उठ मेरी जान, ..मेरे साथ ही चलना है तुझे!
By Admin | Updated: November 28, 2015 18:30 IST2015-11-28T18:30:48+5:302015-11-28T18:30:48+5:30
कद्र अबतक तेरी तारिख ने जानी ही नही रोशनी भी तेरे ऑंखो में है, पानी ही नही

उठ मेरी जान, ..मेरे साथ ही चलना है तुझे!
- शबाना आझमी
कद्र अबतक तेरी तारिख ने जानी ही नही
रोशनी भी तेरे ऑंखो में है, पानी ही नही
हार तुने कभी तकदीर से मानी ही नही
तू हकीकत भी है,
दिलचस्प कहानी ही नही
हर अदा तेरी कयामत है, जवानी ही नही
अपनी तारीख का उन्वॉं बदलना है तुङो
उठ मेरी जान,
मेरे साथ ही चलना है तुङो’
माझे वडील कैफी आझमी यांनी 1960च्या सुमारास लिहिलेली ‘औरत’ नावाची ही ‘नज्म’. पण आजही किती लागू पडते. आजही गरज आहे या हाकेची की, उठ मेरी जान.. भौतिकदृष्टय़ा बदलत्या जगात स्वत:ला मानसिकतेच्या पटलांवरून बदलण्यासाठी. आपल्या जाणिवांना नव्या विचारांनी समृद्ध करण्यासाठी ‘उठ मेरी जान’ म्हणण्याची आज ही किती गरज आहे. स्त्री-पुरुष समतेसाठी मनातून भेदाभेदाची जळमटे फेकून स्त्रीच्या शक्तीला ओळखण्यासाठी आजही ही हाक किती समर्पक आहे.
वर्षानुवर्षे आपल्या मनात, भावनांत, जाणिवांत स्त्री-पुरुष असमानतेची बीजे रुजली आहेत, ती सहजासहजी जाणार नाहीत. स्त्रीला दुय्यमत्व देण्याची मानसिकतेची बीजे अनुवांशिकपणो एका पिढीकडून पुढच्या पिढीर्पयत आपोआप येत गेली आहेत. त्यामुळे ती समाजाच्या नसानसांतच खोल मुरलेली आहेत. रुतलेली आहेत. त्यामुळे ही असमानता पुसून काढण्यासाठी, स्त्री सशक्तीकरणासाठी अजून खूप झगडा द्यावा लागणार आहे, यात काही वादच नाही. त्यातच भारत हा देश भिन्न राज्य, भिन्न भाषा, भिन्न धर्म-जाती, भिन्न संस्कृतीसह एकत्र जगतो. इतकेच नव्हे तर आपला देश एकाचवेळी भिन्न-भिन्न शतकांमध्ये जगत असतो. अगदी सतराव्या शतकापासून ते एकविसाव्या शतकापर्यंतची मानसिकता या देशात एकाचवेळी एकत्र नांदताना दिसते. कुठे विचारांचे परमावधीचे मागासलेपण दिसेल, तर कुठे अगदीच खुलेपणा. म्हणजे आपल्याकडे स्त्री पंतप्रधान, स्त्री राष्ट्रपती, लोकसभेची सभापती दिसेल; उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर, विविध कॉर्पोरेट क्षेत्रत विविध पदावर स्त्रिया दिसतील. आणि आपल्या याच समाजात अगदी आजही एखाद्या नवजात अर्भकाच्या गळ्याला नख लावले जाताना दिसेल. कारण ती मुलगी ना! कोणाला हवी आहे ती? - अशा देशाबद्दल एकच, सरसकट विधान करणो खरे म्हणजे किती कठीण आणि गुंतागुंतीचे!
नि:संशयपणो आजच्या जगात, स्त्रियांच्या दृष्टीने खूप सारे बदल झाले आहेत. खूप मोठय़ा प्रमाणात तिचे सशक्तीकरण झाले आहे. मात्र ते तितकेच पुरसे नसल्याचे समाजातील विविध घटनाच सांगतात. बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, मात्र एकाच वेळी विविध शतकात जगण्याच्या आपल्या मानसिकतेमुळे ही प्रक्रिया म्हणावा तसा वेग धरताना दिसत नाही.
पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पगडा काही केल्या जात नाही. म्हणूनच तर आजही मुलगी जन्माला आली की अनेक ठिकाणी रडारड केली जाते आणि मुलगा जन्माला आला की लाडू वाटले जातात. आजही आपल्या समाजात ‘मुलगा’ असणो हे फारच सौभाग्याचे, आनंदाचे मानले जाते. त्याला एखाद्या राजकुमारासारखे वागवले, वाढवले जाते आणि मुली बिचा:या छोटय़ा छोटय़ा संधीसाठी झगडत राहतात. समाजात, हे इतके खोल रुतलेले आहे की नव्या बदलांसाठी जाणिवाच नव्या तयार करण्याची गरज आहे.
माङो बालपण खूप वेगळ्या पद्धतीने गेले. माङो वडील कैफी आझमी कम्युनिस्ट होते. एका इमारतीत आम्ही आठ कुटुंबे राहायचो. भिन्न जाती-धर्माचे कम्यून होते ते. या आठ कुटुंबांसाठी एकच संडास, एकच बाथरूम. मात्र आम्ही गुण्यागोविंदाने राहत होतो. जेमतेम तीनशे चौरस फुटाचे तर घर होते. वडिलांनी कमवून पक्षाला देऊन उरलेल्या चाळीस रुपयांत कुटुंब चालायचे. कैफीसाब म्हणायचे, पैसा जरुरी आहे, मात्र त्याहून अधिक महत्त्वाचे आहे ते म्हणजे चांगली वागणूक. आपल्या वागण्या-बोलण्यात आदर असला पाहिजे. स्त्री-पुरुषांमध्ये अंतर नको तर आदर हवा. आणि घरात हेच वातावरण मी पाहत होते. आई स्टेज आर्टिस्ट होती, त्यामुळे अनेकदा तिला दौ:यावर जावे लागायचे. त्यावेळेस अब्बा घर सांभाळायचे. वेडीवाकडी का असेना, वेणी घालून मला शाळेत पाठवायचे. त्यामुळे घरात कधीच आम्ही स्त्री-पुरुष भेद पाहिला नव्हता.
मी माङया आयुष्यात जे अनुभवत आहे ते प्रत्यक्षात सगळ्यांच्या बाबतीत खरे नसते हे जेव्हा पहिल्यांदा जाणवले, तेव्हा मला किती खोल धक्का बसला होता, ते मी अजून विसरलेले नाही.
वयाच्या 19 व्या वर्षार्पयत तरी जगात स्त्री-पुरुषांना वेगवेगळा न्याय असतो याची मला खबर नव्हती. तोर्पयत मी किती वेगळे विश्व अनुभवत होते आणि प्रत्यक्षातील रूप पाहून धक्का बसणार नाही तर काय? पण हे फक्त आपल्याकडेच आहे असे नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जा, करिअर करणा:या स्त्रियांवरची घरची जबाबदारी काही संपलेली नाही. बाहेर राबून आली तरी घरीही तिनेच राबराब राबायचे, स्वयंपाकासह सारी जबाबदारी एकटीने विनातक्रार पेलायची, हा जणू नियमच.
- आता वेळ आहे ती अशा प्रश्नांकडे बघण्याची. त्यांना बदलण्याची.
प्रश्न सहजासहजी सुटणार नाहीत. बदलाच्या प्रक्रियेला निश्चित वेळ लागणार आहे. शाश्वत बदलांसाठी खूप झटावे लागणार आहे.
- शाश्वत बदल काही एका दिवसात घडत नाहीत. त्यासाठी वर्षानुवर्षांची मेहनत ही घ्यावीच लागते. बदल म्हणजे काही ‘लिटमस टेस्ट’ नाही लगेचच परिणाम दिसायला. अमका रंगबदल म्हणजे तमका बदल. या प्रक्रियेसाठी एकटय़ा-दुकटय़ाने नव्हे, तर समाजाने एकत्र येण्याची गरज असते.
माझा व्यवसाय असणा:या फिल्म इंडस्ट्रीतही आता खूप बदल होऊ लागले आहेत. पूर्वीही स्त्रीकेंद्रित चित्रपट निघायचे. मात्र त्यातील स्त्रियांच्या व्यक्तिरेखा या टिपिकल असायच्या. मै चूप रहुंगी हे या व्यक्तिरेखांचे जणू स्वभावसूत्रच होते. ‘मी गप्प राहीन, मी सहन करीन’ असेच त्या भूमिकांचे रेखाटन असायचे. तेव्हाचे चित्रपट चौकटीबद्ध आणि स्त्रियांविषयीचे ग्रह अधिकाधिक अधोरेखित करणारे होते. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आज स्त्रीकेंद्रित चित्रपटांमध्ये तिचे आधुनिक, नवे आणि बदललेले चित्र पाहायला मिळत आहे, ही खूपच आशादायी बाब आहे. आजही अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना कमी मानधन दिले जाते, मात्र आजच्या अभिनेत्री त्यांनाही त्यांच्या कौशल्याची बरोबरीने किंमत मिळावी यासाठी मागणी करू लागल्या आहेत आणि ही खूपच सकारात्मक बाब आहे. किमान त्या मागणी करू लागलया हा केवढा बदल आहे.
मध्यंतरी शाहरुख खानने एका चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोनचे नाव श्रेयनामावलीत त्याच्याही आधी दिले होते. मला ही बदलाची खूण वाटते. आता शाहरुखसारख्या आघाडीच्या अभिनेत्याने एखाद्या स्त्रीकेंद्रित चित्रपटात दुय्यम रोल स्वीकारला, की या बदलाचे पुढचे पाऊल पडेल. मी त्या दुस:या टप्प्याची वाट पाहते आहे.
बॉलिवूडच्या बाबतीतला एक बदल मात्र माङया डोक्यात संतापाची तिडीक उठवतो.
आयटम नंबर्स!
भाजलेल्या कोंबडीबरोबर दारूच्या घोटासोबत ‘मुङो गटकाले’ असली आमंत्रणो देणा:या या भयाण गाण्याचे कसे समर्थन करता येईल?
लोक म्हणतात, ही तर साधी एण्टरटेन्मेण्ट आहे! मनोरंजन.
हे असले?
अशा गाण्यांत कॅमेरा त्या स्त्रीच्या देहावरून असा फिरत असतो की जणू ती व्यक्ती नाही वस्तू आहे. गाण्यावर नृत्य करणा:या स्त्रीचे नियंत्रण नसते. चित्रभाषा ही कॅमे:याची मालकी असते. पण यातून आपण काहीतरी बिभत्स आणि चुकीचे करत असल्याचे लक्षात कसे येत नाही हेच कळत नाही.
याहून भयानक म्हणजे या आयटम गीतांचे शब्द. त्यांना गीत तरी म्हणावे का ही प्रश्न आहे. अशी गिते कानावर पडतात तेव्हा उलटी आल्यासारखे वाटते. भयंकर चीड येते. गीतकार, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, कॅमेरामन आणि सादरकर्ते असे 8-1क् जण मिळून असे गाणो तयार करतात. ते अर्थातच दोषी आहेत; मात्र या गाण्यांना लोकप्रिय करणारे प्रेक्षक सर्वाधिक दोषी नाहीत का? अशा गीतांना आणि आयटम नंबरला नाकारण्याऐवजी मनोरंजनाच्या नावाखाली आपण डोक्यावर घेत सुटलो तर त्याची जबाबदारी कोणाची? मनोरंजन महत्त्वाचे आहेच; पण त्याचे अंतिम ध्येय काय आहे हे तपासायला नको का? की मनोरंजन म्हणजे बीभत्सपणा, अंगविक्षेप, देहप्रदर्शन इतकेच?
निर्भया प्रकरणानंतर देशातील युवक-युवती रस्त्यावर उतरले होते. त्यांनी निषेध केला होता. स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध आता सगळा समाज एकत्र येऊन लढा देऊ पाहत आहे ही खूपच आश्वासक बाब आहे. निर्भया घटनेच्या वेळी पहिल्यांदा, ‘शिफ्ट द ब्लेम, शिफ्ट द शेम’ अशा घोषणा दिल्या गेल्या. स्त्रीवर अन्याय झाला तरी तिलाच अपराधी म्हणून पाहणा:या किंवा तिनेच अपराध केला असल्यासारखे तोंड लपविण्यास भाग पाडणा:या समाजात हा केवढा मोठा बदल आहे.
माङया मिझबान गावाचे उदाहरण देते. अकरा-बारा वर्षाच्या मुली सिंदूर लावून शाळेत यायच्या. त्यांच्या पालकांना किती सांगितले, समजावले मुलगी किमान अठरा वर्षांची होइपर्यंत तरी तिचे लगA करू नका. पण पालक ऐकायला तयार नसत. हे कितीतरी वर्षे चालले.
अलीकडेच एका नाटय़स्पर्धेसाठी शाळेतील मुलींनी व शिक्षकांनी मिळून हुंडय़ाविरोधी एक नाटक लिहिले व जयपूर येथे त्यांनी सादर केले. त्यांच्या नाटकाला पहिले पारितोषिक मिळाले. मुलींनी त्याचवेळी निग्रह केला की हे पारितोषिक नाही हे तर शस्त्र आहे. त्या गावात परतल्यावर त्यांनी जाहीर केले, गावात अठरा वर्षाच्या आधी कोणत्याही मुलीचे लगA होऊ दिले जाणार नाही.
केवढी मोठी ताकद, मोठा आत्मविश्वास त्यांना मिळाला होता. गावक:यांनीही त्यांचे म्हणणो मान्य केले.
स्त्री सक्षमीकरणासाठी कुटुंबातूनच आपल्याला भेदाभेद मिटवावे लागतील. मुला-मुलींना समतेची वागणूक दिली पाहिजे. मुख्य म्हणजे स्त्रियांच्या हातांना काम दिले पाहिजे. त्यांना कमावते केले पाहिजे. पण पुन्हा प्रश्न हा निर्माण होतो की, केवळ त्यांच्या हातात पैसा आला म्हणजे त्या सक्षम होणार आहेत का? केवळ पैसा येऊन होणार नाहीत, तर त्याचा वापर करण्याची, त्यासाठीचा निर्णय घेण्याची संधी मिळाल्यानंतरच आपला समाज मजबुतीने समतेच्या दिशेने पाऊल उचलू शकेल.
त्यासाठी सगळ्यांनीच आपपले कामधंदे सोडून रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. तसे अपेक्षितही नसते. प्रत्यक्षात जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, बदलाच्या प्रक्रियेसाठी जे झोकून देऊन झटतात, काम करतात, त्यांच्या पाठीशी उभे राहणो, त्यांना पाठिंबा देणो अधिक गरजेचे आहे. तो पाठिंबा काम करणा:यांना प्रेरणादायी असतो. सगळेच काही सामाजिक कार्यकर्ते होऊ शकत नाहीत आणि तशी अपेक्षाही नसते. एवढीशी सोबत ही बदलाच्या नव्या पर्वासाठी खूप मोठी आहे.
आई स्वयंपाकघरात
आणि बाबा ऑफिसात?
शिक्षण हा स्त्रियांच्या सशक्तीकरणाचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र पुन्हा प्रश्न पडतो की, कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि ते कसे देणार?
मध्यंतरी माङया पाहण्यात एक शालेय अभ्यासाचे पुस्तक आले. त्यात प्रश्न होता की, आई काय करते? पुस्तकात उत्तर होते, आई स्वयंपाकखोलीत आहे. दुसरा प्रश्न होता बाबा काय करतात? उत्तर होते, बाबा ऑफिसमध्ये गेले आहेत.
का ही अशी ठोकळेबाज उत्तरे द्यायला शिकवतो आपण आपल्या मुलांना? मुलांसाठी आईला स्वयंपाकघराशी बांधून ठेवण्याची सुरुवात ही इतक्या लवकर का व्हावी?
खरे तर या प्रश्नाच्या उत्तराचे कितीतरी नवे पर्याय आता आपल्या घरांमध्येच नाही का दिसू लागलेले?
बाबा स्वयंपाकघरात आहेत आणि आई ऑफिसला गेलीय. किंवा दोघेही स्वयंपाकघरात आहेत आणि तिथले काम एकत्र आटोपून दोघेही ऑफिसला जाणार आहेत!
- आजकाल तर हे असेच चित्र पाहायला मिळते ना, मग शाळकरी मुलांच्या पुस्तकातले चित्र इतके वेगळे, इतके जुने का? 4-6 वर्षाच्या मुलांवर अशा उत्तरांनी काय बिंबवत असतो आपण? त्यांच्यामध्ये जाणिवा निर्माण करतानाच, कालबाह्य प्रमेये का ठसवतो त्यांच्या मनावर? मग अशा शिक्षणाचा काय उपयोग?
स्त्रियांनी दुय्यम राहावे, दुय्यम काम करावे हे आपल्या गुणसूत्रंतूनच पुढे सरकत जाते. ते बदलण्यासाठी शिक्षणाचा खूप चांगला उपयोग होणार आहे. मात्र त्यासाठी या शिक्षणाच्या प्रक्रियेवरही कटाक्ष ठेवावा लागणार आहे.
आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, काय सांगतो हे खूप महत्त्वाचे आहे.
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’
झोया माझी मुलगी. तिच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातही कटरीना कैफ बिकिनी घालून समुद्रातून बाहेर येते असे एक दृश्य आहे. तिची व्यक्तिरेखा वॉटरस्पोर्ट्स इन्स्ट्रक्टरची आहे. अशी तरुणी सलवार-कुर्ता घालून समुद्रात उतरणार नाही, हे उघड आहे. पण कटरीना बाहेर येते आणि किना:यावर ठेवलेला आपला गाऊन चढवून निघून जाते असे अतीव सहजतेने दाखवणा:या त्या दृश्यात कटरीनाच्या ओलेत्या अवयवांवरून सावकाशीने फिरण्याची परवानगी झोयाने तिच्या कॅमे:याला दिलेली नाही.
मला हे महत्त्वाचे वाटते.
अशा मनोरंजनाला माझी ना नाही!
या नाही तर पुढच्या पिढीत,
बदल हे होतीलच!
उत्तर प्रदेशात माङया अब्बांचे गाव आहे. मिझबान. आपल्या हयातीत त्या गावाची उन्नती व्हावी म्हणून माङो अब्बा खूप झटले. ते अखंड धडपडत असत, पण बदलांचा वेग खूपच मंद होता. कधीकधी मलाच मोठे नैराश्य येई.
शेवटी एकदा न राहवून मी अब्बांना विचारलेही होते, तुम्ही इतके धडपडता. पण गावकरी ढीम्म हलायला तयार नाहीत. तुम्हाला त्रस नाही का होत याचा? वैताग नाही का येत? निराश नाही का होत तुम्ही?
- माङया त्या प्रश्नावर अब्बांनी दिलेले उत्तर पुढे माङया आयुष्याला दिशा देणारे ठरले.
अब्बा म्हणाले, असे पाहा, बदल व्हावा या आशेने प्रयत्न करत राहणो हे आपले काम आहे. तो अपेक्षित बदल तुमच्या हयातीतच झाला पाहिजे असा हट्ट का धरावा? जे योग्य नाही, ते बदलावे यासाठी आपण प्रयत्न करत राहायचे. कदाचित आपण करत असलेल्या प्रय}ांचे यश आपल्याला अनुभवता नाही येणार; मात्र बदल होणार हे तरी निश्चित आहे ना! प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर आपण काम करत राहावे. गोष्टी बदलतात. आपल्या नाही, तर पुढच्या पिढीसाठी तरी खात्रीने बदलतात!
शब्दांकन : हीनाकौसर खान-पिंजार