शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वर्षभरात २,४२६ चिमुकल्यांचा मृत्यू; पूर्व विदर्भातील धक्कादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 07:10 IST

Nagpur News २०२०-२१ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते एक या वयोगटात २४२६ शिशूंचे मृत्यू झाले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८८६ मृत्यू आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे बालमृत्यू रोखण्याच्या योजनेलाच ‘ग्रहण’!

सुमेध वाघमारे

नागपूर : बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन योजना आखून त्यावर कोट्यवधींचा खर्च करीत आहे, असे असतानाही मृत्यूदर रोखण्यात हवे तसे यश मिळत नसल्याचे वास्तव आहे. आता तर कोरोनाच्या नावाखाली या योजनांनाच ग्रहण लागल्याने पूर्व विदर्भात शिशू मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. २०२०-२१ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते एक या वयोगटात २४२६ शिशूंचे मृत्यू झाले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८८६ मृत्यू आहेत.

शासनाने बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ रुग्णवाहिकेची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट सेवा व मानव विकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, मोफत औषधी व मोफत प्रवासही दिला जातो. त्यानंतरही अपेक्षित यश मिळत नसल्याने जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.

-योजनेतील मनुष्यबळ कोरोना प्रतिबंधाच्या कार्यात

आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी असलेल्या योजनांमधील काही डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची ड्युटी ‘कोविड केअर सेंटर, ‘कोविड हेल्थ सेंटर’, ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’, लसीकरण केंद्र, चाचणी केंद्र व ‘ट्रेसिंग’च्या कार्यात लावली आहे. यामुळे प्रभावीपणे योजना राबविणे शक्य नाही.

-कमी न होता, पाच वर्षांत वाढले शिशू मृत्यू

२०१४-१५मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात २०६६ शिशूमृत्यूंची नोंद होती. यात भंडाऱ्यात ४३४, गोंदियात ४८५, चंद्रपूरमध्ये १५०, गडचिरोलीत ५९८, वर्धेत २२५ तर नागपूर जिल्ह्यात १७४ मृत्यू होते. परंतु, मागील पाच वर्षांत ही संख्या कमी न होता उलट वाढली. २०२०-२१ मध्ये २४२६ मृत्यूची नोंद झाली. यात भंडाऱ्यात २३७, गोंदियात २८८, चंद्रपूरमध्ये ४७४, गडचिरोलीत ३७६, वर्धेत १६५ तर नागपूर जिल्ह्यात नागपूर ८८६ मृत्यू झाले.

-२०२०-२१ या वर्षात शून्य ते एक या वयोगटातील मृत्यू

जिल्हा : मृत्यू

नागपूर : ८८६

भंडारा : २३७

चंद्रपूर : ४७४

गडचिरोली : ३७६

गोंदिया : २८८

वर्धा : १६५

- हा ‘सिस्टम’चा दोष

श्रीलंका व बांगलादेशाच्या तुलनेत भारताचा बालमृत्यूदर अधिक आहे. केरळचा तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर जास्त आहे. याचा अभ्यास करणाऱ्या व उपाययोजना करणाऱ्या सिस्टमचा हा दोष आहे. बालमृत्यू रोखणे हा खर्चीक कार्यक्रम नाही. ‘सिस्टम’ने योग्य पद्धतीने काम केल्यास व आजाराच्या लक्षणांची व उपाययोजनांची घराघरात माहिती पोहोचविल्यास मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य आहे.

-डॉ. सतीश देवपुजारी, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू