शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कळमना बाजारात लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:00 IST

Red chillies Kalmana market गेल्या सोमवारी कळमना बाजारात लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली आहे. मिरचीची खेप आणखीन उतरणार असल्याने मिरचीचे भावही घसरणार असल्याचे भाकीत व्यापारी वर्तवत आहेत.

ठळक मुद्देआवक वाढल्याने भाव घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांची सुरू झाली लगबग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या सोमवारी कळमना बाजारात लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली आहे. मिरचीची खेप आणखीन उतरणार असल्याने मिरचीचे भावही घसरणार असल्याचे भाकीत व्यापारी वर्तवत आहेत. त्याच अनुषंगाने आतापासूनच व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या भिवापुरी लाल मिरची बाजारात उतरायला लागली आहे. यासोबतच अन्य उत्पादक क्षेत्रातूनही लाल मिरचीचे आगमन मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील मिरची बाजारात व्हायला लागले आहे. सद्यस्थितीत ही आवक सामान्य मानली जात असून, डोमेस्टिक, एक्सपोर्टर्स व स्टॉकिस्ट्सकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने लाल मिरचीचे दर ५-७ रुपयांनी वाढले आहेत. मात्र, १५ मार्च नंतर लाल मिरचीची आवक वाढल्यावर हे दर कमी होतील, असे भाकीत ठोक व्यापाऱ्यांकडून होत आहे.

कळमना येथे प्रत्येक सोमवारी शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी केली जाते. त्याच अनुषंगाने सोमवारी कळमना येथे २५ हजार पोती लाल मिरचीचे उतरली. यात भिवापूरसह अन्य स्थानिक शेतकऱ्यांचे ७ हजार पोती, चिखली-बुलडाणा-राजुरा आदी महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांवरून ७ हजार आणि आंध्रप्रदेश येथील गुंटूर, खम्ममचे १० ते १२ हजार लाल मिरचीच्या पोत्यांचा समावेश असल्याचे कळमना मिरची बाजारातील ठोक व्यापारी संजय वाधवानी यांनी सांगितले. यंदा लाल मिरचीचे उत्पादन उत्तम झाल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात आवक वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

सद्यस्थितीत १२० ते १६० रुपये किलो

भिवापूर, मांढळ येथील रोशनी लाल मिरची होलसेलमध्ये १२० ते १४० रुपये, राजुरा येथील देवनूर डिलक्स लाल मिरची १३० ते १६० रुपये, एण्डो-५ लाल मिरची १३० ते १५० रुपये, ३४१ ग्रेड लाल मिरची १३० ते १६० रुपये,खम्मम/गुंटूर ची तेजा मिरची १४० ते १५५ रुपये, ३३४ ग्रेडची लाल मिरची १२० ते १२५ रुपये किलो दराने सद्य:स्थितीत विकली जात आहे. हे दर येत्या काळात आवक वाढल्यावर घसरण्याची शक्यता आहे.

ओरिजनल भिवापुरी मिरची महाग

ओरिजनल भिवापुरी लाल मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने, ही मिरची २०० रुपये किलो दराने विकली जात असल्याचे मिरची उत्पादक शेतकरी नारायण चौधरी यांनी सांगितले. भिवापुरी हायब्रिडचे दरही २०० रुपये किलो सुरू आहे. कमी उत्पादन क्षमता असल्याने शेतकरी ओरिजनल भिवापुरीऐवजी हायब्रिड लाल मिरचीचे पीक घेण्यावर भर देत आहेत. विशेष म्हणजे हिरवी भिवापुरी मिरची प्रारंभिक अवस्थेतच तोडून देशाच्या अन्य भागात विकली जात असल्याने, ओरिजनल भिवापुरी मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे. ओरिजनलला जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) मिळाल्यावरही कृषी विद्यापीठाकडून या मिरचीचे उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने अनुसंधान केले जात नसल्याने शेतकरी हायब्रिडकडे आकर्षित होत असल्याचे नारायण चौधरी म्हणाले.

टॅग्स :market yardमार्केट यार्डnagpurनागपूर