शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

शासकीय कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 23:12 IST

100% attendance of employees in government offices जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे निर्देश शासनाने दिले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे निर्देश शासनाने दिले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे.

मार्च व एप्रिल महिन्यांत कोरोनाचे संक्रमण प्रचंड वाढले होते. जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या व मृत्यूची आकडेवारी लक्षात घेता सरकारने ५०, १५ आणि ५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवली होती. जिल्हा परिषद, कोषागार कार्यालयांनी वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाऊनसुद्धा लावले होते. सोबतच अभ्यागतांचे प्रवेश बंद करण्यात आले होते. सिव्हिल लाईन परिसरातील दिवसभर सुरू असलेली सरकारी कर्मचाऱ्यांची वर्दळ मंदावली होती; पण कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत गेले आणि सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती वाढत गेली. आता कार्यालयांमध्ये अभ्यागतांचीही उपस्थिती वाढली आहे. कर्मचारी अधिकारी पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. मंगळवारी सिव्हिल लाईन परिसरात कार्यालय सुरू झाल्याने चांगलीच वर्दळ दिसून आली. वाहनांची संख्या परिसरात वाढलेली होती. सरकारी कार्यालयांत १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. सरकारी कार्यालये पुन्हा गजबजलेली दिसून आली.

 महिला कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

काही महिला कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोनाचा प्रभाव संपला नसल्याने घरातील लहान मुले व वडीलधाऱ्या माणसांबद्दल चिंता व्यक्त करून शासकीय कर्मचाऱ्यांची ३० जूनपर्यंत उपस्थिती ५० टक्के ठेवण्याची भावना व्यक्त केली.

 कर्मचारी संघटनांनी दाखविली सकारात्मकता

कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जुनी प्रलंबित कामे निकाली काढणे, जनतेची कामे, खरीप हंगाम, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, विकासकामांचे नियोजन व अर्थचक्र सुरू राहण्यासाठी कार्यालयांमद्ये कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक आहे.

डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार