शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची उमेदवारी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:07 IST

पैलवानकी हीच आपली ओळख असावी, असा माझा प्रयत्न राहिला आहे. आमच्या काळात पैलवानाला मोठा मान होता. त्यामुळे पैलवानकीतील यशाचा आधार घेऊन काहींनी पुढे राजकारणाचे फड गाजविले.

हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची जीवन कहाणी--लाल माती

पैलवानकी हीच आपली ओळख असावी, असा माझा प्रयत्न राहिला आहे. आमच्या काळात पैलवानाला मोठा मान होता. त्यामुळे पैलवानकीतील यशाचा आधार घेऊन काहींनी पुढे राजकारणाचे फड गाजविले. हिंदकेसरी मारुती माने हे सांगली साखर कारखान्याचे अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांना राज्यसभेवरही घेतले होते. मारुती माने यांनी सांगली मतदारसंघातून १९९६ ला काँग्रेसचे मदन पाटील यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही लढविली होती. ‘भारतभीम’ जोतिरामदादा सावर्डेकर हेदेखील सांगलीचे नगराध्यक्ष होते. आताचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे ते आजोबा. खेळ असो अथवा चित्रपट; त्यातील लोकप्रियतेचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. माझ्याही जीवनात असे एक छोटेसे वळण आले.महाराष्ट्राच्या राजकारणात १९९० नंतर शिवसेनेची चांगलीच हवा निर्माण झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांची रोखठोक भाषा व सडेतोड भूमिका लोकांना आवडत होती. एकदा शिवसेनेला सत्ता दिल्यास काहीतरी चांगले घडेल असे लोकांना वाटत होते. साधारणत: १९९२ ची गोष्ट. मूळचे उत्तर प्रदेशमधील भदोई जिल्ह्यातील असलेले व बोरिवलीस राहणारे विधानपरिषदेचे आमदार धनश्याम दुबे यांनी माझे नाव कुर्ला मतदारसंघातून शिवसेनाप्रमुखांना सुचविले. या मतदारसंघात भय्या लोकांचे मतदार जास्त होते. मराठा समाजही जास्त होता. ‘हिंदकेसरी’ म्हणून माझी त्या मतदारसंघातही ओळख होती. त्यामुळे मलाच मैदानात उतरविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. त्यानुसार मला ठाकरे यांच्या भेटीचा निरोप आला. या संदर्भात माझ्या मनोहर जोशी व अन्य तत्सम नेत्यांसमवेत चार वेळा बैठका झाल्या. शेवटची बैठक ‘मातोश्री’वर थेट बाळासाहेब यांच्यासमवेतच ठरली. रात्री उशिरा ही बैठक झाली. त्यावेळी वेगवेगळ्या मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या भेटीगाठी व चाचपणी सुरू होती. मी ‘मातोश्री’वर गेलो. बाळासाहेब यांची भेट झाली. ज्या व्यक्तीबद्दल आजपर्यंत नुसते ऐकलेच होते, ते बाळासाहेब साक्षात समोर होते. अत्यंत करारी बाण्याचा माणूस. ‘एक घाव, दोन तुकडे’ अशा स्वभावाचा. मी त्यांना भेटून नमस्कार केला व पैशाची अडचण सांगितली. त्यावर त्यांनी ‘अडचणी सांगू नका, पैशासह सर्व मदत शिवसेना तुम्हाला करील; परंतु तुम्ही तातडीने कुर्ला मतदारसंघात येऊन राहा,’ असे सांगितले. कोल्हापूर सोडून मुंबईत येऊन राहायचे म्हटल्यावर माझी अडचण झाली. मी त्यांना भीत-भीतच म्हणालो, ‘साहेब, मुंबईत येऊन राहण्यात मला अडचण आहे. त्यापेक्षा मी येऊन-जाऊन करतो. कायमस्वरूपी मला राहता येणार नाही.’ बाळासाहेब ते बाळासाहेबच..,. ते एका सेकंदात कडाडले, ‘पैलवान, निघा तुम्ही! ’ तिथे पुन्हा कसलीही चर्चा नाही. एकदा निर्णय म्हणजे निर्णय. त्यांनी माझ्या उमेदवारीचा कंडकाच पाडला. कुर्ला-नेहरूनगर असा हा मतदारसंघ. त्यामध्ये चेंबूरचाही काही भाग येत असे. या मतदारसंघातून त्यावेळी रमाकांत मयेकर शिवसेनेकडून विजयी झाले; परंतु हिंदुत्ववादी प्रचार केल्याच्या तक्रारीवरून त्यांची आमदारकी पुढे वर्ष-दीड वर्षात गेली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेने सूर्यकांत महाडिक यांना उमेदवारी दिली; परंतु तिथे समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला. हा सगळा राजकीय खेळ पाहून माझे वस्ताद म्हणाले, ‘दीनानाथसिंह, तू वाचलास. नाही तर ना घर का, ना घाट का... अशी तुझी अवस्था झाली असती.’ मी त्यांना म्हणालो, ‘वस्ताद, यापुढे कोल्हापूर सोडण्याचा विचार पुन्हा कधीही मनात येऊ देणार नाही.’‘मातोश्री’वरून बाहेर आल्यावर टॅक्सी पकडून बोरिवलीला गेलो. मला रात्रभर झोप लागली नाही. आपण ही संधी सोडून चुकले की काय, असेही वाटू लागले; परंतु कपाळी जे लिहिलेले नाही ते तुम्हांला मिळणार नाही, अशी मनाची समजूत घालून घेतली. शिवसेनाप्रमुखांना भेटल्यावर माझ्या तोंडातून ‘कोल्हापूर सोडत नाही,’ असे वाक्य कसे निघाले, हे मलाही समजले नाही. कदाचित कोल्हापूरच्या मातीबद्दलचे प्रेम असेल किंवा शिवसेनेची आमदारकी माझ्या नशिबी नसेल; परंतु हे एक वळण व वादळ आयुष्यात येऊन गेले, एवढे मात्र नक्की...! 

शब्दांकन : विश्वास पाटील ---लाल माती