शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

व्हेंटिलेटर मिळालेच नाही, १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 12:06 IST

२४ तास 'ती' 'अंबू बॅग'वरच होती

नागपूर : १७ वर्षीय मुलीची गंभीर होत असलेली प्रकृती पाहून गरीब आई-वडिलांनी मोठ्या आशेने तिला यवतमाळहून नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती केले. परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी तिला ‘अंबू बॅग’वर ठेवले. सलग २४ तासांपेक्षा जास्त तास तिचे आई-वडील ‘अंबू बॅग’ दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करीत होते. याची माहिती गुरुवारी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षकांनाही देण्यात आली. परंतु ती युवती ‘व्हीआयपी ’ नसल्याने तिला व्हेंटिलेटर मिळाले नाही. अखेर शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. 

आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालयाची नागपूर मेडिकलची ओळख आहे. परंतु येथे सोयी उपलब्ध असताना रुग्ण वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाची उणीव असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला १५ सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्र.४८ मध्ये भरती केले. तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता. तिला व्हेंटिलेटरची गरज होती. परंतु व्हेंटिलेटर नसल्याने तिला ‘अंबू बॅग’वर ठेवले. याची माहिती सायंकाळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांना देण्यात आली. परंतु त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही. अखेर तिने शुक्रवारी दुपारी ‘अंबू बॅग’ वरच शेवटचा श्वास घेतला.

- वॉर्ड क्र. ४८ मधील दोन व्हेंटिलेटर बंद

वैष्णवीला भरती करण्यात आलेल्या वॉर्ड क्र. ४८ मध्ये दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु दोन्ही बंद आहेत. दुरुस्तीसाठी कोणीच पाठपुरावा केला नसल्याची माहिती आहे.

- काय आहे अंबू बॅग

‘बॅग व्हॉल्व्ह मास्क’ किंवा ‘ मॅन्युअल रिसुसिटेटर ’ किंवा ‘सेल्फ-इन्फ्लेटिंग बॅग’ म्हणून ‘अंबू बॅग’ ओळखले जाते. व्हेंटिलेटर उपलब्ध होईपर्यंत नातेवाईकांना हाताने एक रबराचा फुगा दाबून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागतो. वैष्णवीचे आई-वडील सलग २४ तासांपेक्षा जास्त तास ते दाबत होते.

- मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या माहितीनुसार मेडिकलमध्ये २२१ व्हेंटिलेटर असून यातील १९६ सुरू आहेत. तरीही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. त्यावेळी या सर्व व्हेंटिलेटरवर रुग्ण होते का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

- गंभीर असताना सामान्य वॉर्डात उपचार

वैष्णवीची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी ही याची माहिती नातेवाईकांना दिली होती. परंतु त्यानंतरही तिच्यावर सामान्य वॉर्डात उपचार सुरू होते. तिला ‘आयसीयू’ मध्ये स्थानांतरीत का करण्यात आले नाही, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यूMedicalवैद्यकीयnagpurनागपूर