शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

रागाच्या भरात १६० बालकांनी सोडले घर

By admin | Updated: April 25, 2017 01:59 IST

लहानपणी चांगले संस्कार मिळाले की मुले संस्कारक्षम होतात. परंतु घरातील परिस्थितीच बालमनावर विपरीत परिणाम करणारी असल्यास बालकांचाही संताप अनावर होतो.

रेल्वेस्थानकावर आढळले : बालमनातील रागाचा होतोय विस्फोटदयानंद पाईकराव नागपूरलहानपणी चांगले संस्कार मिळाले की मुले संस्कारक्षम होतात. परंतु घरातील परिस्थितीच बालमनावर विपरीत परिणाम करणारी असल्यास बालकांचाही संताप अनावर होतो. रोजच्या कटकटीतून मुक्त होण्याचे विचार त्यांच्या मनात येतात अन् ठाम निश्चय करून ते घराबाहेर पडतात. होय, जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर रागाच्या भरात घर सोडून आलेले १६० बालक लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनला आढळल्याची धक्कादायक माहिती आहे.घरातून बाहेर पडल्यानंतर बालक मिळेल ती रेल्वेगाडी पकडून कुठेही जातात. पोलिसांच्या हाती लागले तर ठीक नाही तर या बालकांचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. असामाजिक तत्त्वांच्या हाती लागून ही बालके चोरी करणे, भीक मागणे या गुन्ह्यांकडे वळतात. देशात अशा प्रकारच्या बालकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे महिला व बालविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने २७ जुलै २०१५ पासून देशातील २० रेल्वेस्थानकावर रेल्वे चाईल्ड लाईनचे काम सुरू केले. नागपुरात हे काम वरदान संस्थेच्या अध्यक्षा वासंती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयिका गौरी देशपांडे आणि त्यांची चमू पाहते. रेल्वे चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी प्लॅटफॉर्मवर बसतात. एखादा बालक एकटा दिसल्यास त्याची चौकशी करतात. बालक घरातून पळून आल्याचे आढळल्यास त्याच्या पालकांशी संपर्क साधून बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. चाईल्ड वेलफेअर कमिटीच्या आदेशावरून काही बालकांना निरीक्षण गृहात पाठविण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावर जानेवारी २०१७ मध्ये ३४ बालके, फेब्रुवारीत ४३, मार्चमध्ये ४६ आणि एप्रिल महिन्यात ३७ असे एकूण १६० बालक घर सोडून आल्याची आकडेवारी आहे. यावरून लहान मुलांच्या मनातील रागाचा कसा विस्फोट होतो आहे, याची प्रचिती येते. रेल्वे चाईल्ड लाईनच्या माध्यमातून या बालकांना गुन्हेगारी जगताकडे जाण्यास परावृत्त करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम होत आहे.ही आहेत घर सोडण्याची कारणेनागपुरात देशाच्या चारही दिशांनी रेल्वेगाड्या येतात. त्यामुळे बहुतांश बालक घर सोडल्यानंतर येथे पोहोचतात. घरातून बाहेर पडलेल्या बालकात वडिलांनी अभ्यासासाठी रागावणे, क्षुल्लक कारणावरून रागावणे, वडिलांकडून दारू पिऊन मारहाण, आईवडिलांमध्ये दररोज होणारे भांडण ही मुख्य कारणे आहेत. तर शाळकरी १४ ते १७ या वयोगटातील अनेक मुले-मुली प्रेमात पडल्यामुळे पळून जाताना आढळतात.अनेकांची नसते घरी परतण्याची इच्छापळून आलेल्या बालकांपैकी अनेक बालकांची घरी परतण्याची इच्छा नसते. त्यामुळे अशा बालकांना बाल कल्याण समिती जे. जे. अ‍ॅक्टनुसार निरीक्षणगृहात पाठविते. निरीक्षणगृहात पाठविताना या बालकांचे मूळ वातावरणात बदल होऊ नये यासाठी त्यांच्या राज्यातील निरीक्षणगृहात पोलिसांच्या संरक्षणात या बालकांना दाखल करण्यात येते.रेल्वे चाईल्डलाईनची आरपीएफला मदतपूर्वी रेल्वेस्थानकावर घरून पळून आलेले बालक आढळल्यास आणि त्यांच्या पालकांचा पत्ता नसल्यास या बालकांना सांभाळण्याचे काम आरपीएफला करावे लागत होते. परंतु रेल्वे चाईल्ड लाईनची सुरुवात झाल्यामुळे आरपीएफ कागदोपत्री कारवाई करून या बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविते. रेल्वे चाईल्ड लाईनमुळे आरपीएफचे काम सोपे झाले आहे.’-ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे नागपूर विभाग