शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पालकांची अपेक्षा, बालकांवर ओझं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:19 IST

प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही

- डॉ. अश्विनी पाटील -

प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही आलेच पाहिजे. चांगले मार्क्स मिळवावेत, खेळात प्रावीण्य मिळवावे, विविध विषयांवर वाचन करावे, निदान रोज घरी येणारी वर्तमानपत्रे वाचावीत, एखादा छंद जोपासावा, क्लासला जावे, व्यायाम करावा, मन:शांतीसाठी हरिपाठ म्हणावा, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे, टी. व्ही.वरील बातम्या बघाव्यात, समाजात कसे वागावे, याचे नियम जाणून घ्यावेत.

अशा एक ना धड अनेक अपेक्षांचे ओझे बालकावर लादत असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून उठता-बसता टोकतही असतात. हे ओझं खरंतर मूल जन्माला आल्यापासून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष झेलत आलेली असतातच. प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे आणि पालकांच्या अपेक्षेप्रमाणे करणे मुलांना शक्य नाही. मग, या ओझ्याखाली कोवळं मनं आपली स्वप्ने, आवडी-निवडींना मुरड घालतात. यामुळे मौलिक व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला खीळ बसते.

पालकांनी अपेक्षांची भली मोठी यादी करताना मुलांच्या मानसिकतेचा, बुद्धिमत्तेचा आणि क्षमतांचा विचार करणे काळाची गरज आहे. मुलांनी अपडेट राहावे, त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान असावे, समाजात या स्पर्धेत टिकून राहावे, अशी अपेक्षा असणं हे पालकांच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे. त्यात चूक असे काहीच नाही; पण मुलांच्या मनावर आपल्या वागण्याने काही परिणाम तर होणार नाही ना, याचेही चिंतन करणे आवश्यक आहे. काही कुटुंबांत नकळतपणे चुकीच्या शब्दांचा उल्लेख केला जातो. उदा. - तुझा काही उपयोग नाही, तुला काही कळत नाही, तुझ्यामुळे लोक आम्हाला नावे ठेवतात, तू आमची मान खाली घालशील यासारख्या वाक्यांनी मुलांच्या मनावर आघात होतात. अशा प्रकारची मानसिक हिंसा पालक म्हणून आपल्याकडून होऊ नये यासाठी सावध राहायला हवे.

मुलांसमोर नकारार्थी वाक्यांचा पाढा वाचू नये. जर मुलांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, असे वाटत असेल तर तुम्हीही त्यांच्या कृतींमध्ये सहभागी व्हायला हवे. प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी आहे. व्यक्तिभिन्नतेपायी कोण डॉक्टर होईल, कोण इंजिनिअर, कोणी उत्तम व्यावसायिक होईल, कोणी संगीतकार. जो तो आपल्या क्षमतेनुसार घडत जाईल.अमेरिकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. हावर्ड गार्डनर यांनी मुलांच्या बुद्धिमत्तेविषयी ‘मल्टिपल इंटिलिजन्स’ हा महत्त्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते, बुद्धिमत्तेला अनेक बाजू आहेत. प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता वेगळी आहे. 

एखादी व्यक्ती चांगला गायक असेल, तर एखादा अवघडात अवघड गणित चटकन सोडविणारा असेल. एकूणच काय तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते.गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहे.

१) भाषिक बुद्धिमत्ता,२) गणितीय बुद्धिमत्ता,३) संगीतविषयक बुद्धिमत्ता, ४) त्रिमित्रीय बुद्धिमत्ता, ५) आंगिक गतिसंवेदन कौशल्य विषयक बुद्धिमत्ता, ६) निसर्गविषयक बुद्धिमत्ता, ७) आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि ८) व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता.

गार्डनरचा हा बुद्धिमत्तेचा सिद्धांत व्यक्ती विविध परिस्थितीत जी कौशल्ये दाखविते त्यावर आधारित आहे. मुलांच्या बुद्धिमत्तेचे मापनासाठी व आवड जाणून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. 

पालकांनीही मुलांच्या आवडी-निवडीचा विचार करून शैक्षणिक समुपदेशकाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. मुलांना स्पेस द्यावा. आपल्या मनात मुलांविषयी काय भावना आहेत. या स्पष्टपणे बोलाव्यात.त्यांना निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे. त्यामुळे मुलांच्या मनातही आपल्या मतांचा घरात विचार होतोय ही भावनादृढ होईल.

 

(लेखिका मानसशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ आहेत.)

 

टॅग्स :Educationशिक्षण