शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 20:35 IST

डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १७ आॅगस्ट रोजी खात येथील १७ वर्षीय मुलीचा तर २० आॅगस्ट रोजी वाडी येथील ५७ वर्षीय इसमाचा डेंग्यू संशयित म्हणून मृत्यू झाल्याने डेंग्यूला घेऊन भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात : ६२ रुग्णांची नोंद : वाडीत संशयित रुग्णाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १७ आॅगस्ट रोजी खात येथील १७ वर्षीय मुलीचा तर २० आॅगस्ट रोजी वाडी येथील ५७ वर्षीय इसमाचा डेंग्यू संशयित म्हणून मृत्यू झाल्याने डेंग्यूला घेऊन भीतीचे वातावरण आहे.एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यू डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होत असल्याने जवळजवळ अर्धा जिल्हा तापाने फणफणला आहे. वस्त्यावस्त्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डेंग्यू संशयित रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे चित्र आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषद व महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विभागाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे वास्तव आहे. यातच वारंवार तपासणीत एकाच घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असताना त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला नाही. परिणामी, जनजागृतीच्या भरवशावर हा विभाग डेंग्यूवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.शहरात ४६ तर ग्रामीणमध्ये १६ रुग्णमहानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे एकट्या आॅगस्ट महिन्यात शहरात २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर जानेवारी ते आतापर्यंत रुग्णांची संख्या ४६वर पोहचली आहे. नागपूर ग्रामीणमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत १६ रुग्णांची नोंद झाली आहे.नागपूर ग्रामीणमध्ये दोन संशयिताचा मृत्यूनागपूर ग्रामीणमध्ये खात येथील रहिवासी प्राचिता चंद्रभान आंबिलडुके (१७) या मुलीचा १७ आॅगस्ट रोजी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दत्तवाडी स्मृतीनगर येथील रहिवासी बालाजी फकिरा भुडे (५७) यांचा मृत्यू २० आॅगस्ट रोजी झाला. भुडे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यात सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये केलेल्या तपासणीत डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते.नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यातील ९९२ डेंग्यू संशयित रुग्णांची रक्ताची तपासणी केली असता आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नागपूर जिल्ह्यात ६२, वर्धेत ३१, चंद्रपुरात ३३, गडचिरोलीत दोन रुग्ण तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.आरोग्य विभागाकडे प्रभावशाली यंत्रणाच नाहीडेंग्यू डासावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी आरोग्य विभागासोबतच नागरिकांची आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात आहे.शहरातील गेल्या चार वर्षांतील डेंग्यू स्थितीवर्ष                             रुग्ण२०१४                         ६०१२०१५                         २३०२०१६                        १९५२०१७                        २००रोज सात-आठ रुग्णडेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजाराच्या लक्षणावरून उपचार केला जातो. सध्या रोज सात-आठ रुग्ण उपचारासाठी येत आहेत. काही रुग्णांना दाखल करून उपचार करावा लागत आहे. डेंग्यूला कारणीभूत असलेला ‘एडीस’ डास हा कूलर, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, डबके व पावसाचे किंवा स्वच्छ पाणी जिथे जमा राहील अशा ठिकाणी लवकर फैलतो. यामुळे प्रत्येकाने पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. मनपाकडूनही डबक्यांवर कीटकनाशक फवारणी करायला हवी.डॉ. पिनाक दंदेडेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यकडेंग्यूचा डासावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोक सहभागाची आवश्यकता आहे. प्रत्येन नागरिकाने घरात जमा होणाऱ्या पाण्याची, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे.डॉ. प्रशांत जगतापलहान मुलांमध्ये वाढतोय डेंग्यूडेंग्यूचा डास दिवसा चावतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहे. शालेय प्रशासनाने याला गंभीरतेने घेत साचलेल्या पाण्यावर फवारणी करणे, विद्यार्थ्यांना फूल बाह्यांचे शर्ट व पँट घालण्याच्या सूचना करणे, वर्गात विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे.डॉ. अविनाश गावंडे

टॅग्स :dengueडेंग्यूnagpurनागपूर