शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २,४२६ चिमुकल्यांचा मृत्यू; पूर्व विदर्भातील धक्कादायक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 07:10 IST

Nagpur News २०२०-२१ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते एक या वयोगटात २४२६ शिशूंचे मृत्यू झाले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८८६ मृत्यू आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे बालमृत्यू रोखण्याच्या योजनेलाच ‘ग्रहण’!

सुमेध वाघमारे

नागपूर : बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन योजना आखून त्यावर कोट्यवधींचा खर्च करीत आहे, असे असतानाही मृत्यूदर रोखण्यात हवे तसे यश मिळत नसल्याचे वास्तव आहे. आता तर कोरोनाच्या नावाखाली या योजनांनाच ग्रहण लागल्याने पूर्व विदर्भात शिशू मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. २०२०-२१ या कालावधीत सहा जिल्ह्यांमध्ये शून्य ते एक या वयोगटात २४२६ शिशूंचे मृत्यू झाले. यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८८६ मृत्यू आहेत.

शासनाने बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ रुग्णवाहिकेची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट सेवा व मानव विकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, मोफत औषधी व मोफत प्रवासही दिला जातो. त्यानंतरही अपेक्षित यश मिळत नसल्याने जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.

-योजनेतील मनुष्यबळ कोरोना प्रतिबंधाच्या कार्यात

आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी असलेल्या योजनांमधील काही डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची ड्युटी ‘कोविड केअर सेंटर, ‘कोविड हेल्थ सेंटर’, ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’, लसीकरण केंद्र, चाचणी केंद्र व ‘ट्रेसिंग’च्या कार्यात लावली आहे. यामुळे प्रभावीपणे योजना राबविणे शक्य नाही.

-कमी न होता, पाच वर्षांत वाढले शिशू मृत्यू

२०१४-१५मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात २०६६ शिशूमृत्यूंची नोंद होती. यात भंडाऱ्यात ४३४, गोंदियात ४८५, चंद्रपूरमध्ये १५०, गडचिरोलीत ५९८, वर्धेत २२५ तर नागपूर जिल्ह्यात १७४ मृत्यू होते. परंतु, मागील पाच वर्षांत ही संख्या कमी न होता उलट वाढली. २०२०-२१ मध्ये २४२६ मृत्यूची नोंद झाली. यात भंडाऱ्यात २३७, गोंदियात २८८, चंद्रपूरमध्ये ४७४, गडचिरोलीत ३७६, वर्धेत १६५ तर नागपूर जिल्ह्यात नागपूर ८८६ मृत्यू झाले.

-२०२०-२१ या वर्षात शून्य ते एक या वयोगटातील मृत्यू

जिल्हा : मृत्यू

नागपूर : ८८६

भंडारा : २३७

चंद्रपूर : ४७४

गडचिरोली : ३७६

गोंदिया : २८८

वर्धा : १६५

- हा ‘सिस्टम’चा दोष

श्रीलंका व बांगलादेशाच्या तुलनेत भारताचा बालमृत्यूदर अधिक आहे. केरळचा तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर जास्त आहे. याचा अभ्यास करणाऱ्या व उपाययोजना करणाऱ्या सिस्टमचा हा दोष आहे. बालमृत्यू रोखणे हा खर्चीक कार्यक्रम नाही. ‘सिस्टम’ने योग्य पद्धतीने काम केल्यास व आजाराच्या लक्षणांची व उपाययोजनांची घराघरात माहिती पोहोचविल्यास मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य आहे.

-डॉ. सतीश देवपुजारी, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू