शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

भटकंतीच्या छंदाने ‘स्वप्न’ जगायला शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 4:33 PM

भटकंती करीत आनंद लुटण्यासोबतच विविध भागांतील संस्कृतीचा अभ्यास करीत आणि वाटेत भेटतील त्या सर्वांशी संवाद साधत धावत सुटलेल्या भूषण पाटीलने नुकतेच कच्छचे रण पालथे घातले. ३२०० किलोमीटरचा हा थरारक व तेवढाच आनंददायी आणि ज्ञानाची मोठी शिदोरी पदरी पाडणारा प्रवास त्याने १० दिवसांत पूर्ण केला.  

- दीपक देशमुख

भूषण पाटील हा मराठवाड्यातील लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी. भटकंती करीत विविध भागांना भेटी देण्याचा त्याचा आवडता प्रांत. नवनवीन लोकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्याचे वेड त्याला आजपर्यंत विविध भागांत घेऊन गेले. 

या प्रवासात त्याने चारचाकी वाहनापेक्षा दुचाकीला अधिक महत्त्व दिले. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला, जग अधिक जवळून पाहता यावे, लोकांशी अधिक जवळीक साधता यावी, याचसोबत खडतर आणि अवघड वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करणे सोपे व्हावे यासाठी आवडीची ‘इनफिल्ड थंडरबर्ड’ अर्थात माझी ‘शेरदिल’ निवडली. 

दुचाकीवरून सहलीला खरेतर ‘विकएण्ड’मधून सुरुवात झाली. जवळची पर्यटन स्थळे पालथी घालायला सुरुवात झाली. पुढे लांबच्या प्रवासाचे बेत आखले. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नुकतीच पार पडलेली ‘कच्छ’ सवारी! भूषण सांगत होता, पालकांची परवानगी मिळायला फारसा वेळ लागला नाही. कारण ते मला नेहमीच प्रोत्साहन देत माझ्या पाठीशी उभे राहिले. लगेच तयारीला लागलो. आवश्यक ती तयारी झाली आणि ११ जानेवारी २०१९ रोजी पहाटे ५ वाजता औरंगाबादहून मोहिमेवर निघालो. कच्छचे रण साद घालत होते. प्रवास सुरू झाला. 

लहान-मोठी गावे मागे टाकत गुजरातमध्ये प्रवेश केला. प्रथम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ हे स्मारक गाठले. सारी भव्यदिव्यता डोळ्यात साठवली. धन्य वाटले. त्यानंतर वडोदरामार्गे अहमदाबादला पोहोचलो. साबरमती आणि कांकरिया सरोवर मन भरून पाहिले. गुजरातेतील विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत भुजच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. 

नजर पोहोचेल तिथवर रूपेरी, चंदेरी जमीन आणि पांढरे-नळे आकाश बघून त्या मोहक वातावरणात हरवून गेलो. मन आणि विचार ताजेतवाने झाले. त्यानंतर भूजवरून सौराष्ट्रा शिरलो. काठीयावाडी भोजन आणि मोठ्या मनाची माणसे यामुळेच या भागातील पर्यटन अधिक फुलले असावे. द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गीर अभयारण्य ही ठिकाणे डोळ्याचे पारणे फेडतात, याचा अनुभव घेतला. परतीच्या प्रावासात जुनागढजवळ एका संकटात सापडलो; पण स्थानिक लोक मदतीला धावून आल्याचे सांगताना तो म्हणाला, ‘जगात चांगली माणसे आहेत म्हणूनच हे जग सुंदर बनले आहे. माणुसकी जिवंत आहे, सांस्कृतिक वारसा जिवापाड जपला जातो आहे, याचा प्रत्यय पावलोपावली आला. या प्रवासाने ‘स्वप्न’ जगायला शिकविले.’  

‘अकेला गया था मै, ना आया अकेलामेरे संग संग आया यादों का मेला....’

म्हणत भूषण पाटील सांगत होता, या प्रवासातून मोलाचे अनुभव आले. खूप शिकायला मिळाले. प्रवासात मदत करणारी माणसे भेटली. कधी ऐकटेपणा जाणवलाच नाही. राजकोट, वडोदरा, सुरत असा प्रवास करीत १० व्या दिवशी दुपारी ३.३० वाजता तो ३२२५ किमी भटकंती करून औरंगाबादेत पोहोचला. 

टॅग्स :tourismपर्यटनhighwayमहामार्गbikeबाईक