शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

व्हेंटिलेटर मिळालेच नाही, १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 12:06 IST

२४ तास 'ती' 'अंबू बॅग'वरच होती

नागपूर : १७ वर्षीय मुलीची गंभीर होत असलेली प्रकृती पाहून गरीब आई-वडिलांनी मोठ्या आशेने तिला यवतमाळहून नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती केले. परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी तिला ‘अंबू बॅग’वर ठेवले. सलग २४ तासांपेक्षा जास्त तास तिचे आई-वडील ‘अंबू बॅग’ दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करीत होते. याची माहिती गुरुवारी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षकांनाही देण्यात आली. परंतु ती युवती ‘व्हीआयपी ’ नसल्याने तिला व्हेंटिलेटर मिळाले नाही. अखेर शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. 

आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालयाची नागपूर मेडिकलची ओळख आहे. परंतु येथे सोयी उपलब्ध असताना रुग्ण वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाची उणीव असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला १५ सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्र.४८ मध्ये भरती केले. तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता. तिला व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु व्हेंटिलेटर नसल्याने तिला ‘अंबू बॅग’वर ठेवले. याची माहिती सायंकाळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांना देण्यात आली. परंतु त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही. अखेर तिने शुक्रवारी दुपारी ‘अंबू बॅग’ वरच शेवटचा श्वास घेतला.

- वॉर्ड क्र. ४८ मधील दोन व्हेंटिलेटर बंद

वैष्णवीला भरती करण्यात आलेल्या वॉर्ड क्र. ४८ मध्ये दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु दोन्ही बंद आहेत. दुरुस्तीसाठी कोणीच पाठपुरावा केला नसल्याची माहिती आहे.

- काय आहे अंबू बॅग

‘बॅग व्हॉल्व्ह मास्क’ किंवा ‘ मॅन्युअल रिसुसिटेटर ’ किंवा ‘सेल्फ-इन्फ्लेटिंग बॅग’ म्हणून ‘अंबू बॅग’ ओळखले जाते. व्हेंटिलेटर उपलब्ध होईपर्यंत नातेवाईकांना हाताने एक रबराचा फुगा दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागतो. वैष्णवीचे आई-वडील सलग २४ तासांपेक्षा जास्त तास ते दाबत होते.

- मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या माहितीनुसार मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर असून यातील १९६ सुरू आहेत. तरीही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. त्यावेळी या सर्व व्हेंटिलेटरवर रुग्ण होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

- गंभीर असताना सामान्य वॉर्डात उपचार

वैष्णवीची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी ही याची माहिती नातेवाईकांना दिली होती. परंतु त्यानंतरही तिच्यावर सामान्य वॉर्डात उपचार सुरू होते. तिला ‘आयसीयू’ मध्ये स्थानांतरीत का करण्यात आले नाही, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यूMedicalवैद्यकीयnagpurनागपूर