शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची अपेक्षा, बालकांवर ओझं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:19 IST

प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही

- डॉ. अश्विनी पाटील -

प्रत्येक आई-बाबांचे मुलांच्या बाबतीत दोन प्रकारचे समज असतात. एक म्हणजे मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच आहे आणि दुसरे म्हणजे अकाली प्रौढत्व आल्याचे भासवतात. आजच्या पालकवर्गाचा (गैर) समज आहे की, हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे मुलाला सर्व काही आलेच पाहिजे. चांगले मार्क्स मिळवावेत, खेळात प्रावीण्य मिळवावे, विविध विषयांवर वाचन करावे, निदान रोज घरी येणारी वर्तमानपत्रे वाचावीत, एखादा छंद जोपासावा, क्लासला जावे, व्यायाम करावा, मन:शांतीसाठी हरिपाठ म्हणावा, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे, टी. व्ही.वरील बातम्या बघाव्यात, समाजात कसे वागावे, याचे नियम जाणून घ्यावेत.

अशा एक ना धड अनेक अपेक्षांचे ओझे बालकावर लादत असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून उठता-बसता टोकतही असतात. हे ओझं खरंतर मूल जन्माला आल्यापासून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष झेलत आलेली असतातच. प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे आणि पालकांच्या अपेक्षेप्रमाणे करणे मुलांना शक्य नाही. मग, या ओझ्याखाली कोवळं मनं आपली स्वप्ने, आवडी-निवडींना मुरड घालतात. यामुळे मौलिक व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला खीळ बसते.

पालकांनी अपेक्षांची भली मोठी यादी करताना मुलांच्या मानसिकतेचा, बुद्धिमत्तेचा आणि क्षमतांचा विचार करणे काळाची गरज आहे. मुलांनी अपडेट राहावे, त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान असावे, समाजात या स्पर्धेत टिकून राहावे, अशी अपेक्षा असणं हे पालकांच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे. त्यात चूक असे काहीच नाही; पण मुलांच्या मनावर आपल्या वागण्याने काही परिणाम तर होणार नाही ना, याचेही चिंतन करणे आवश्यक आहे. काही कुटुंबांत नकळतपणे चुकीच्या शब्दांचा उल्लेख केला जातो. उदा. - तुझा काही उपयोग नाही, तुला काही कळत नाही, तुझ्यामुळे लोक आम्हाला नावे ठेवतात, तू आमची मान खाली घालशील यासारख्या वाक्यांनी मुलांच्या मनावर आघात होतात. अशा प्रकारची मानसिक हिंसा पालक म्हणून आपल्याकडून होऊ नये यासाठी सावध राहायला हवे.

मुलांसमोर नकारार्थी वाक्यांचा पाढा वाचू नये. जर मुलांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, असे वाटत असेल तर तुम्हीही त्यांच्या कृतींमध्ये सहभागी व्हायला हवे. प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी आहे. व्यक्तिभिन्नतेपायी कोण डॉक्टर होईल, कोण इंजिनिअर, कोणी उत्तम व्यावसायिक होईल, कोणी संगीतकार. जो तो आपल्या क्षमतेनुसार घडत जाईल.अमेरिकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. हावर्ड गार्डनर यांनी मुलांच्या बुद्धिमत्तेविषयी ‘मल्टिपल इंटिलिजन्स’ हा महत्त्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते, बुद्धिमत्तेला अनेक बाजू आहेत. प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता वेगळी आहे. 

एखादी व्यक्ती चांगला गायक असेल, तर एखादा अवघडात अवघड गणित चटकन सोडविणारा असेल. एकूणच काय तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते.गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहे.

१) भाषिक बुद्धिमत्ता,२) गणितीय बुद्धिमत्ता,३) संगीतविषयक बुद्धिमत्ता, ४) त्रिमित्रीय बुद्धिमत्ता, ५) आंगिक गतिसंवेदन कौशल्य विषयक बुद्धिमत्ता, ६) निसर्गविषयक बुद्धिमत्ता, ७) आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि ८) व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता.

गार्डनरचा हा बुद्धिमत्तेचा सिद्धांत व्यक्ती विविध परिस्थितीत जी कौशल्ये दाखविते त्यावर आधारित आहे. मुलांच्या बुद्धिमत्तेचे मापनासाठी व आवड जाणून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. 

पालकांनीही मुलांच्या आवडी-निवडीचा विचार करून शैक्षणिक समुपदेशकाशी चर्चा करून निर्णय घ्यावा. मुलांना स्पेस द्यावा. आपल्या मनात मुलांविषयी काय भावना आहेत. या स्पष्टपणे बोलाव्यात.त्यांना निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावे. त्यामुळे मुलांच्या मनातही आपल्या मतांचा घरात विचार होतोय ही भावनादृढ होईल.

 

(लेखिका मानसशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ आहेत.)

 

टॅग्स :Educationशिक्षण