शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

धोका वाढला, हिवतापामुळे गेले २१ जीव; गडचिरोलीत १३, गोंदिया, चंद्रपूरमध्ये प्रत्येकी ४ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:00 IST

आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

नागपूर : मागील वर्षी पाऊस लांबल्याने व मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून हिवतापामुळे २१ जणांचा जीव गेला. यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील १३, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी ४ मृत्यू आहेत.

२०३० पर्यंत देश हिवतापमुक्त करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले आहे. परंतु नागपूर विभागातील २१ मृत्यूंनी आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. विभागाने आतापासून हिवताप नियंत्रण कार्यक्रमाला गंभीरतेने घेत हिवतापासाठी अतिसंवेदनशील गावांना लक्ष्य केले आहे.

- तीन वर्षात पहिल्यांदाच वाढले मृत्यू

उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळने माहिती अधिकारात अभय कोलारकर यांना उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपूरसह गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व वर्धा जिल्हा मिळून तीन वर्षांत हिवातापाचे मृत्यू वाढल्याचे पुढे आले. नागपूर विभागात २०२० मध्ये ७,०५१ रुग्ण व १३ मृत्यू, २०२१ मध्ये १२,९९९ रुग्ण व १४ मृत्यू तर २०२२ मध्ये ९,७२९ रुग्ण व २१ मृत्यूची नोंद झाली.

- डेंग्यूचा एकही मृत्यू नाही

नागपूर विभागात २०२० मध्ये डेंग्यूचे ५०३ रुग्ण व २ मृत्यू असताना २०२१ मध्ये रुग्णांची संख्या जवळपास सात पटीने वाढून ३,६२८ झाली. या वर्षी २४ रुग्णांचे बळी गेले. मात्र, २०२२ मध्ये रुग्णांची संख्या पुन्हा कमी होऊन ५५२ वर स्थिरावली. विशेष म्हणजे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

- टायफाइड, कॉलराच्या रुग्णांत वाढ

नागपूर विभागात मागील वर्षी जलजन्य आजारांमध्ये विषमज्वर (टायफाइड) व पटकी (कॉलरा) या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली. २०२० मध्ये टायफाइडचे २,७७१ रुग्ण आढळून आले असताना २०२२ मध्ये रुग्णांची संख्या ६,८५८ वर गेली. तर २०२० मध्ये कॉलराचा एकही रुग्ण नसताना २०२२ मध्ये तब्बल ३६८ रुग्ण व ७ मृत्यूंची नोंद झाली.

- स्वाइन फ्लूचे ६२ मृत्यू

२०२० मध्ये स्वाइन फ्लूचे ६ रुग्ण असताना २०२२ मध्ये तब्बल ५५९ रुग्ण आढळून आले. यातील ६२ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील वर्षी स्क्रब टायफसच्या रुग्णांतही वाढ झाली. ५५ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली.

- सहा जिल्ह्यात कोरोनाचे १४५ मृत्यू

कोरोना संपला असला तरी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात १,३५,८४९ रुग्ण आढळून आले. यातील १४५ रुग्णांचे मृत्यू झाले.

टॅग्स :Healthआरोग्यVidarbhaविदर्भ