शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

नागपुरातील गारमेंट उद्योगाला १५०० कोटीचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 07:00 IST

नागपुरात एक हजाराच्या आसपास लहानमोठे उत्पादक आहेत. त्यांच्याकडे अजनूही तयार गारमेंट आणि गारमेंट तयार करण्यासाठी खरेदी केलेला कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल पडून आहे.

ठळक मुद्देकोरोनातच गेले सणकच्चा आणि फिनिश माल पडून

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा सर्व सण कोरोना महामारीत गेले आहेत. पुढे येणारे नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणावरही कोरोनाचे संकट दिसून येत आहे. कोरोनामुळे यंदा उन्हाळ्यात लग्नसराई आणि अन्य सणात गारमेंटची विक्री न झाल्याने नागपुरातील गारमेंट उद्योगाला जवळपास १५०० कोटींचा फटका सहन करावा लागल्याची माहिती आहे.गारमेंट उद्योगासाठी नागपूर ही विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशासाठी मोठी व मुख्य बाजारपेठ आहे. नागपुरात तयार झालेली शेरवानी, कुर्ता-पायजामा, टी-शर्ट, पॅन्ट, जीन्स आदींची होलसेल आणि किरकोळ भावात सर्वत्र विक्री होते. नागपुरात एक हजाराच्या आसपास लहानमोठे उत्पादक आहेत. त्यांच्याकडे अजनूही तयार गारमेंट आणि गारमेंट तयार करण्यासाठी खरेदी केलेला कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल पडून आहे.गारमेंट क्लस्टरचे प्रमुख विपुल पंचमतिया म्हणाले, नागपुरातील उत्पादक फिनिश मालासाठी संपूर्ण देशातून कच्च्या मालाची खरेदी करतात. उन्हाळ्यात लग्नसराई आणि शालेय पोषाखांसाठी उत्पादकांनी जानेवारीपासूनच कच्च्या मालाची खरेदी केली आणि गारमेंट तयार करण्यास सुरुवात केली. पण २० मार्चपासून राज्यात आणि २५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाले आणि राज्य व केंद्र शासनाने उत्पादकांवर अनेक बंधने लादली. याशिवाय लग्नसराईवर बंधने आणून केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली. त्यामुळे लग्नसराईत लग्नापूर्वी आणि लग्नानंतरच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या परिधानाची खरेदी केली जाते.

पण यंदा ग्राहकांकडून खरेदी झाली नाही. मालाची विक्री न झाल्याने यावर्षी उत्पादकांना लग्नसराईच्या ७०० ते ८०० कोटी रुपयांच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले. याशिवाय ईद, गणेशोत्सव, महालक्ष्मी या सणांवरही कोरोनाचे संकट आले. त्यामुळे लोकांनी नवीन कपड्यांची खरेदीच केली नाही. आता आॅक्टोबरमध्ये येणारे नवरात्र, दसरा आणि नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या दिवाळी सणावरही कोरोना महामारीचे संकट उभे राहिले आहे. विक्री होणार वा नाही, या संभ्रमात उत्पादक असल्याने त्यांनी गारमेंटची निर्मिती अजूनही सुरू केलेली नाही.उत्पादकांनी सांगितले, कोरोनामुळे लोकांमध्ये फारसा उत्साह नसल्याने यंदा दसरा आणि दिवाळी सण साजरे होणार नाहीत आणि गारमेंटची विक्री होणार नाही, अशी भीती उत्पादकांमध्ये आहे. यंदाच्या सणात थोडीफार नवीन आणि जुन्या गारमेंटची विक्री होणार आहे. त्यामुळे उत्पादक कच्चा माल खरेदी करून फिनिश माल तयार करण्याची कुणाचीही मानसिकता नाही. कच्चा माल खरेदी केल्यास व्यापाऱ्यांचे पैसे आणि बँकांचे कर्ज व्याजासह परत करावे लागते. माल विकला नाही आणि तो पडून राहिल्यास उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. उत्पादकांच्या बैठकीत प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीवर कच्चा माल खरेदी करून फिनिश माल तयार करावा, असे ठरले आहे. त्यामुळे कुणीही जोखीम घेण्यास तयार नाहीत. पुढील वर्षी बघू, असे उत्तर काही उत्पादकांनी दिल्याची माहिती आहे.

विक्रेते म्हणाले, बाजारात नवीन कपडे खरेदीसाठी कुणीही येत नाही. आवश्यक तेवढीच खरेदी लोकांकडून होत आहे. त्यामुळे विक्रेतेही नवीन गारमेंट दुकानात ठेवण्यास इच्छुक नाहीत. जुन्या मालाच्या विक्रीसाठी काहींनी सेलचे आयोजन केले. पण यंदा हवा तसा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळालेला नाही. त्यामुळे व्यापारी निराश आहेत. सध्या व्यवसाय ना तोटा ना नफा, या तत्त्वावर सुरू आहे. पुढे परिस्थिती पाहून विक्रेते दुकानात गारमेंटचा भरणा करतील, असे काही विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :businessव्यवसाय