शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

मातीशी नातं सांगणारं, शेतीभान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 07:29 IST

शहरातली कुटुंबं जेव्हा मातीच्या तुकड्यावर शेती पिकवतात...

- संजय पाठकशहरी जीवनातल्या सुखसोयींना सरावलेले अगदी मध्यमवर्गीय लोकही आजकाल अगदी सहज म्हणून हॉटेलात जातात. आपल्या आवडीच्या पदार्थांची आॅर्डर देतात. हॉटेलवाल्यानं आपल्याला नेमकं काय खायला घातलं आहे, यातलं काहीच ठाऊक नसताना जे काय भरमसाठ बिल येईल ते बिनबोभाट चुकतं करतात, शिवाय ‘इतकी उत्तम’ सर्व्हिस दिल्याबद्दल वेटरला चांगली टीप!भाजीबाजारात गेल्यानंतर मात्र भाव केल्याशिवाय आपण कोणताच भाजीपाला खरेदी करत नाही.मातीशी साºयांचंच नातं असलं तरी शहरी लोकांचं नातं तसं नावापुरतंच. शेतकºयांचं मात्र मातीशी इमान असतं. तोच त्यांचा श्वास आणि तेच त्यांचं जीवन..मातीशी शेतकºयांचं असलेलं हे नातं शहरी लोकांना कसं कळणार? त्यातले त्यांचे श्रम त्यांना कसे माहीत होणार आणि मातीत राबल्यानंतर निर्माण झालेल्या नवचेतनेचा आनंद शहरी माणूस कसा घेणार?मातीत हात घालण्याचा जिवंत अनुभव शहरातल्या अपार्टमेंटमध्ये राहाणाºया लोकांना मिळाला तर? त्यांना स्वत:च्या हातानं मातीत भाजीपाला पिकवता आला तर?..शहरी भागातील लोकांना शेतीभान यावं म्हणून नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या नीलूताई नावरेकर यांच्या कल्पनेतून एक अभिनव प्रयोग राबविण्यात येतोय.ज्या शहरी कुटुंबांना शेती करण्याचा आनंद ‘जगून’ पाहायचा होता, अशा काही कुटुंबांना काही महिन्यांसाठी भाड्याने एक गुंठा जमीन देण्यात आली. त्यात त्यांनी स्वत: राबायचं आणि स्वत:च्या घरासाठी विशुद्ध भाजीपाला पिकवायचा! अनेक कुटुंबं या प्रयोगात सहभागी झाली आणि अस्सल शेतक-यासारखी शेतात राबली. आपल्या श्रमाने भाजीपाला पिकवल्याचा आनंद त्यांना जितकं समाधान देऊन गेला त्यापेक्षा अधिक शेतक-याच्या कष्टाची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली.

शेती करणं सोपं नाही, शेतकरी किती काबाडकष्ट करतो हे आता उमगलं, असं सांगताना अनेकांना अश्रू आवरले नाहीत. आता भाजी खरेदी करताना शेतक-याशी घासाघीस करणं आम्ही सोडून दिलं असं या प्रयोगातील महिलांनी सांगणं हे शेतीविषयी, मातीविषयी निर्माण झालेलं त्याचं नवं नातं बरंच काही सांगून जातं.

शेतीतील तांत्रिक भाग बाजूला ठेवला तरी शेतक-याने पिकवलेल्या मालाची खरी किंमत किती आणि ब-याचदा त्याला इतका अत्यल्प भाव कसा, असे प्रश्न काही शहरी ग्राहकांना पडतात; परंतु या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. शहरी भागात शेतीपेक्षा कचºयाच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मोठा आहे. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, विषमुक्त भाजीपाला यांसह अनेक विषयांवर नाशिकच्या नीलूताई नार्वेकर काम करतात. ‘निर्मलग्राम केंद्र’ ही त्यांची मातृसंस्था.

नेहमी वेगवेगळ्या कल्पना राबवणा-या नीलूतार्इंनी मे २०१७ मध्ये शहरातील नागरिकांना स्वकष्टातून सेंद्रिय भाजीपाला तयार करण्याचं आवाहन केलं. प्रतिसादाची साशंकता असल्यानं त्यांनी केवळ व्हॉट्सअ‍ॅपवरून हे आवाहन काही ग्रुपमध्ये फिरवलं. काहींनी या प्रयोगात स्वारस्य दाखवलं. निर्मलग्राम केंद्र परिसरातील एकेक गुंठा जागा संबंधिताना अल्प दरात भाड्यानं देण्यात आली. कारण या प्रयोगात लागणारं बियाणं, पाणी तसंच शेतीची औजारं या सर्व गोष्टी केंद्रानंच पुरवल्या. विशेष म्हणजे, कोणी कितीही सधन असला तरी मजूर न लावता आठवड्यातून किमान तीन दिवस श्रमदान करणं बंधनकारक होतं.

शिवाय येथील छोटेखानी प्रशिक्षण केंद्रात सर्वांसाठी क्लासेसही घेण्याचं नियोजन करण्यात आलं. या उपक्रमात नऊ कुटुंबं सहभागी झाली. शाळा, बँक, वैद्यकीय व्यवसाय अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामात असणा-या कर्त्या पुरुष आणि महिलांनी सहभागी होऊन वाफे तयार करणं, पेरणीसह अनेक कामं केली. परंतु नाशिकमध्ये यंदा बेसुमार पाऊस झाला. पिकं पाण्याखाली गेली. काही भाज्यांचं नुकसान झालं. त्यामुळे त्यांना सावरता सावरता अनेकांच्या नाकीनव आलं. कधी पावसामुळे, तर कधी अन्य जबाबदाºयांमुळे काहींना आठवड्यातून दोन दिवस येणं कठीण होत असताना नीलूतार्इंच्या सूचना आणि आग्रहामुळे सारेच परत येऊ लागले आणि खरिपाचा पहिला हंगाम संपला.स्वत:च्या कष्टानं कोणी वांगी, दोडकी, गिलकी, पालेभाज्या, चवळी, भेंडी असा अनेक प्रकारचा भाजीपाला पिकवला. दसरा-दिवाळीसाठी काही प्रमाणात झेंडूची फुलंही लावली. त्याला पिवळीधम्म फुलं आल्यानंतर संबंधिताना कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं.

नीलूतार्इंनी या सायांना सांगितलं, तुमच्या घराच्या आसपास असलेला दोन पोते पालापाचोळा आपल्या शेतीसाठी घेऊन या. काहींना ते अडचणीचं वाटलं. तरीही त्यांनी तो गोळा करून आणला हा कचरा सेंद्रिय शेतीत आच्छादन म्हणून कसा वापरला जातो त्याचा प्रयोग करण्यात आला. शिवाय कल्चर फवारणी, गांडूळ खताचा वापर, जमिनीत ओल कशी टिकवायची असे अनेक प्रयोगही संबंधिताना शिकवण्यात आले.शेतीचं भान शहरी लोकांना यावं हा या प्रयोगाचा एक उद्देश, तो पूर्णपणे सफल झाल्याचं दिसतंय. हे भान साºया समाजाला आलं तर शेतकºयांच्या स्थितीची, त्यांच्या कष्टाची जाणीव होईल आणि नवनिर्मितीचा, सृजनाचा अनुभवही साºयांनाच घेता येईल...

 

‘हा’ घाम आणि ‘तो’ घामनाशिक शहराच्या हद्दीलगत असलेल्या गोवर्धन गावाजवळील जागा या उपक्रमासाठी प्रयोगशाळा ठरली. तेथे शेती करण्याच्या आठ महिन्यांच्या प्रयोगात लहान मुलेदेखील सहभागी झाली. शेतीची अनेक कामे करताना निसर्गाशी संवाद साधू लागली आणि त्यांनाही कष्टाचे मोल कळले. त्यातील आदित्य आठल्ये अवघा बारा वर्षांचा! सहा महिन्यांचा शेतीतला अनुभव सांगताना तो म्हणतो, एरवी येतो तो घाम वेगळा आणि शेतात काम करताना येतो तो घाम वेगळा.. नेहमी येणारा घाम चिकट असतो; परंतु शेतात काम करताना येणारा घाम शरीर-मनात एक वेगळाच गारवा निर्माण करतो. या प्रयोगातील सहभागी पंजाब नॅशनल बॅँकेतून निवृत्त झालेले रवींद्र अभ्यंकर, जयंत जोशी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी व वृषाली कुलकर्णी, शिक्षिका कामिनी पवार आणि वैशाली आठले, शालिनी बडवे आदि साºयांनीच शेती आणि शेतकºयांबद्दलचं आमचं भान पूर्णत: बदललं असं आवर्जुन नमूद केलं. 

(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत. sanjukpathak@gmail.com)