शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी कट्टा- नावात काय आहे.....? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 06:00 IST

पुणे शहरात अनेक क्षेत्रांत उत्तम कार्य केलेल्या व्यक्तींची आठवण राहावी; म्हणून अनेक रस्त्यांना, चौकांना, पुलांना नावे दिली जातात. पण, काही नावांची स्मृती न राहिलेली बरी अशी नावे ही मतांच्या राजकारणासाठी दिली जातात.

- अंकुश काकडे-  आपल्या देशात मृत व्यक्तींची स्मृती म्हणून त्यांनी केलेल्या उत्तम कार्याचा गौरव म्हणून पुलांना, रस्त्यांना, चौकांना त्या व्यक्तींची नावे दिली जातात. नवीन पिढीला ही व्यक्ती कोण हे समजावे, त्यांचे कार्य समजावे हा, मुख्य उद्देश असतो. आपल्या पुणे शहरात तर रस्ते, चौकांना नावे तर दिली जातातच; परंतु अनेक ठिकाणी तो चौक नसतो, तिव्हाटा असतो, पण तरी त्याला नाव दिले जाते.पुणे शहरात गेली कित्येक वर्षे हे नामकरण चालू आहे. आजमितीस पुणे शहराकडे नोंद असलेली नावे ३,५०० इतकी आहेत. याशिवाय, नोंद न केलेली नावेदेखील तेवढीच असतील. अगदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तींची नावे रस्त्यांना, चौकांना दिली आहेत; पण ती नावे देत असताना त्या माणसांचे कर्तृत्व, त्यांचे योगदान याचा विचार करून त्यांचा सन्मान म्हणून त्याच योग्यतेचा रस्ता असावा, ही माफक अपेक्षा. मात्र, अनेक वेळा ती पाळली जात नाही.

१० फुटांच्या बोळाला महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीमहाराज, शाहू, फुले अशा महान व्यक्तींची नावे दिलेली आपल्या पाहण्यात येतील. अशी नावे सुचविणाऱ्यांच्या भावना निश्चितच चांगल्या असतील; पण अशा चुकीच्या ठिकाणी अशी नावे देऊन आपण त्या महान व्यक्तींचा काय सन्मान करतो? असा प्रश्न पडतो. काही नावांच्या बाबतीत तर किती रस्ते, चौकांना नाव द्यायचे? असादेखील प्रश्न पडतो. अशी नावे देताना काही वेळा राजकीय, सामाजिक, धार्मिक बाबींचा प्रश्न समोर येतो, दबाव येतो हीदेखील वस्तुस्थिती आहे. अर्थात, ही नावे देण्याचा अधिकार महापालिकेला, पर्यायाने तेथे काम करणाºया नगरसेवकांना. पूर्वी शहर छोटं होतं, सभासदसंख्या मर्यादित होती; त्यामुळे अशी नावे देण्याबाबत फारसे वाद झाल्याचे निदर्शनास येत नाही; पण गेल्या काही वर्षांत नगरसेवकांची संख्या वाढत गेली, शहर वाढत गेले. त्यामुळे अनेक रस्ते, चौक निर्माण झाले आणि अशी नावाची यादी वाढत गेली. नावे देण्याबाबत महापालिकेने काही वर्षांपासून निश्चित असे धोरण आखले आहे; पण अनेक वेळा महापालिका खात्याचा अभिप्राय डावलून नगरसेवक मंडळी अशी नावे देत असतात. अनेक ठिकाणी नाव देण्यावरून फार मोठे वाद झाले आहेत. काही ठिकाणी तर मोठा संघर्षदेखील झालेला आहे. साधारणत: पूर्वी एखादे नाव दिले असेल तर ते बदलण्यात येऊ नये, असा संकेत आहे. समंजस सभासद हा संकेत पाळतात; पण काही वेळा स्वत:च्या हट्टापायी हे संकेतदेखील मोडण्यात माननीय मागे राहत नाहीत. हल्ली एक गोष्ट अनेक वेळा लक्षात येऊ लागलीय, आपण नगरसेवक झालो, की ज्या वॉर्डातून निवडून आलोय तो भाग माझ्या मालकीचा, असा (गैर)समज माननीय करून घेतात आणि मग काय! आपल्या कुटुंबीयांतील व्यक्तीचे नाव देण्याचा आग्रह, हट्ट धरून बसतात. (त्या व्यक्तीने खरोखर सामाजिक किंवा विशेष कार्य केले असेल तर नाव देण्यास कुणाचीच हरकत असण्याचे कारण नाही.) पण, केवळ आपल्या कुटुंबातील आहे, हाच एकमात्र निकष त्याला असतो. मग तेथील नागरिकांचे मत काय आहे, त्यांची संमती आहे का, याचा थोडादेखील विचार केला जात नाही.अशी नावे देण्यावरून काही वेळा जातीय तणावदेखील निर्माण झाला आहे. अशी अनेक उदाहरणे पुणे शहरात घडली आहेत. अर्थात, ही नावे देत असताना एकदा महापालिकेने तेथे नाव दिले तर सरकारी कागदोपत्री त्याची नोंद केली जाते; पण प्रत्यक्षात त्या रस्त्याला, चौकाला प्रचलित नाव दुसरेच असते. नागरिक जुन्याच नावाने त्याची ओळख कायम ठेवतात. काही ठिकाणी तो रस्ता किंवा चौक नामांकित व्यक्ती, संस्था यांचे नाव दिले गेले आहे; पण त्याची आठवण कुणालाच राहत नाही. कळत-नकळतपणे आपण अंगवळणी पडलेल्या नावाचाच उल्लेख करतो. आता हेच पाहा ना. डेक्कन जिमखाना येथून शेतकी कॉलेजकडे जाणाºया रस्त्याला ‘कै. नामदार गोपाळ कृष्ण गोखले मार्ग’ असे नाव आहे; पण आजही तो रस्ता ‘फर्ग्युसन कॉलेज रोड’ या नावानेच ओळखला जातो. तर, तेथेच असलेल्या मोठ्या चौकाला ‘गोपाळ कृष्ण गोखले चौक’ हे नाव आहे; पण आजही तेथे प्रख्यात असलेल्या जुन्या गुडलक हॉटेलवरून त्या चौकाची ओळख ‘गुडलक चौक’ अशीच आहे. हीच परिस्थिती स्वारगेट चौकात. खरे म्हटले तर देशभक्त केशवराव जेधे यांचे नाव दिले आहे; पण वर्षानुवर्षे तेथे स्वारगेट पोलीस चौकी आहे. त्यामुळे आजही हा चौक ‘स्वारगेट चौक’ म्हणून ओळखला जातो. टिळक रोडवर असलेल्या ‘पुरम चौका’ची ओळख आजही ‘अभिनव कॉलेज चौक’ अशीच पुणेकरांना आहे. आता हेच पाहा ना, संचेती हॉस्पिटल चौकातून- खरे तर त्या चौकाचे नाव आहे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस चौक’- औंधकडे जाणाºया रस्त्याला पुणे विद्यापीठ रस्ता हे नाव आहे, हे किती जणांना ठाऊक आहे? आपण सगळे जण त्या रस्त्याला ‘गणेश खिंड रस्ता’ म्हणूनच आजही ओळखतो. पुणे शहरात काही चौकांना, रस्त्याला नकळत तेथील वास्तू, कार्यालय याचे महत्त्व म्हणून नाव प्रचलित झाले आहे. आता हेच पाहा ना, ‘बेलबाग चौक’ कुठं आहे? असं तुम्ही कुणाला विचारलं तर त्या चौकात गेली अनेक वर्षे राहणाऱ्या  पुणेकराला ते सांगता येणार नाही; पण ‘सिटी पोस्ट चौक’ कुठे आहे? असे विचारले तर तो क्षणात सांगेल कुठे आहे ते. तेथे वर्षानुवर्षे असलेल्या पोस्ट ऑफिसमुळे हे नाव प्रचलित झाले आहे. वडारवाडीजवळील ‘दीप बंगला चौका’ची महापालिकेत ‘कै. चिं. वि. जोग चौक’ अशी नोंद आहे, हे कुणालाच माहीत नाही.    (पूर्वार्ध)

(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक  कार्यकर्ते आहेत.) 

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमत