शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बाबासाहेब व म. गांधींच्या मानवी मूल्यांच्या समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 06:05 IST

गांधीच आपणाला समजावून घेऊ शकतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनाही आधुनिक भारत घडवायचा होता. ज्या भारतात गरिबातील गरीब माणसाला हा देश आपला वाटेल. ज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ वर्ग नसेल..

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त...

- बी.व्ही. जोंधळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी या दोन महामानवांत अस्पृश्यतेच्या प्रश्नावरून घनघोर वैचारिक संघर्ष झाला हे खरे; पण असा वैचारिक संघर्ष करताना या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांविषयी मनात द्वेष बाळगला नाही, हे विशेष! बाबासाहेब व म. गांधी हे दोघेही आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, या वादात न अडकता, दोन्ही सुधारणा एकत्रच झाल्या पाहिजेत, असे सांगत होते. अर्थात, तरीही बाबासाहेबांचे प्रथम प्राधान्य सामाजिक सुधारणांनाच होते. असे असूनही या दोन महापुरुषांत संघर्ष झडला तो का? तर बाबासाहेबांनी झगडून मिळविलेल्या स्वतंत्र मतदारसंघास म. गांधींनी प्राणांतिक उपोषण करून केलेल्या विरोधामुळे. अस्पृश्य हे हिंदू समाजाचाच एक भाग असल्यामुळे हिंदू समाजात फूट पडून अस्पृश्य हे अस्पृश्यच राहू नयेत, म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नये, अशी गांधींची भूमिका होती. दुसरे असे की, म. गांधींचा प्रारंभीच्या काळी वर्णव्यवस्थेवर विश्वास होता. गांधीजी पिढीजात व्यवस्थेचेही समर्थन करीत होते. बाबासाहेबांनी यासंदर्भात गांधीजींना पत्र लिहून त्यांच्या असे लक्षात आणून दिले की, ‘महात्मा जन्माने वैश्य आहेत; पण त्यांच्या पूर्वजांनी ब्राह्मणांचा व्यवसाय असलेल्या मंत्रिपदासाठी आपल्या पिढीजात व्यवसायाचा त्याग केला आहे. गांधीजींनी हाती तराजू धरण्याऐवजी वकिलीपेशा स्वीकारला. त्यांच्या लहान मुलाने वैश्य म्हणून जन्म घेऊन ब्राह्मण मुलीशी विवाह केला. काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले, असा प्रश्न विचारतानाच काँग्रेसचा सभासद होण्यासाठी गांधींनी खादीची वगैरे जशी अट घातली, तशी अस्पृश्यता निवारणासाठी एखाद्या अस्पृश्य विद्यार्थ्याला घरी ठेवीन वा त्याला घरी जेवायला बोलवीन वा घरगुती कामासाठी एखादी अस्पृश्य वर्गातील महिलेला काम देईन अशी अट का? घातली नाही, असाही प्रश्न बाबासाहेबांनी गांधींना केला होता.

म. गांधींच्या ‘हरिजन’ साप्ताहिकाच्या पहिल्या अंकासाठी पाठविलेल्या संदेशात बाबासाहेबांनी लिहिले होते, ‘भारतातील बहिष्कृत वर्ग ही जातीसंस्थेची निर्मिती असून, जोपर्यंत या देशात जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत बहिष्कृतवर्गही असेल. या बहिष्कृत वर्गाला मुक्त करावयाचे, तर हिंदू धर्मातील वाईट चालीरीती धुऊन त्यांंना शुद्ध केल्याखेरीज हिंदू धर्माला वाचविता येणार नाही.’ बाबासाहेबांच्या या संदेशाने गांधीजींच्या वर्णाश्रम धर्मावरच घाव घातला. गांधीजींच्या महात्मेपणावर टीका करताना मला मातृभूमी नाही, असे सांगताना राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी राष्ट्र निर्माण व्हावे लागते आणि माणसाला माणुसकीची वागणूक मिळावी लागते, हेच बाबासाहेब गांधीजींना बजावून सांगत होते. बाबासाहेबांच्या अशा घणाघाती टीकेमुळे गांधी अंतर्मुख होत गेले आणि सुताराच्या मुलाने सुतारच व्हावे म्हणणारे गांधी स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रपती सफाई कामगाराचा मुलगा व्हावा आणि आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करताना आपण त्याच विवाहांना उपस्थित राहू की, वधू-वरापैकी एक जण हरिजन असेल, असे बोलू लागले. अर्थात, ‘हरिजन’ या शब्दावरही बाबासाहेबांनी आक्षेप घेतला. आम्ही हरीची लेकरे आहोत, तर तुम्ही काय दानवाची लेकरे आहात काय, असा जो प्रश्न त्यांनी केला होता, तो रास्तच होता.

येरवडा कारागृहात म. गांधीजींशी झालेल्या भेटीत बाबासाहेबांनी हिंदू मन विवेकाने वागत नाही. आम्हाला मंदिर प्रवेश का नाही, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा गांधींनी मंदिर प्रवेशाला आपण प्राधान्य देतो, असे म्हटले होते. गांधीजींच्या प्रेरणेने केंद्रीय विधिमंडळात मंदिर प्रवेशाचे विधेयक मांडण्यात आले होते; परंतु या विधेयकाला पुजाऱ्यांचा व सनातनी हिंदूंचा विरोध होता.

गांधीच आपणाला समजावून घेऊ शकतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनाही आधुनिक भारत घडवायचा होता. ज्या भारतात गरिबातील गरीब माणसाला हा देश आपला वाटेल. ज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ वर्ग नसेल. अस्पृश्यता, धर्मांधता व जातीयतेला स्थान नसेल. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव नि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची मूल्ये रुजलेली असतील. या पार्श्वभूमीवर विचारवंत, बुद्धिवाद्यांनी पुरोगामी राजकारण्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी-आंबेडकरांची मानवी मूल्ये समाजात रुजविण्याचे असिधारा व्रत अंगीकारणे हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल.

(लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)