शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सांगलीचे ‘सिंचन’ अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:04 IST

कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, अभयारण्ये, खंबाटकी घाटातील अत्याधुनिक बोगदा, सांगली जिल्ह्यातील

ठळक मुद्देपुणे-मिरज-हुबळी, सांगली-कोल्हापूर या रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण, विद्युतीकरण रेंगाळले आहे.

- श्रीनिवास नागेकोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, अभयारण्ये, खंबाटकी घाटातील अत्याधुनिक बोगदा, सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना, ड्रायपोर्ट, रस्ते विकास, तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर-कोकण रेल्वे, पंचगंगा प्रदूषणमुक्त, विमानतळाचा विकास या प्रश्नांची आव्हाने घेऊनच नवनिर्वाचित खासदारांनी संसदेत प्रवेश करावा. 

पस्तीस वर्षांपूर्वी सुरुवात होऊनही सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना आजही अपूर्णच आहेत. आतापर्यंत या चारही योजनांवर ५३१८ कोटी ५६ लाख रुपये खर्च झाले असले, तरी केवळ ३५ हजार हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळाले आहे. उर्वरित दोन लाख हेक्टर जमीन पाण्यापासून वंचित आहे.ताकारी आणि म्हैसाळ योजनांचे भूमिपूजन २० मे १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्यावेळी ८३ कोटी ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यानंतर ७ मे १९९७ रोजी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने या योजनेच्या सुधारित प्रस्तावास पुन्हा मान्यता दिली. तेव्हा या योजनेचा खर्च ४०२ कोटी ७ लाख रुपयांवर जाऊन पोहोचला होता.

गेल्या बावीस वर्षांत या खर्चात वाढ होऊन सुधारित खर्चाचा आकडा ४९५९ कोटी ९१ लाखांपर्यंत पोहोचला आहे. टेंभू आणि वाकुर्डे योजनांचीही हीच अवस्था आहे. सध्या या सर्व सिंचन योजना ३५ टक्के सुरू आहेत. मुख्य कालव्याची ८० टक्के कामे झाली आहेत. उर्वरित कामे अपूर्ण आहेत. भविष्यात सिंचन योजनांचे पाणी बंदिस्त जलवाहिन्यांद्वारे देण्याचे प्रयोजन आहे.महाकाय टेंभू योजनाटेंभूचे भूमिपूजन १९९५ मध्ये झाले. त्यावेळी १,४१६ कोटी ५९ लाख खर्च अपेक्षित होता. गेल्या २५ वर्षांत योजनेचा खर्च ४,०८१ कोटींपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत २३४८ कोटी ८४ लाख खर्च झाला असून, १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.तीन महामार्ग, रेल्वेमार्ग, पण...जिल्ह्यातून आतापर्यंत एकच राष्टÑीय महामार्ग जात होता. आता मात्र गुहागर-विजापूर आणि नागपूर-रत्नागिरी या महामार्गांचे काम सुरू झाले आहे. देशातील सर्वांत महत्त्वाचा पुणे-बंगलोर हा राष्टÑीय महामार्ग जिल्ह्यातून जात असला, तरी त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी वापर करून घेण्यात यश आलेले नाही. सांगली-मिरज शहरांतून रेल्वेने दळणवळणाची सुविधा आहे, मात्र तिचाही विकास झालेला नाही. पुणे-मिरज-हुबळी, सांगली-कोल्हापूर या रेल्वेमार्गांचे दुपदरीकरण, विद्युतीकरण रेंगाळले आहे.ड्रायपोर्ट लवकर व्हावे!खा. संजयकाका पाटील यांनी रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्ट उभारणीची घोषणा केली आहे. कृषी मालाच्या निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उपयुक्त ठरणार आहे. ते रेल्वेमार्ग, रस्ते आणि सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. मात्र प्रत्यक्षात हे काम सुरू झालेले नाही.योजना मंजुरी मूळ किंमत सुधारित खर्च आतापर्यंत खर्चटेंभू १९९५ १४१६.५९ कोटी ४०८१.९४ कोटी २३४८.८४ कोटीवाकुर्डे १९९८ १०९.६८ कोटी ३३२ कोटी १८३.१५ कोटीताकारी- १९८२ १९८२.८१ कोटी ४९५९.९१ कोटी २७८६.७२ कोटीम्हैसाळ

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक