शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 23:12 IST

100% attendance of employees in government offices जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे निर्देश शासनाने दिले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे निर्देश शासनाने दिले आहेत. १ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे.

मार्च व एप्रिल महिन्यांत कोरोनाचे संक्रमण प्रचंड वाढले होते. जिल्ह्यात संक्रमित रुग्णांची संख्या व मृत्यूची आकडेवारी लक्षात घेता सरकारने ५०, १५ आणि ५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवली होती. जिल्हा परिषद, कोषागार कार्यालयांनी वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाऊनसुद्धा लावले होते. सोबतच अभ्यागतांचे प्रवेश बंद करण्यात आले होते. सिव्हिल लाईन परिसरातील दिवसभर सुरू असलेली सरकारी कर्मचाऱ्यांची वर्दळ मंदावली होती; पण कोरोनाचे संक्रमण हळहळू कमी होत गेले आणि सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती वाढत गेली. आता कार्यालयांमध्ये अभ्यागतांचीही उपस्थिती वाढली आहे. कर्मचारी अधिकारी पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. मंगळवारी सिव्हिल लाईन परिसरात कार्यालय सुरू झाल्याने चांगलीच वर्दळ दिसून आली. वाहनांची संख्या परिसरात वाढलेली होती. सरकारी कार्यालयांत १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. सरकारी कार्यालये पुन्हा गजबजलेली दिसून आली.

 महिला कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती

काही महिला कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोनाचा प्रभाव संपला नसल्याने घरातील लहान मुले व वडीलधाऱ्या माणसांबद्दल चिंता व्यक्त करून शासकीय कर्मचाऱ्यांची ३० जूनपर्यंत उपस्थिती ५० टक्के ठेवण्याची भावना व्यक्त केली.

 कर्मचारी संघटनांनी दाखविली सकारात्मकता

कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जुनी प्रलंबित कामे निकाली काढणे, जनतेची कामे, खरीप हंगाम, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, विकासकामांचे नियोजन व अर्थचक्र सुरू राहण्यासाठी कार्यालयांमद्ये कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक आहे.

डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार