शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मेट्रोच्या कामगारांना दुपारी १२ ते ४ विश्रांती : उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:24 IST

जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट व शहरात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम बघता महामेट्रो नागपूरतर्फे ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजवणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना दुपारी १२ ते ४ दरम्यान कामगारांकडून काम करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट व शहरात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम बघता महामेट्रो नागपूरतर्फे ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजवणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना दुपारी १२ ते ४ दरम्यान कामगारांकडून काम करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.हिट अ‍ॅक्शन प्लॅन १ ते ३१ मेपर्यंत१ ते ३१ मेपर्यंत ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मे महिन्यात पारा ४५ अंश सेल्सियसवर असतो. वाढत्या पाऱ्यामुळे अंगाची काहिली तर होतेच पण यामुळे उष्माघाताची शक्यता असते. शहरात मेट्रोचे कार्य सर्वत्र सुरू असून उन्हात काम करणाºया कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने नागपूर मेट्रोने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’च्या अंमलबजवणीचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनच्या नियमावलीप्रमाणे उन्हात होणारी सर्व कामे दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान करू नये, अशी स्पष्ट सूचना महामेट्रो प्रशासनाने कंत्राटदारांना दिल्या आहेत.प्रकल्पाच्या कामावर परिणाम नाहीकामगारांची सोय बघता हा प्लॅन राबविला जात असला तरीही यामुळे प्रकल्पाच्या कामावर फरक पडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी कामाच्या वेळापत्रकात बदल करून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत कार्य पूर्ण केले जाईल. अशाप्रकारे कामाच्या वेळेचे नियोजन व बदल केल्याने प्रकल्पाची गती कायम राहीलच, शिवाय कर्मचाऱ्यांना उन्हापासून विश्रांती मिळणार आहे. एकीकडे कामाच्या वेळात बदल होत असतानाच दुसरीकडे मेट्रोच्या कार्यस्थळी कर्मचाºयांच्या सुरक्षतेकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याअंतर्गत कार्यस्थळी सावलीकरिता शेड लावण्यात आले आहेत.पिण्याच्या पाण्याची सोयपिण्याच्या पाण्याच्या सोईसह विविध पेयांच्या माध्यमाने शरीराचे संतुलन बिघडणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे. व ट्राफिक मार्शलकरिता चौकाचौकात कापडी छत्र्या लावण्यात आल्या आहेत. उन्हापासून स्वत:चे रक्षण करण्याकरता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासंबंधी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात येत आहे तसेच उष्माघाताचा त्रास झाल्यास करण्याच्या उपाययोजनांची माहिती मॉकड्रिलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोEmployeeकर्मचारी