शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

कुपोषण निर्मूलनाची त्रिसूत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:10 IST

कुपोषण मुक्तीसाठी अचूक नियोजन व त्यासाठी यंत्रणेच्या अचूक वापरातून प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री निश्चित करून वाटचाल केली. लोकसहभाग लक्षणीय वाढवला.

ठळक मुद्देकुपोषित मुले आणि माता यांना पोषक आहार मिळू लागला. कुपोषितांची संख्या कमी झाली.

- इंद्रा मालो (आयुक्त, एकात्मिक बालविकास योजना, महाराष्ट्र राज्य)

काय केले?कुपोषण मुक्तीसाठी अचूक नियोजन व त्यासाठी यंत्रणेच्या अचूक वापरातून प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री निश्चित करून वाटचाल केली. लोकसहभाग लक्षणीय वाढवला. केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सहा वर्षांच्या आतील मुले, गरोदर स्रिया तसेच स्तनदा माता व 15 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढ स्रिया, किशोरी मुलींना पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्यसेवा, संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार व आरोग्य शिक्षण या सहा सेवा देणे सुरू केले. फेब्रुवारी 2019 च्या मासिक प्रगती अहवालानुसार राज्यात तब्बल 57,91,338 बालकांचे वजन घेण्यात आले. 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना कच्चे धान्य व किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो. अंगणवाडीत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार देण्यात येतो. यातील एकूण लाभाथर्र्ींची संख्या 61,96,020 इतकी आहे. आदिवासी प्रकल्पामध्ये अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार दिला जातो. त्यात माता व बालके असे 7,05,706 लाभार्थी आहेत. 

काय घडले?कुपोषित मुले आणि माता यांना पोषक आहार मिळू लागला. कुपोषितांची संख्या कमी झाली.  कुपोषणाचे प्रमाण 6 टक्क्यांनी (दरवर्षी 2 टक्के या प्रमाणे) कमी करणे तसेच लहान बालके, किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताशयाचे (अँनेमिया) प्रमाण 9 टक्क्यांनी कमी करणे व जन्मत: कमी वजनाचे बालकांचे प्रमाण 6 टक्क्यांनी कमी करणे ही उद्दिष्ट्ये ठरवली गेली. सर्व अंगणवाडी केंद्रांचे कामकाज कॉमन अँप्लिकेशन सॉफ्टवेअरमार्फत करण्यात येणार आहे.सर्व अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका/पर्यवेक्षिका तसेच तांत्रिक मनुष्यबळास अँण्ड्रॉइड फोन देण्यात आला आहे. जीपीएस यंत्रणेचाही वापर करण्यात येत आहे. अंगणवाड्यांमधील सर्व अभिलेख डिजिटाइज्ड् होणार आहे. एकात्मिक बालविकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. इन्क्रिमेंटल लर्निंग अँप्रोच (आयएलए) या उपक्रमांतर्गत विविध विषयावरील 21 मोड्युल्समार्फत अंगणवाडीसेविकांच्या समाजाबरोबरच्या वर्तनात बदल घडविण्याचे काम केले जात आहे. कम्युनिटी बेस्ड् इव्हेंटअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर दरमहा सामुदायिक कार्यक्रमांचे (ओटरभरण, बालभोजन) आयोजन करण्यात येत आहे. 

उपक्रम नव्हे, जनआंदोलन!कुपोषण मुक्तीसाठी नियोजन, अंमलबजावणी अन् जनसहभाग ही त्रिसूत्री आखण्यात आली आहे. याशिवाय पोषण सुधारणा या कार्यक्रमास जनआंदोलनाचे स्वरूप देण्यात आले आहे. - इंद्रा मालो

(मुलाखत आणि शब्दांकन : यदु जोशी, लोकमत, मुंबई)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा