शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

शेतकरी नवरा का नको गं बाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:31 IST

कधी काळचं उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं समाजसूत्र आता मोडीत निघालं आहे. मुलाला नोकरीच हवी, फार झाले तर व्यवसाय चालेल; पण शेती करणारा नवरा नकोच, अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येणार आहे.

ठळक मुद्दे यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

- शरद यादव

कृषिप्रधान समजल्या कृषिप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात पूर्वी शेतीला प्रतिष्ठा होती. नोकरी म्हणजे दुसऱ्यांची चाकरी करणे, असा मतप्रवाह होता. काळानुसार यात बदल होत गेला व शेतीची प्रतिष्ठा कमी होत गेली. बेभरवशाचा पाऊस, शेती मालाला न मिळणारा हमीभाव, शासनाचे मनमानी धोरण यामुळे शेती करणे म्हणजे मन:स्ताप वाढवून घेणे, असा समज घट्ट होत गेला.९० च्या दशकापर्यंत शेतीची प्रतिष्ठा टिकून होती. ९२-९३ नंतर जागतिकीकरण, उदारीकरणाच्या वाºयात शेतमालाचे उत्पादन वाढले; पण हमीभावाअभावी शेतकरी कंगाल बनत गेला. याच दरम्यान, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम शिकविणाºया संस्था वाढल्या. यातून शिकलेल्या तरुणाईला नोकºयाही मिळाल्या. महिन्याच्या ठरावीक तारखेला होणारा पगार व नोकरीची श्वाश्वती यामुळे स्थिरता येत गेली. याउलट उत्पादन जास्त झाल्याने दर पडला म्हणून शेतकरी कांदे, टोमॅटो रस्त्यावर टाकू लागला, ऊस आणि दुधाला रास्त भाव मिळावा, यासाठी रस्ते अडवू लागला. कधी महापूर, तर कधी कडक दुष्काळ असे दुष्टचक्र त्याला कीटकनाशक पिण्यास उद्युक्त करू लागले. बघता बघता ‘शेतकरी आत्महत्या’ हा चर्चासत्राचा, चिंतेचा विषय बनला. यातूनच साधारण २०१० पासून शेतकरी मुलाचे लग्न ठरणे कठीण बनल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा हे राज्यातील पाणीदार जिल्हे म्हणून ओळखले जातात. बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे मळे या भागात फुलले. पण, या पट्ट्यातसुद्धा ‘शेतकरी नवरा नको’, अशी मानसिकता ठाम होऊ लागली आहे.

दहा ते पंधरा एकर शेती असणा-या शेतकरी पुत्रालाही नोकरी नाही म्हणून मुलीकडून येणारा नकार अस्वस्थ करीत आहे. यातून भविष्यात सामाजिक शांतता धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.चित्रपट, साहित्यातून रंगवले चित्र

काही चित्रपट, साहित्य यांतून शेतकरी म्हणजे अठराविश्वे दारिद्र्य, ग्रामीण ढंगात बोलणारा, घरात चुलीवर जेवण करणारा, चाबूक खांद्यावर घेऊन फिरणारा, असे चित्र निर्माण केले. या आभासी चित्राचा परिणाम मुलींच्या मानसिकतेवर झाल्याचे दिसून येते; पण आज साधनसुविधेचा झालेला विकास पाहता शेतकºयाच्या घरातही चुलीची जागा गॅसने घेतली आहे. शेतकरी युवक सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. ग्रामीण भागात वाढलेली बांधकामे पाहता खेड्यांचा तोंडवळा आता शहरी बनू लागला आहे. परिणामी शेतकºयाच्या जीवनात गुणात्मक बदल झालेला दिसतो; पण मुलींच्या डोक्यात शेतकरी म्हणजे वनवासी, असे मत पक्के बनल्याचे दिसून येते.

शेतक-याच्या मुलीला नोकरदारच हवाएखाद्या शेतकºयाला दोन मुली व एक मुलगा असेल, तर तोसुद्धा नोकरदारच जावई शोधतो. आयुष्यभर शेतात चिखल तुडविणाºयालासुद्धा शेतकरी युवक आपल्या मुलींना सुखात ठेवेल, याची खात्री वाटत नसेल तर शहरी लोकांकडून कोणती अपेक्षा करायची.

‘हम दो, हमारा एक फ्लॅट...’टीव्हीवर दररोज मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. या मालिकांतून शहरातील फ्लॅटमध्ये राहणे, नोकरी करणारा नवरा, आठवड्यातून एक-दोन दिवस बाहेर जेवण, असे छानछौकी जीवन दाखविण्यात येते. याचाही परिणाम मुलींवर झालेला दिसतो. शेतकरी कुटुंबात जाणे म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती आली, शिवाय स्वातंत्र्यावरही मर्यादा येणार, अशी भीती वाटत असल्याने ‘हम दो हमारा एक फ्लॅट सुनहरा’, असेच स्वप्न मुली रंगवत असल्याचे दिसते.

मुलींची संख्या कमी...मुलांची संख्या जास्त व तुलनेने कमी मुली यामुळे वधू-पित्याच्या अपेक्षा वाढल्या. नोकरी हवीच, शिवाय जोडीला थोडी शेतीही हवी. बंगला, गाडी हवी, अशा अपेक्षांची यादी वाढल्याने शेतकरीपुत्र या यादीतून बाहेर फेकला गेल्याचे चित्र दिसते.

वीर सेवा दलाचा अभिनव प्रयोगबेळगाव जिल्ह्यातील मलिकवाड येथील वीर सेवा दलाने गतवर्षी शेतकरीपुत्र वधू-वर मेळावा घेतला. याबाबत रावसाहेब कुन्नुरे म्हणाले, नोव्हेंबर २०१८ मध्ये आम्ही असा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात २२ विवाह ठरले. यासाठी आम्ही ७७ गावांत बैठका घेतल्या. अशा उपक्रमाला समाजाचे पाठबळ मिळत नसल्याने आमचा हा प्रयत्न थंडावला.

शासनाच्या धोरणामुळे शेतक-याचे मरणशेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी पुत्राची अशी अवस्था झाल्याचे ‘स्वाभिमानी’चे नेते डॉ. जालंदर पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागात लग्न न ठरलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. शासनाने शेतीमालाला रास्त भाव देण्याचे धोरण अंगीकारले तरच हा प्रश्न सुटू शकतो.

...तर आत्महत्यांचे दृष्टचक्रगेल्या काही महिन्यांपासून वर्तमानपत्र उघडले की, आत्महत्येची बातमी नाही असे कधीच होत नाही. या समस्या भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दृष्टी बदला सृष्टी बदलेलसर्वांनीच नोकरी करायची म्हटले तर आपल्याला लागणारे दोनवेळचे अन्न कोण पिकवणार, याचा विचार करावा. एकरी १०० टन ऊस पिकवणारा, एकरात ४० टन केळी घेणारा, शेतकरी युवक उद्याच्या जगाचा मूलभूत आधार असणार आहे. यासाठी शेतकरी मुलगा नको, असा हेका सोडा, दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलेली दिसेल.

 

(लेखक, ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

 

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्न