शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात १६० बालकांनी सोडले घर

By admin | Updated: April 25, 2017 01:59 IST

लहानपणी चांगले संस्कार मिळाले की मुले संस्कारक्षम होतात. परंतु घरातील परिस्थितीच बालमनावर विपरीत परिणाम करणारी असल्यास बालकांचाही संताप अनावर होतो.

रेल्वेस्थानकावर आढळले : बालमनातील रागाचा होतोय विस्फोटदयानंद पाईकराव नागपूरलहानपणी चांगले संस्कार मिळाले की मुले संस्कारक्षम होतात. परंतु घरातील परिस्थितीच बालमनावर विपरीत परिणाम करणारी असल्यास बालकांचाही संताप अनावर होतो. रोजच्या कटकटीतून मुक्त होण्याचे विचार त्यांच्या मनात येतात अन् ठाम निश्चय करून ते घराबाहेर पडतात. होय, जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर रागाच्या भरात घर सोडून आलेले १६० बालक लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनला आढळल्याची धक्कादायक माहिती आहे.घरातून बाहेर पडल्यानंतर बालक मिळेल ती रेल्वेगाडी पकडून कुठेही जातात. पोलिसांच्या हाती लागले तर ठीक नाही तर या बालकांचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. असामाजिक तत्त्वांच्या हाती लागून ही बालके चोरी करणे, भीक मागणे या गुन्ह्यांकडे वळतात. देशात अशा प्रकारच्या बालकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे महिला व बालविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने २७ जुलै २०१५ पासून देशातील २० रेल्वेस्थानकावर रेल्वे चाईल्ड लाईनचे काम सुरू केले. नागपुरात हे काम वरदान संस्थेच्या अध्यक्षा वासंती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयिका गौरी देशपांडे आणि त्यांची चमू पाहते. रेल्वे चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी प्लॅटफॉर्मवर बसतात. एखादा बालक एकटा दिसल्यास त्याची चौकशी करतात. बालक घरातून पळून आल्याचे आढळल्यास त्याच्या पालकांशी संपर्क साधून बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. चाईल्ड वेलफेअर कमिटीच्या आदेशावरून काही बालकांना निरीक्षण गृहात पाठविण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावर जानेवारी २०१७ मध्ये ३४ बालके, फेब्रुवारीत ४३, मार्चमध्ये ४६ आणि एप्रिल महिन्यात ३७ असे एकूण १६० बालक घर सोडून आल्याची आकडेवारी आहे. यावरून लहान मुलांच्या मनातील रागाचा कसा विस्फोट होतो आहे, याची प्रचिती येते. रेल्वे चाईल्ड लाईनच्या माध्यमातून या बालकांना गुन्हेगारी जगताकडे जाण्यास परावृत्त करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम होत आहे.ही आहेत घर सोडण्याची कारणेनागपुरात देशाच्या चारही दिशांनी रेल्वेगाड्या येतात. त्यामुळे बहुतांश बालक घर सोडल्यानंतर येथे पोहोचतात. घरातून बाहेर पडलेल्या बालकात वडिलांनी अभ्यासासाठी रागावणे, क्षुल्लक कारणावरून रागावणे, वडिलांकडून दारू पिऊन मारहाण, आईवडिलांमध्ये दररोज होणारे भांडण ही मुख्य कारणे आहेत. तर शाळकरी १४ ते १७ या वयोगटातील अनेक मुले-मुली प्रेमात पडल्यामुळे पळून जाताना आढळतात.अनेकांची नसते घरी परतण्याची इच्छापळून आलेल्या बालकांपैकी अनेक बालकांची घरी परतण्याची इच्छा नसते. त्यामुळे अशा बालकांना बाल कल्याण समिती जे. जे. अ‍ॅक्टनुसार निरीक्षणगृहात पाठविते. निरीक्षणगृहात पाठविताना या बालकांचे मूळ वातावरणात बदल होऊ नये यासाठी त्यांच्या राज्यातील निरीक्षणगृहात पोलिसांच्या संरक्षणात या बालकांना दाखल करण्यात येते.रेल्वे चाईल्डलाईनची आरपीएफला मदतपूर्वी रेल्वेस्थानकावर घरून पळून आलेले बालक आढळल्यास आणि त्यांच्या पालकांचा पत्ता नसल्यास या बालकांना सांभाळण्याचे काम आरपीएफला करावे लागत होते. परंतु रेल्वे चाईल्ड लाईनची सुरुवात झाल्यामुळे आरपीएफ कागदोपत्री कारवाई करून या बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविते. रेल्वे चाईल्ड लाईनमुळे आरपीएफचे काम सोपे झाले आहे.’-ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे नागपूर विभाग