शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

‘मुद्रा’ योजनेचा १५ कोटी लोकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 8:42 PM

देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. २०१५ नंतर ४४ महिन्यांत वर्षांत मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशभरातील १५ कोटींहून अधिक लघु व मध्यम उद्योग चालविणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज मिळाले. कर्जाची रक्कम ही सात लाख कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे४४ महिन्यांतील आकडेवारी : सात लाख कोटींहून अधिक कर्जाचे वाटपमाहितीच्या अधिकारातून समोर आली बाब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. २०१५ नंतर ४४ महिन्यांत वर्षांत मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशभरातील १५ कोटींहून अधिक लघु व मध्यम उद्योग चालविणाऱ्या व्यावसायिकांना कर्ज मिळाले. कर्जाची रक्कम ही सात लाख कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे विचारणा केली होती. २०१५-१६ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत किती लाभार्थ्यांना मुद्रा योजनेंतर्गत कर्जवाटप झाले, कर्जाचा आकडा किती होता तसेच किती रक्कम ‘एनपीए’मध्ये आली आहे, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१८ या ४४ महिन्यांच्या काळात देशभरात १५ कोटी ३३ लाख २६ हजार ६९२ लोकांना कर्जवाटप करण्यात आले. कर्जाची रक्कम ही ७ लाख ९ हजार ६२२ कोटी इतकी होती. भारतीय रोजगार क्षेत्रात मोठ्या संख्येने सामावून घेतलेल्या लघुउद्योगांना आर्थिक साहाय्य पुरविणे हा मुद्रा कर्ज योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांत कर्ज दिले जाते. शिशू योजनेंतर्गत ५० हजार, किशोर योजनेंतर्गत पाच लाख तर तरुण योजनेंतर्गत मोठ्या उद्योजकांना १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.‘एनपीए’चा आकडा १६ हजार कोटींहून अधिकअनेक कर्जदारांनी मिळालेल्या कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ केली आहे. बँकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्यास दाद न दिल्याने ही कर्जखाती ‘एनपीए’ करण्यात आली आहेत. ३१ डिसेंबर २०१८ अखेर या योजनेंतर्गत ‘एनपीए’ खात्यांची संख्या ही ३१ लाख ९५ हजार ७५१ इतकी होती व ‘एनपीए’ची रक्कम ही १६ हजार २५८ कोटी इतकी होती.व्यावसायिकांचा प्रतिसाद वाढीसदरम्यान, २०१५-१६ पासून दरवर्षी या योजनेला व्यावसायिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. २०१५-१६ मध्ये सुमारे ३ कोटी ४८ लाख लोकांना कर्जवाटप करण्यात आले. २०१६-१७ मध्ये हाच आकडा जवळपास ३ कोटी ९७ लाखांवर गेला. २०१७-१८ मध्ये तब्बल ४ कोटी ८१ लाख लोकांनी या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतले. तर २०१८-१९ मधील पहिल्या आठ महिन्यांतच ३ कोटी ६ लाख लोकांना कर्ज देण्यात आले.

 

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता