शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

मोबाइल इंटरनेट बिलात स्वस्ताईची आणखी चंगळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 06:05 IST

मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सवलतींची अक्षरशः खैरात वाटली. त्यामुळे कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांवर सरकारचे देणे देण्यासाठी पैशांचा ठणठणाट झाला. या कंपन्यांना तारून नेण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार का?

ठळक मुद्देयेत्या काळात मोबाइल बिल आणखी कमी येईल? डेटा पॅक स्वस्त होईल? - सर्वसामान्यांना या प्रश्नांची उत्कंठा लागून राहिली आहे.

- पवन देशपांडे

आपला मोबाइल डेटा एवढा स्वस्त आहे की, सध्या रोज एक जीबी डेटा वापरला तरी तो महिनाभर पुरतो. कॉलिंग तर जवळपास मोफतच आहे. त्यामुळे मोबाइलचे जाळे आणि स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सवलतींची अक्षरशः खैरात वाटली. त्यामुळे कठीण परिस्थितीतून जात असलेल्या कंपन्यांवर सरकारचे देणे देण्यासाठी पैशांचा ठणठणाट झाला. या कंपन्यांना तारून नेण्यासाठी सरकारने अनेक योजना जाहीर केल्या. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार का? मोबाइल बिल कमी येईल का? डेटा पॅक स्वस्त होईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. या नव्या धोरणामुळे अनेक गोष्टीही बदलणार आहेत.

ग्राहकांना काय फायदा?

तोट्यात चालत असलेल्या टेलिकॉम कंपन्या सेवांचे दर वाढवण्याचा विचार करत होत्या. काहींनी त्याची सुरुवातही केली होती.

आता हा दरवाढीचा सिलसिला थोडा मंदावणार आहे. काही काळ दरवाढ पुढे ढकलली जाईल.

कारण, सरकारने कंपन्यांना व्याजात सूट दिली आहे. कोट्यवधी रुपये त्यातून वाचणार आहेत.

काही बड्या कंपन्या नवे ग्राहक मिळवण्यासाठी इतरांपेक्षा स्वस्त पॅकेजेसही आणू शकतात. त्यामुळे ग्राहकांना फायदाच होईल.

कागदपत्रांची झंजट मिटेल

नव्या मोबाइल कनेक्शनसाठी कागदपत्रे द्यावी लागत होती. ही झंजट कदाचित येत्या काही काळात संपून जाईल.

सर्व कंपन्या डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे मंजूर करतील. त्यासाठी आधारचा डेटाही वापरला जाऊ शकतो.

४०० कोटी कागदांचा डोंगर या कंपन्यांकडे साचला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट होताना किंवा प्रीपेडमधून पोस्टपेडमध्ये कन्व्हर्ट करतानाही कागदपत्रे द्यावी लागत होती. आता ती द्यावी लागण्याची शक्यता कमी आहे.

डिजिटल केवायसीची सुविधा आता सुरू करण्यात येणार आहे.

स्पर्धा वाढेल, किंमत पुन्हा घटेल

टेलिकॉम कंपन्यांमध्ये आता १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना परदेशातून निधी जमवणे सोपे होईल. त्यामुळे गुंतवणूकदार तर मालामाल होतीलच. शिवाय, स्पर्धा वाढल्याने सेवांच्या किमतीही पुन्हा कमी होऊ शकतात.

सध्या कोणाचे किती ग्राहक?

एकूण ग्राहक- १२० कोटी

रिलायन्स जिओ- ४३.६ कोटी

भारती एअरटेल- ३५.२ कोटी

व्होडाफोन आयडिया- २७.३ कोटी

बीएसएनएल- १२.५ कोटी

एमटीएनएल- ६२.८ लाख

(जून २०२१ ची आकडेवारी)

 

(सहायक संपादक, लोकमत)

pavan.deshpande@lokmat.com