शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: August 3, 2023 16:50 IST

बीआरएसकडून फटाके फोडून कर्जमाफीचे स्वागत

नागपूर : तेंलगणातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या सरकारने तब्बल १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. याशिवाय शेतकऱ्यांना हवी ती मदत दिली जात आहे. तेलंगणा सरकार हे करू शकते तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक माजी आ. चरण वाघमारे यांनी केली.

तेलंगणातील कृषी कर्जमाफी बद्दल गुरुवारी नागपुरातील बीआरएसच्या कार्यालयात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी चरण वाघमारे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. मात्र, २५ टक्क्यांहून अधिक शेतकरी यापासून आजही वंचित आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्प्यात सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील हजारो शेतकरी केवायसी अभावी वंचित आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापोटी ५० हजार रुपये देण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली. मात्र, ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांठी कर्जमाफीसह विविध योजना प्रबावीपणे राबवून शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केल्याचा दावा वाघमारे यांनी केला.

दिवसा १२ तास वीज का नाही ?

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याची मागणी विधानसभेत लावून धरत होते. त्यासाठी मोर्चे काढत होते. आता ते उपमुख्यमंत्री असून ऊर्जामंत्रीही आहेत. त्यांना स्वत:च्या मागणीचे समाधान का केले नाही, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज का देत नाहीत, असा सवालही वाघमारे यांनी केला.

‘शासन आपल्या दारी’चा प्रचारासाठी वापर

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सेवा हमी कायदा मंजूर करण्यात आला. त्या अंतर्गत कोणते शासकीय काम किती वेळेत व्हावे व ते न झाल्यास काय कारवाई करावी, हे ठरवून देण्यात आले आहे. असे असताना सरकारला ‘शासन आपल्या दारी’ची गरज का पडत आहे. हजारो प्रकरणे प्रलंबित ठेवायची. मग एकत्र शिबिर घेऊन त्याचा गाजावाजा करून प्रचार करायचा, असा प्रकार सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शिबिरांवर ५० कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जात आहे, असा आरोपही वाघमारे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी