शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:49 PM

शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे.

ठळक मुद्दे३७५१ प्रकरण उघडकीसचार्जशीट केवळ २४ वरझोपडपट्टी व दाट वस्तीत अधिक समस्या

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे. वीज वितरण कंपनी याविरुद्ध अनेक वर्षांपासून कारवाई करीत आहे. परंतु गेल्या २०११ पासून विचार केला असता वीज चोरीच्या एकूण ३७५१ प्रकरणांपैकी केवळ २४ प्रकरणातच आरोप पत्र दाखल होऊ शकले . त्यामुळे ही केवळ कागदी कारवाई असल्याचे दिसून येते.शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल कंपनी शहरात वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १६०० मिलियन युनिट (एमयू) वीज घेते. एक एमयूमध्ये १० लाख युनिट असतात. एसएनडीएलनुसार यापैकी १५ टक्के वीज वाया जाते. ७.५ टक्के तांत्रिक (वितरण प्रणाली) हानी होते. तर उर्वरित ७.५ टके वाणिज्यिक हानी असते. या वाणिज्यिक हानीचे सर्वात मोठे कारण वीज चोरीच आहे. युनिटचा विचार केला तर वर्षभरात यामुळे १२५ एम. यू. वीज वाया जात आहे. सध्या विजेचे एक युनिट (इंधन समायोजन व अन्य शुल्क धरून) जवळपास ८ रुपये इतके आहे. या हिशोबाने वर्षभरात १०० कोटी रुपयाची वीज चोरी होत आहे. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर एसएनडीएल आपल्या क्षेत्रात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीज घेते. कंपनीनुसार त्याचे वर्षभराचे वीज बिल एक हजार कोटी रुपयांच्या जवळपास असते. वीज पुरवठा केल्यानंतर कंपनी नागरिकांकडून इलेक्ट्रीसिटी ड्युटी बिल घेते. एकूण व्यवसाय १५०० कोटीच्यावर जातो. यात ७.५ टक्के नुकसान जवळपास १०० कोटी रुपये येतो, असा एसएनडीएलचा दावा आहे. एसएनडीएलने शहरात वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही फिडरचे आॅडिट करून वीज चोरीसाठी कुख्यात असलेले परिसर नोंदवून ठेवले आहे. यात सर्वात वर ताजबाग फीडरचा क्रमांक येतो. या ठिकाणी ८७ टक्के विजेचे नुकसान दर्शविण्यात आलेले आहे.कशी होत आहे वीज चोरीवीज लाईन मीटरपर्यंत येण्यापूर्वीच त्याला वेगळे करून कनेक्शन जोडले जात आहे.मीटरची छेडछाड करून रिमोटद्वारे संचालित करूनवीज मीटरची आयसी खराब करूनविजेच्या लाईनवर आकडे टाकूनमीटरचा डिस्प्ले खराब करूनअनेक भगात तर मीटर जाळण्यात आले आहेट्रान्सफार्मरमधून थेट कनेक्शन घेऊन

टॅग्स :electricityवीजCrimeगुन्हा