शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

नाते सुशोभित करायला हवे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 07:00 IST

टीव्ही सीरियलप्रमाणे नातलगांमध्येही शह-काटशहचे खेळ दिसून येत आहे. एकूण काय तर मोठं कुटुंब आणि नातीगोती म्हणजे ‘दर्द का रिश्ता’ असतो की काय ? असा नव्या पिढीचा समज होऊन बसला आहे.

- सत्येंद्र राठी-  ‘एकत्र या, एकत्र राहा, संयुक्त कुटुंबाचे फायदेच आहेत.’ कुटुंब व्यवस्थेची भलामण करणारी अशी वडीलकीची वाक्यं कानावर येत असतातच. पण आजच्या आपल्या राहणीमानामध्ये हे कितपत सयुक्तिक आहे, याबद्दलच खरी साशंकता आहे. सध्या तर संयुक्तच काय तर विभक्त परिवार या  व्यवस्थेची चाकं ही खिळखिळी होऊन निखळण्याच्या मार्गावर आहेत. सगळीकडेच मुक्त, स्वच्छंद राहण्याचा सोस वाढीला लागल्याने कोणताही पाश, कशाचीही मर्यादा, काहीही बंधनं कोणालाही नको आहेत. याचे कारण म्हणजे त्यागावर केंद्रित असलेले भारतीय जीवन स्वार्थकेंद्रित होऊ लागले आहे,  किंबहुना तसे झालेही आहे. संयम आणि त्याग हे शब्द आता विस्मृतीत गेले आहेत. घरातील ज्येष्ठांना सांभाळण्यात ही ढकलाढकल होताना दिसतेय, तिथं अन्य नात्यांच्या बाबतीत न बोललेलं उत्तम! जिव्हाळा, लवचिकता, तडजोड, कुटुंबव्यवस्थेची मूळं धरून ठेवणाऱ्या भावना आता नात्यातून हद्दपार होतायत आणि त्यांची जागा चढाओढ, इर्षा, आकस आदींने व्यापली जात आहे. टीव्हीवरच्या सीरियलप्रमाणे नातेवाइकांमध्येही शह-काटशहचे खेळ दिसून येत आहे. नको त्या मंडळींचे हस्तक्षेप व त्यांच्या उफराटे सल्ले नात्यातील अंतर आणि अविश्वास वाढवत असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूण काय तर मोठं कुटुंब आणि नातीगोती म्हणजे ‘दर्द का रिश्ता’ असतो की काय? अशी समज नव्या पिढीची होऊन बसली आहे.एका लेखकाने उपरोधिक मांडणी करत देवाधिदेव महादेवाच्या कुटुंबाचा उल्लेख करत ही बाब समजाविण्याचा छान प्रयत्न केलाय तो असा, की गणपतीचे वाहन उंदराला शंकराचा भुकेला नाग खाऊ इच्छितो, तर शंकराच्या नागाला कार्तिकेयचा मोर भक्ष्य करू पाहतो. गजमुख असलेल्या गणेशाला पार्वतीचा वाहन सिंह मारण्यास उद्युक्त आहे तर शंकराच्या ललाटावरील अग्नी त्याच्याच माथ्यावरील चंद्राची असूया धरून आहे. तिकडं जटेत वाहणारी गंगा त्याच अग्नीला शमविण्यास उसळत आहे. एकूणच घरातील सर्व सदस्य खुद  मुख्त्यार, कोणी कोणाला जुमानत नाही, प्रत्येकाची वेगळी चूल.हे वाचून हसू येणं स्वाभाविक आहे, पण आपल्या सभोवार घराघरांत याहून वेगळी परिस्थिती नाही, हेही प्रांजळपणे कबूल करायला हवे. आजची एकूण समाज मानसिकता बघता एकत्र कुटुंबव्यवस्था आता कालबाह्य ठरत असल्याचे विदारक पण सत्य उभे ठाकले आहे. याला पर्याय म्हणून नात्यातील सर्व नजीकच्या मंडळींनी अंतरावर राहूनही आपसात नीट संपर्क ठेवला तर विभक्त कुटुंबाचा संयुक्तपणा जपला जाऊ शकेल. वेळोवेळी समक्ष वा फोनद्वारे संवाद साधत राहणे, दुखल्या खुपल्यावर मदत व विचारपूस करणे, ठराविक दिवशी एकत्र येणे, नात्यात आर्थिक व्यवहार न आणणे, एकमेकांच्या चहाड्या चुगल्या न करणे, अशी काही पथ्ये पाळली तर आवश्यक तेवढी जवळीक ठेवत नात्यातील सौजन्य जपता येईल, अशा संतुलित व्यवहाराने परस्परांची काळजी घेणे जिकिरीचे व त्रासदायक ठरणार नाही, असे अंतर कधी कधी नात्याला एक वेगळेच सौष्ठव प्रदान करते, मर्यादित असलेला प्रेम, जिव्हाळाही नात्यातील वीण सैल न होण्यास पूरक ठरतो. सख्ख्या, समवयीन भावांतही राहणीमान, जगण्याची पद्धत, जीवनाकडे बघण्याचे दृष्टिकोन यांच्यात मोठे अंतर असल्याने आजच्या परिस्थितीला अनुसरून नात्यांची जपणूक करायला हवी. आपल्या कामात केलेली लुडबुड कोणालाही चालत नाही, तसे केल्यास नाती खुंटतात, एका अंतरावर राहून नाते निभावणे हेच आता नात्याच्या यशस्वीपणाचे गमक झाले आहे. जवळीक साधल्याने कटुता निर्माण होत असेल तर फारकत असलेली बरी. दुसºयांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या कामांची जाण तसेच दुसºयांच्या चुकांकडे शक्य तितके दुर्लक्ष केल्याने नात्यांची बूज राखली जाऊ शकेल. गुंतागुंत न होता एकसूत्र राहणे शक्य आहे मात्र, यावर सगळ्यांनीच काम करायला हवे. ...आपले नातेसंबंध आपणच सुशोभित करायला हवे. पुरेशी मोकळीक आणि अंतर राखत केलेल्या या समांतर प्रवासातच संयुक्तपणाचे सुख सामावलेले आहे .

टॅग्स :Puneपुणे