शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शेतकरी नवरा का नको गं बाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:31 IST

कधी काळचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं समाजसूत्र आता मोडीत निघालं आहे. मुलाला नोकरीच हवी, फार झाले तर व्यवसाय चालेल; पण शेती करणारा नवरा नकोच, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येणार आहे.

ठळक मुद्दे यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

- शरद यादव

कृषिप्रधान समजल्या कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात पूर्वी शेतीला प्रतिष्ठा होती. नोकरी म्हणजे दुसऱ्यांची चाकरी करणे, असा मतप्रवाह होता. काळानुसार यात बदल होत गेला व शेतीची प्रतिष्ठा कमी होत गेली. बेभरवशाचा पाऊस, शेती मालाला न मिळणारा हमीभाव, शासनाचे मनमानी धोरण यामुळे शेती करणे म्हणजे मन:स्ताप वाढवून घेणे, असा समज घट्ट होत गेला.९० च्या दशकापर्यंत शेतीची प्रतिष्ठा टिकून होती. ९२-९३ नंतर जागतिकीकरण, उदारीकरणाच्या वाºयात शेतमालाचे उत्पादन वाढले; पण हमीभावाअभावी शेतकरी कंगाल बनत गेला. याच दरम्यान, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम शिकविणाºया संस्था वाढल्या. यातून शिकलेल्या तरुणाईला नोकºयाही मिळाल्या. महिन्याच्या ठरावीक तारखेला होणारा पगार व नोकरीची श्वाश्वती यामुळे स्थिरता येत गेली. याउलट उत्पादन जास्त झाल्याने दर पडला म्हणून शेतकरी कांदे, टोमॅटो रस्त्यावर टाकू लागला, ऊस आणि दुधाला रास्त भाव मिळावा, यासाठी रस्ते अडवू लागला. कधी महापूर, तर कधी कडक दुष्काळ असे दुष्टचक्र त्याला कीटकनाशक पिण्यास उद्युक्त करू लागले. बघता बघता ‘शेतकरी आत्महत्या’ हा चर्चासत्राचा, चिंतेचा विषय बनला. यातूनच साधारण २०१० पासून शेतकरी मुलाचे लग्न ठरणे कठीण बनल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा हे राज्यातील पाणीदार जिल्हे म्हणून ओळखले जातात. बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे मळे या भागात फुलले. पण, या पट्ट्यातसुद्धा ‘शेतकरी नवरा नको’, अशी मानसिकता ठाम होऊ लागली आहे.

दहा ते पंधरा एकर शेती असणा-या शेतकरी पुत्रालाही नोकरी नाही म्हणून मुलीकडून येणारा नकार अस्वस्थ करीत आहे. यातून भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.चित्रपट, साहित्यातून रंगवले चित्र

काही चित्रपट, साहित्य यांतून शेतकरी म्हणजे अठराविश्वे दारिद्र्य, ग्रामीण ढंगात बोलणारा, घरात चुलीवर जेवण करणारा, चाबूक खांद्यावर घेऊन फिरणारा, असे चित्र निर्माण केले. या आभासी चित्राचा परिणाम मुलींच्या मानसिकतेवर झाल्याचे दिसून येते; पण आज साधनसुविधेचा झालेला विकास पाहता शेतकºयाच्या घरातही चुलीची जागा गॅसने घेतली आहे. शेतकरी युवक सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. ग्रामीण भागात वाढलेली बांधकामे पाहता खेड्यांचा तोंडवळा आता शहरी बनू लागला आहे. परिणामी शेतकºयाच्या जीवनात गुणात्मक बदल झालेला दिसतो; पण मुलींच्या डोक्यात शेतकरी म्हणजे वनवासी, असे मत पक्के बनल्याचे दिसून येते.

शेतक-याच्या मुलीला नोकरदारच हवाएखाद्या शेतकºयाला दोन मुली व एक मुलगा असेल, तर तोसुद्धा नोकरदारच जावई शोधतो. आयुष्यभर शेतात चिखल तुडविणाºयालासुद्धा शेतकरी युवक आपल्या मुलींना सुखात ठेवेल, याची खात्री वाटत नसेल तर शहरी लोकांकडून कोणती अपेक्षा करायची.

‘हम दो, हमारा एक फ्लॅट...’टीव्हीवर दररोज मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. या मालिकांतून शहरातील फ्लॅटमध्ये राहणे, नोकरी करणारा नवरा, आठवड्यातून एक-दोन दिवस बाहेर जेवण, असे छानछौकी जीवन दाखविण्यात येते. याचाही परिणाम मुलींवर झालेला दिसतो. शेतकरी कुटुंबात जाणे म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती आली, शिवाय स्वातंत्र्यावरही मर्यादा येणार, अशी भीती वाटत असल्याने ‘हम दो हमारा एक फ्लॅट सुनहरा’, असेच स्वप्न मुली रंगवत असल्याचे दिसते.

मुलींची संख्या कमी...मुलांची संख्या जास्त व तुलनेने कमी मुली यामुळे वधू-पित्याच्या अपेक्षा वाढल्या. नोकरी हवीच, शिवाय जोडीला थोडी शेतीही हवी. बंगला, गाडी हवी, अशा अपेक्षांची यादी वाढल्याने शेतकरीपुत्र या यादीतून बाहेर फेकला गेल्याचे चित्र दिसते.

वीर सेवा दलाचा अभिनव प्रयोगबेळगाव जिल्ह्यातील मलिकवाड येथील वीर सेवा दलाने गतवर्षी शेतकरीपुत्र वधू-वर मेळावा घेतला. याबाबत रावसाहेब कुन्नुरे म्हणाले, नोव्हेंबर २०१८ मध्ये आम्ही असा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात २२ विवाह ठरले. यासाठी आम्ही ७७ गावांत बैठका घेतल्या. अशा उपक्रमाला समाजाचे पाठबळ मिळत नसल्याने आमचा हा प्रयत्न थंडावला.

शासनाच्या धोरणामुळे शेतक-याचे मरणशेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी पुत्राची अशी अवस्था झाल्याचे ‘स्वाभिमानी’चे नेते डॉ. जालंदर पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागात लग्न न ठरलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. शासनाने शेतीमालाला रास्त भाव देण्याचे धोरण अंगीकारले तरच हा प्रश्न सुटू शकतो.

...तर आत्महत्यांचे दृष्टचक्रगेल्या काही महिन्यांपासून वर्तमानपत्र उघडले की, आत्महत्येची बातमी नाही असे कधीच होत नाही. या समस्या भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दृष्टी बदला सृष्टी बदलेलसर्वांनीच नोकरी करायची म्हटले तर आपल्याला लागणारे दोनवेळचे अन्न कोण पिकवणार, याचा विचार करावा. एकरी १०० टन ऊस पिकवणारा, एकरात ४० टन केळी घेणारा, शेतकरी युवक उद्याच्या जगाचा मूलभूत आधार असणार आहे. यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

 

(लेखक, ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

 

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न