शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: August 3, 2023 16:50 IST

बीआरएसकडून फटाके फोडून कर्जमाफीचे स्वागत

नागपूर : तेंलगणातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या सरकारने तब्बल १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. याशिवाय शेतकऱ्यांना हवी ती मदत दिली जात आहे. तेलंगणा सरकार हे करू शकते तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक माजी आ. चरण वाघमारे यांनी केली.

तेलंगणातील कृषी कर्जमाफी बद्दल गुरुवारी नागपुरातील बीआरएसच्या कार्यालयात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी चरण वाघमारे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. मात्र, २५ टक्क्यांहून अधिक शेतकरी यापासून आजही वंचित आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्प्यात सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील हजारो शेतकरी केवायसी अभावी वंचित आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापोटी ५० हजार रुपये देण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांठी कर्जमाफीसह विविध योजना प्रबावीपणे राबवून शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केल्याचा दावा वाघमारे यांनी केला.

दिवसा १२ तास वीज का नाही ?

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याची मागणी विधानसभेत लावून धरत होते. त्यासाठी मोर्चे काढत होते. आता ते उपमुख्यमंत्री असून ऊर्जामंत्रीही आहेत. त्यांना स्वत:च्या मागणीचे समाधान का केले नाही, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज का देत नाहीत, असा सवालही वाघमारे यांनी केला.

‘शासन आपल्या दारी’चा प्रचारासाठी वापर

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सेवा हमी कायदा मंजूर करण्यात आला. त्या अंतर्गत कोणते शासकीय काम किती वेळेत व्हावे व ते न झाल्यास काय कारवाई करावी, हे ठरवून देण्यात आले आहे. असे असताना सरकारला ‘शासन आपल्या दारी’ची गरज का पडत आहे. हजारो प्रकरणे प्रलंबित ठेवायची. मग एकत्र शिबिर घेऊन त्याचा गाजावाजा करून प्रचार करायचा, असा प्रकार सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शिबिरांवर ५० कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जात आहे, असा आरोपही वाघमारे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी