेलने २२० मीटर लांब अजनी केबल पुलाच्या निर्मितीसाठी १९० कोटींचे टेंडर काढले आहे. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच या प्रोजेक्टसाठी निधीची तरतूद अजून व्हायची आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेच केबल पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे महारेलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

- दोन दिवस पूर्वीपासून कारवाईचे संकेत

दोन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे कॉलनीच्या दुकानदारांना दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. सोमवारी काही दुकानदारांनी आपली दुकाने खाली केली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात बातमीही प्रकाशित केली होती. तसेच उर्वरीत दुकानांवर लवकरच बुलडोजर चालविण्यात येईल, असे संकेतही दिले होते. अखेर मध्य रेल्वेने बुधवारी ही कारवाई केली.

- अनेक कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न

हे दुकानदार अनेक वर्षांपासून जमीन लीजवर घेऊन दुकान चालवित होते. बुधवारी झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांच्या चेहऱ्यांवर निराशा होती. त्यांचे म्हणणे होते की, दुकानांच्या भरोश्यावर १०० हून अधिक कुटुंबाचे घर चालत होते. आता त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात दुकानातील कर्मचारीदेखील आहे. दुकाने जमीनदोस्त झाल्याने त्यांचा रोजगार हिरावला आहे. सरकार व प्रशासनाकडून काही मदत झाली असती तर दुसरीकडे दुकान सुरू करून कुटुंबाचे पालनपोषण करता आले असते. आता आम्ही कुठे व्यवसाय करणार, असा सवाल येथील दुकानदारांनी केला.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर