शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विश्वाच्या अंगणी रंगली सांगलीची रंगवल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:27 IST

एखाद्या कलेचा डंका विश्वविक्रमी पुस्तकांमध्ये सातत्याने वाजत ठेवण्याचे काम मोजक्याच कलाकारांनी केले. मात्र, रांगोळीच्या विश्वात सांगलीच्या आदमअली मुजावर या रंगावलीकाराने याच रांगोळीला विश्वाच्या अंगणी

ठळक मुद्दे राज्याला आणि पर्यायाने देशाला जगाच्या पटलावर मानाचे स्थान देण्याचे काम समाधान देणारे असते.

-अविनाश कोळीएखाद्या कलेचा डंका विश्वविक्रमी पुस्तकांमध्ये सातत्याने वाजत ठेवण्याचे काम मोजक्याच कलाकारांनी केले. मात्र, रांगोळीच्या विश्वात सांगलीच्या आदमअली मुजावर या रंगावलीकाराने याच रांगोळीला विश्वाच्या अंगणी सजविताना भारतीय परंपरा, इतिहास येथील महापुरुषांच्या प्रतिमा साकारत असाच डंका वाजविण्याचे काम केले.सण, उत्सव, परंपरा, मंगलकार्य अशा अनेक शुभ गोष्टींशी नाते जोडलेल्या रांगोळीने हजारो वर्षांच्या प्रवासात अनेक जुन्या-नव्या गोष्टींना कवेत घेत, कलेच्या प्रांतात आपली मुशाफिरी कायम ठेवली. रामायण, महाभारत किंवा अनेक पुरातन ग्रंथांमध्येही या कला प्रकाराचा उल्लेख आढळतो. संस्कृतमध्ये या रांगोळी कलेस रंगवल्ली, कर्नाटकात रंगोली, गुजरातमध्ये रंगोळी, तमिळनाडूत कोलम, राजस्थानात मांडना, मध्य प्रदेशमध्ये चौकपुरना, उत्तर प्रदेशात सोनारख्खा, बंगालमध्ये अलिपना, केरळला कलम अशा प्रांतनिहाय वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. नावे वेगळी असली तरी, ही कला आणि तिच्याशी निगडित परंपरा, त्यामागील उद्देश सारखाच आहे. रांगोळी साकारणाऱ्या साहित्यामध्ये बदल होत गेले आणि आधुनिक युगात या रांगोळीने नवा आयाम प्राप्त केला. दारातील रांगोळी विश्वाच्या अंगणी नटू लागली. ही किमया करणारे अनेक कलाकार भारतात, भारताबाहेर उदयास आले. सांगलीच्या आदमअली मुजावर या रंगावलीकाराने याच रांगोळीला विश्वाच्या अंगणी सजविताना भारतीय परंपरा, इतिहास, येथील महापुरुषांच्या प्रतिमा साकारत असाच डंका वाजविण्याचे काम केले.आरग (ता. मिरज) या छोट्याशा गावातील सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून सांगलीला नवी ओळख निर्माण करून दिली. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नऊ वेळा आपली दावेदारी करणाºया मुजावर यांचा २००३ ला रांगोळीचा विश्वविक्रम नोंदला गेला. तो आजअखेर अबाधित आहे. त्यानंतर वेगवेगळ्या विक्रमांच्या नोंदी ठेवणाºया चार पुस्तकांमध्ये त्यांच्या नावे रांगोळीचे विश्वविक्रम आहेत. मनाला भावणारे रंग, त्यांच्या संगती, त्यातून उमटणारी छबी यांच्या माध्यमातून होणारा आविष्कार आनंदलहरी घेऊन डोळ्यांमधून पार होत अंगा-अंगात खळाळत राहतो.आदमअलींच्या आजवरच्या रांगोळींनी अशाच विशालकाय उधाणलेल्या आनंदलाटा अनेकांच्या मनात उत्पन्न करण्याचे काम केले. रांगोळीचा आनंद हा क्षणिक असतो. साकारलेली रांगोळी पुन्हा त्याच निर्मात्याला नंतर पुसण्याचे काम जड अंत:करणाने करावे लागते. त्यामुळे ती कला दीर्घकाळ चित्रांसारखी किंवा अन्य कलांसारखी जपून ठेवता येत नाही. मात्र, रसिकांच्या मनात अनेक वर्षे या रांगोळींच्या प्रतिमा तशाच घर करून आहेत. जमिनीवर रेखाटलेल्या रांगोळींची छबी मनात, डोळ्यांमध्ये उमटताना येथील रसिकांनी अनुभवली. केवळ विक्रमांसाठीच नव्हे, तर सामाजिक चळवळीचा भाग म्हणूनही व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, स्त्री भ्र्रूणहत्या अशा विविध सामाजिक विषयांवरील रांगोळी त्यांनी रेखाटल्या. कलेच्या प्रांतात बागडणाºया मुजावर यांच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. या वर्षावात न्हाऊन निघताना रांगोळीच्या नव्या वाटा, नव्या गोष्टींचे शोधकार्य त्यांनी कधीही थांबविले नाही. एक कलाकार म्हणून कलेला, त्या शहराला, राज्याला आणि पर्यायाने देशाला जगाच्या पटलावर मानाचे स्थान देण्याचे काम समाधान देणारे असते. मंगलमयी वातावरणनिर्मिती करणाºया शहनाईइतकीच रांगोळीही महत्त्वाची मानली जाते. आदमअली यांनी अनेक कलांची पंढरी म्हणून ज्या सांगलीने आपले नाव देशात आणि जगाच्या पटलावर नेले, त्याच सांगलीचे नाव रांगोळीच्या माध्यमातून विश्वाच्या अंगणी विविध रंगरेषांच्या छटांनी सजले आहे.(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

टॅग्स :Sangliसांगलीrangoliरांगोळी