शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे १४ कोटी बेरोजगार; सीएमआयई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 09:51 IST

गेल्या ४०-४५ दिवसांपासून सुरू असलेल्या कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे तब्बल १४ कोटी व्यक्ती बेरोजगार झाल्या असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) ताज्या अहवालात काढला आहे.

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या ४०-४५ दिवसांपासून सुरू असलेल्या कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे तब्बल १४ कोटी व्यक्ती बेरोजगार झाल्या असल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) ताज्या अहवालात काढला आहे.भारतात १३० कोटी लोकसंख्येपैकी ४० कोटी व्यक्ती कुठला ना कुठला रोजगार करून उपजीविका चालवतात. सर्वात जास्त रोजगार साधारणत: २०.५० कोटी कृषी क्षेत्राकडून निर्माण होतो. त्यानंतर उद्योग क्षेत्राकडून ५.६० कोटी, बांधकाम क्षेत्राकडून ५.४० कोटी, व्यापार/व्यवसाय ४.६० कोटी, प्रवासी व मालवाहतूक २.३० कोटी व इतर क्षेत्रे १.६० कोटी असा रोजगार निर्माण होतो. (तक्ता बघा)गेल्यावर्षी भारतातील बेरोजगारी ४५ वर्षांच्या नीचांकी अशा ६.१० टक्क्यांवर आली असल्याचा अहवाल इंडियन स्टॅटिस्टिक्स आॅर्गनायझेशनने (आयएसओ) दिला होता. याचा अर्थ गेल्यावर्षी १३० कोटींपैकी ६.१० टक्के म्हणजे ७.८० कोटी व्यक्ती बेरोजगार होत्या. आता सीएमआयईच्या अहवालाप्रमाणे जर १४ कोटी नवीन रोजगार तयार झाले असतील तर देशातील एकूण बेरोजगारांची संख्या २१ ते २२ कोटी झाली असा याचा अर्थ आहे. सध्या लॉकडाऊनमुळे याची शहानिशा करणे शक्य वाटत नाही. पण कोरोनामुळे रोजगाराची भयावह स्थिती निर्माण झाली आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी कामगार/कर्मचाऱ्यांना परत कार्यप्रवण करण्याचे मोठे आव्हान देशासमोर आहे.कामगार तुटवडा होणारकृ षी क्षेत्र सोडून जो २० कोटी रोजगार निर्माण होतो, त्यापैकी ५० टक्के म्हणजे १० कोटी कामगार स्थलांतरित असतात. देशाच्या पूर्व भागातील अविकसित राज्यांमधून विकसित अशा पश्चिमेकडील राज्यांमध्ये हे स्थलांतर होते. सध्या हे सर्व स्थलांतरित कामगार आपापल्या राज्यात परत गेले आहेत किंवा त्या तयारीत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी पैशाबरोबरच मजूर/कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे.कामगारांसाठी प्रोत्साहन पॅकेज हवेसरकारने पैशाची सोय करण्यासाठी आजवर तीन प्रोत्साहन पॅकेजमार्फत ५.२४ लाख कोटी अर्थव्यवस्थेत सोडले आहेत. पण ते पुरेसे नाहीत. किमान २० लाख कोटींची अधिक आवश्यकता आहे. ती रिझर्व्ह बँकेने चलनी नोटा छापून पूर्ण करावी. हा नव्याने येणारा पैसा पायाभूत सुविधा क्षेत्रात (इन्फ्रास्ट्रक्चर) व लघु व मध्यम उद्योगात प्राथमिकतेने गुंतवला जावा. त्यामुळे रोजगार निर्मिती होईल.कामगार तुटवडा झाला तर मजुरीचे दर वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकारने उद्योग/व्यवसाय क्षेत्रात पगार सुरक्षा प्रणाली (सॅलरी प्रोटेक्शन सिस्टिम) लागू करावी. यामुळे कामगार/कर्मचारी कामावर परत येतील. प्रोत्साहन पॅकेजमध्ये सरकारने मुदती व खेळत्या भांडवली कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तीन महिने मुदतवाढ दिली आहे. अशीच मुदतवाढ सरकारी देणी, अधिभार, उदा. लायसन्स फी, भाडे, सेवा शुल्क व अधिभार भरण्यासाठीही मिळावी व त्यावर व्याज व दंड आकारला जाऊ नये.कोविड-१९ महामारीमुळे अर्थव्यवस्थेसमोर अभूतपूर्व संकट उभे झाले आहे. अर्थव्यवस्था सुरू करण्यासाठी कामगार/कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यावश्यक नव्हे अनिवार्य आहे. सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीत अभूतपूर्व निर्णयांची जनतेला अपेक्षा आहे. ती सरकारने पूर्ण करावी व अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करावी.भारतातील एकूण रोजगारकृ षी क्षेत्र २०.५० कोटीउद्योग क्षेत्र ५.६० कोटीबांधकाम क्षेत्र ५.४० कोटीव्यापार/व्यवसाय ४.६० कोटीप्रवासी/मालवाहतूक २.३० कोटीइतर सर्व क्षेत्रे १.६० कोटी(लेखक लोकमत समूहाचे वाणिज्य संपादक आहेत.)

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस