शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सांगलीचे ‘सिंचन’ अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:04 IST

कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, अभयारण्ये, खंबाटकी घाटातील अत्याधुनिक बोगदा, सांगली जिल्ह्यातील

ठळक मुद्देपुणे-मिरज-हुबळी, सांगली-कोल्हापूर या रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण, विद्युतीकरण रेंगाळले आहे.

- श्रीनिवास नागेकोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, अभयारण्ये, खंबाटकी घाटातील अत्याधुनिक बोगदा, सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना, ड्रायपोर्ट, रस्ते विकास, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर-कोकण रेल्वे, पंचगंगा प्रदूषणमुक्त, विमानतळाचा विकास या प्रश्नांची आव्हाने घेऊनच नवनिर्वाचित खासदारांनी संसदेत प्रवेश करावा. 

पस्तीस वर्षांपूर्वी सुरुवात होऊनही सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना आजही अपूर्णच आहेत. आतापर्यंत या चारही योजनांवर ५३१८ कोटी ५६ लाख रुपये खर्च झाले असले, तरी केवळ ३५ हजार हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळाले आहे. उर्वरित दोन लाख हेक्टर जमीन पाण्यापासून वंचित आहे.ताकारी आणि म्हैसाळ योजनांचे भूमिपूजन २० मे १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्यावेळी ८३ कोटी ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानंतर ७ मे १९९७ रोजी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने या योजनेच्या सुधारित प्रस्तावास पुन्हा मान्यता दिली. तेव्हा या योजनेचा खर्च ४०२ कोटी ७ लाख रुपयांवर जाऊन पोहोचला होता.

गेल्या बावीस वर्षांत या खर्चात वाढ होऊन सुधारित खर्चाचा आकडा ४९५९ कोटी ९१ लाखांपर्यंत पोहोचला आहे. टेंभू आणि वाकुर्डे योजनांचीही हीच अवस्था आहे. सध्या या सर्व सिंचन योजना ३५ टक्के सुरू आहेत. मुख्य कालव्याची ८० टक्के कामे झाली आहेत. उर्वरित कामे अपूर्ण आहेत. भविष्यात सिंचन योजनांचे पाणी बंदिस्त जलवाहिन्यांद्वारे देण्याचे प्रयोजन आहे.महाकाय टेंभू योजनाटेंभूचे भूमिपूजन १९९५ मध्ये झाले. त्यावेळी १,४१६ कोटी ५९ लाख खर्च अपेक्षित होता. गेल्या २५ वर्षांत योजनेचा खर्च ४,०८१ कोटींपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत २३४८ कोटी ८४ लाख खर्च झाला असून, १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.तीन महामार्ग, रेल्वेमार्ग, पण...जिल्ह्यातून आतापर्यंत एकच राष्टÑीय महामार्ग जात होता. आता मात्र गुहागर-विजापूर आणि नागपूर-रत्नागिरी या महामार्गांचे काम सुरू झाले आहे. देशातील सर्वांत महत्त्वाचा पुणे-बंगलोर हा राष्टÑीय महामार्ग जिल्ह्यातून जात असला, तरी त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी वापर करून घेण्यात यश आलेले नाही. सांगली-मिरज शहरांतून रेल्वेने दळणवळणाची सुविधा आहे, मात्र तिचाही विकास झालेला नाही. पुणे-मिरज-हुबळी, सांगली-कोल्हापूर या रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण, विद्युतीकरण रेंगाळले आहे.ड्रायपोर्ट लवकर व्हावे!खा. संजयकाका पाटील यांनी रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्ट उभारणीची घोषणा केली आहे. कृषी मालाच्या निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उपयुक्त ठरणार आहे. ते रेल्वेमार्ग, रस्ते आणि सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. मात्र प्रत्यक्षात हे काम सुरू झालेले नाही.योजना मंजुरी मूळ किंमत सुधारित खर्च आतापर्यंत खर्चटेंभू १९९५ १४१६.५९ कोटी ४०८१.९४ कोटी २३४८.८४ कोटीवाकुर्डे १९९८ १०९.६८ कोटी ३३२ कोटी १८३.१५ कोटीताकारी- १९८२ १९८२.८१ कोटी ४९५९.९१ कोटी २७८६.७२ कोटीम्हैसाळ

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक