शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

वन्यप्राण्यांनी घेतले पावणे दोनशे नागरिकांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:26 IST

गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील ४६ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल १७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

ठळक मुद्देराज्यातील मागील ४६ महिन्यांची आकडेवारी : २८ हजारांहून अधिक पशूंचा मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील ४६ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल १७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१६-१७ पासून ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले, पीडित किंवा त्यांच्या नातेवाईकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पशुधनाचे किती प्रमाणात नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२० या कालावधीत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांचा बळी गेला. यात ६० महिला तर ११५ पुरुषांचा समावेश होता. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक ५३ नागरिकांचा बळी गेला तर २०१९-२० मध्ये १० महिन्यांत ३६ लोक मरण पावले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी १७ कोटी ७० लाख रुपयांची मदत करण्यात आली. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना १० लाख ११ हजार ४२८ रुपयांची मदत मिळाली.२८ हजार पाळीव प्राणी भक्ष्यस्थानी४६ महिन्यांच्या या कालावधीत २८ हजार ८७९ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून २४ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांची मदत करण्यात आली.वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व मदतवर्ष             मृत्यू        एकूण मदत२०१६-१७    ५३        ४,२४,००,०००२०१७-१८    ५०        ४,००,००,०००२०१८-१९     ३६        ४,०६,००,०००२०१९-२० (जानेवारीपर्यंत) ३६     ५,४०,००,०००पशुधन हानीवर्ष               मृत जनावरे                       नुकसानभरपाई२०१६-१७     ५,९६१                              ३,६७,७६,०००२०१७-१८      ६,९०९                             ५,८४,५९,०००२०१८-१९       ८,३११                              ८,०२,७६,०००२०१९-२० (जानेवारीपर्यंत) ७,७९८        ७,१७,१६,०००

टॅग्स :wildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता