शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

१५ दिवसांत बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 7:43 PM

राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्र्यांचे आश्वासनअर्ज देताना बियाण्यांचे ‘रॅपर’ लावणे अनिवार्य नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील मुद्दा अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला.बोंडअळीचे संकट हे मानवनिर्मित आहे.शेतकऱ्यांचे यंदा यामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून त्यांना एकरी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच अर्ज करताना बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट रद्द करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.याला उत्तर देताना खोत यांनी आतापर्यंत शासनाकडे पाच लाख तक्रार अर्ज आले असल्याचे स्पष्ट केले. अर्ज दाखल करताना ‘रॅपर’ सादर करणे अनिवार्य राहणार नाही. केवळ बियाणे खरेदीची पावती जोडली तरी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. ‘नॉन बी.टी.’ तपासणीसाठी ९९६ नमुने काढण्यात आले. त्यापैकी १५१ नमुने अप्रमाणित आढळून आले. ११० प्रकरणांमध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या असून इतर प्रकरणांतदेखील असेच पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.कुठलीही कंपनी असो, गुन्हे दाखल होतीलअप्रमाणित नमुने आढळणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. कंपनी कितीही मोठी असली तरी तिच्यावर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी खोत यांनी सभागृहाला सांगितले. शिवाय दोषयुक्त बियाण्यांना विक्रीअगोदर प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीagricultureशेती