शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

खैंदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 06:00 IST

पिवळ्याधम्म भंडाऱ्यात रंगलेल्या सांगलीचे हळदीशी एक खास नाते आहे. शंभर दीडशे वर्षांपासून नदीकाठच्या जमिनीच्या पोटातल्या पेवात या गावाने चाळीस लाख पोती हळकुंडे साठवली. ही हळकुंडे साठवा, मग शिजवा, मग वाळवा, मग दळा.. एवढी उस्तवार करून अख्ख्या देशालाच काय, जगाला हळद पुरवणाऱ्या सांगलीचे पिवळे रहस्य शोधत केलेली भटकंती !

ठळक मुद्देहळद मूळची इंडोमलाया आणि चीनमधली. आता ती भारताचीच झालीय. कारण जगभर वापरल्या जाणाऱ्या हळदीपैकी ७० टक्के भारतातलीच असते.

- श्रीनिवास नागे

पिवळीधम्मक हळद म्हटलं की, आपसूक पुढं येतं सांगलीचं नाव. सांगलीची हळदपेठ अख्ख्या देशात नव्हे तर जगात भारी. तिला शंभर - सव्वाशे वर्षांची परंपरा. एकेकाळी जगातले हळदीचे दर सांगलीतून ठरायचे! इथं पिकणारी दर्जेदार राजापुरी हळद, वायदेबाजार, चोख सौदे, बँकांकडून मिळणारे अर्थसाहाय्य, हळद पावडर आणि पॉलिश - प्रक्रियेचे कारखाने - वेअरहाऊस - गोदामं, वाहतूक कंपन्या, अडते, खरेदीदार आणि हमीदार व्यवस्था यामुळे सांगली ‘फेमस’ झाली. सांगलीच्या मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची वर्षाला १७-१८ लाख क्विंटल आवक होते, तर उलाढाल एक हजार कोटींची! २००५ आणि २०१९च्या महापुरात उद्ध्वस्त झालेली नैसर्गिक साठवणूक यंत्रणा, त्यामुळं व्यापाराला बसलेला जबर फटका, २०१७पासून हळदीवर लागू केलेला जीएसटी, कोरोनानं लावलेला ‘ब्रेक’, नवे कायदे, हळद जणू शेतीमाल नसल्याचा निर्माण केलेला संभ्रम आणि आता वाळवलेल्या हळदीसह अडतीवर लावलेला जीएसटी अशा संकटांच्या छाताडावर नाचत इथल्या उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी अजूनही ‘नंबर वन’ सोडलेला नाही.

हळदीला पॉलिश करणारे आणि हळदपूड बनवणारे पन्नासभर छोटे-मोठे कारखाने सांगली परिसरात दिसतात. कारखान्यांचं सगळं आवार पिवळंधम्मक. मार्केट यार्डात केवळ हळदीच्या धंद्यातले ६० - ७० अडते आणि तेवढेच व्यापारी. पाच - सहा बडे निर्यातदार थेट जगभरात निर्यात करणारे. दोन हजारभर हमाल. पाच - सहा हजार लोकांना थेट आणि तेवढ्याच लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देणारा हा उद्योग. देशाच्या अनेक राज्यांमधून हळकुंडं आणून सांगलीतल्या कारखान्यांमध्ये हळदीची पूड तयार केली जाते आणि नंतर तिचा बाजारांना पुरवठा. त्यामुळं इथल्या हळदीला भौगोलिक सूचकांक (जीआय) मानांकन मिळालं नसतं तरच नवल!

हळद मूळची इंडोमलाया आणि चीनमधली. आता ती भारताचीच झालीय. कारण जगभर वापरल्या जाणाऱ्या हळदीपैकी ७० टक्के भारतातलीच असते. भारतात हळदीच्या मुख्यतः दोन जातींची लागवड करतात. त्यांपैकी एका जातीची हळकुंडं कठीण व भडक पिवळ्या रंगाची. तिचा वापर रंगासाठी. तिचं नाव ‘लोखंडी हळद’. दुसऱ्या जातीची हळकुंडं जरा मोठी, कमी कठीण आणि सौम्य पिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणूनच. हळदीचं भारतातलं उत्पादन सहा ते सव्वासहा लाख टनांवर, पण त्यातली केवळ १५ ते २० टक्केच हळद निर्यात होते. उत्पादनात पहिला नंबर आंध्रप्रदेशचा. त्यानंतर तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक. सांगली जिल्ह्यासह कोल्हापूरचा काही भाग, सातारा जिल्ह्यातला कऱ्हाड, मसूर, उंब्रज, वाई या भागांत राजापुरी आणि कोपरा या दोन दर्जेदार वाणांचं उत्पादन घेतलं जातं. हळकुंड, गठ्ठा, बीज, सोरा, चोरा, कोच्या अशा वेगवेगळ्या प्रकारची ही हळद असते. सांगली जिल्ह्यात हळदीचं क्षेत्र कमी असलं तरी सातारा, कऱ्हाड, वाई, तुळजापूर, बार्शी, नांदेड, आंध्र प्रदेशात कडाप्पा, दुग्गीराळा, निझामाबाद, वरंगल, मेट्टापल्ली, राजमहेंद्री, कोडू, राजमपेठ आणि नंद्याळ, तामिळनाडूत इरोड, सालेम, कन्नूर आणि उत्तर कर्नाटकातल्या विजापूर, बेळगाव इथली हळद सांगलीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी येते.

सांगलीच्या काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन १९१०मध्ये हळदीचा वायदे बाजार सुरू केला. व्यापारी एकमेकांच्या शब्दावर विश्वास ठेवून वायदे व्यापाराचे व्यवहार करत. त्यांचं नियंत्रण करणारी संस्था किंवा पैशांच्या देवघेवीसाठी क्लिअरिंग हाऊसची सोय त्यावेळी नव्हती. कायद्याचंही नियंत्रण नव्हतं. स्वातंत्र्यानंतर फॉर्वर्ड कॉन्टॅक्टस (रेग्युलेशन) ॲक्ट १९५२मध्ये अमलात आला. मग सांगलीच्या व्यापाऱ्यांनी वायदे व्यवहाराचं आयोजन आणि नियंत्रण करण्यासाठी ‘द स्पायसेस ॲन्ड ऑईल सीड्स एक्स्चेंज लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. ती ११ सप्टेंबर १९५३ रोजी कंपनी ॲक्टखाली नोंदवण्यात आली. भारत सरकारनं २३ एप्रिल १९५६ रोजी प्रत्यक्षात वायदे व्यापाराचं नियंत्रण करण्यास परवानगी दिली. हळद वायदेबाजारात पहिल्यांदा शेंग आणि हळदीचा व्यापार सुरू झाला. देशातले हळद व्यापारी सांगलीचा भाव विचारून व्यापार करू लागले आणि सांगलीचा हळद बाजार देशात नंबर वन ठरला. व्यापाऱ्यांनी व्यवहारात ठेवलेली सचोटी आणि तत्काळ बिल देण्याची व्यवस्था ही हळद व्यापार वाढीस फायद्याची ठरली.

सांगलीच्या वायदे बाजारात ओरडून लिलाव व्हायचा. पण, तंत्रज्ञानाच्या युगात ही पद्धत कालबाह्य ठरली तरी सांगलीचे वायदे बाजारातले व्यापारी बदलले नाहीत. संगणक, इंटरनेटनं वायदे बाजारात आणलेलं नवं तंत्र इथल्या व्यापाऱ्यांनी स्वीकारलं नाही. परिणामी वायदे बाजार बंद पडला, असं व्यापारी पेढीसोबत हळद प्रक्रिया उद्योग सांभाळणारे शरद शहा सांगतात.

सांगलीच्या मार्केट यार्डातली शाह रतनजी खिमजी ही ९१ वर्षांची पेढी. सध्या त्यांची चौथी पिढी हळदीच्या व्यवसायात आलीय. शरदभाई तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी. हळदीबाबत त्यांचा दांडगा अभ्यास. ते म्हणतात, सांगलीच्या दीड-दोनशे किलोमीटरच्या परिघात तयार होणारी राजापुरी हळद जादा गुणकारी. त्याला कारण इथल्या मातीचा गुणधर्म. इथली हळद राजापूर बंदरातून निर्यात होत होती, म्हणून तिला राजापुरी हळद हे नाव! सांगलीतून वर्षाला एक हजार टन हळद जपानला निर्यात व्हायची. सांगलीच्या राजापुरी हळदीतून चोरा नावाच्या तेलाची निर्मिती होते. त्या तेलापासून चेहऱ्याला लावण्याची आयुर्वेदिक उत्पादनं बनवली जातात. त्यामुळं ती केरळलाही पाठवली जायची.

- सांगलीत अलीकडच्या दहा-बारा वर्षांत आंतरराष्ट्रीय निकषांवर आधारित अत्याधुनिक कारखाने सुरू झालेत. जगाच्या बाजारपेठेत कुठंही माल वेळेत पोहोच करण्याची व्यवस्था झालीय. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली आणि जादा औषधी गुणधर्मांची हळद मोठमोठ्या मॉल्समध्ये चक्क २,२०० रुपये किलोनं विकली जातेय!

वाळवलेली व पॉलिश केलेली हळद शेतीमाल नसल्याचं सांगत महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं अडत्यांनीच जीएसटी भरावा, असा निर्णय जाहीर केला आहे. त्यावरुन सांगलीच्या हळद बाजारात एकच खळबळ उडाली आहे आणि जीएसटीवरुन मतमतांतरांचा खैंदूळ उडाला असतानाच नवा हंगाम तोंडावर आलाय…

 

(वृत्तसंपादक, लोकमत, सांगली)

(छायाचित्रे : नंदकिशोर वाघमारे)