शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

LMOTY 2020: देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केला, म्हणून...; नवाब मलिकांनी सांगितले सत्ताकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:17 IST

Lokmat Maharashtrian of the year award 2020: आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची प्रमुख भूमिका आहे. सरकार आपली कारकीर्द चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल असा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना पक्का विश्वास आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांचे लोकमत कौतुक करत आहे हे स्तुत्य आहे. अभिनंदनास्पद आहे, अशा भावना व्यक्त करतानाच महाविकास आघाडीचे सरकार सहज पाच वर्षं पूर्ण करेल, असा विश्वास या सरकारमधील मंत्र्यांनी व्यक्त केला. आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आमची प्रमुख भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि परिवहन मंत्री अनिल परब हे तिघेही बोलत होते.

मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होऊ शकतो !आमचे सरकार तीन पक्षांचे बनले असून, ते मजबुतीने चालावे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. आम्ही शिवसेनेसोबत काम करत आहोत त्यास वर्ष झाले, कुठेच अडचण आली नाही. आम्ही चर्चेतून मार्ग काढत आहोत. आमचे सरकार चांगलेच चालत आहे. मात्र विरोधकांना जास्तच घाई झाली असून, ते अस्वस्थ आहेत. चालू वर्षी निधीची कमतरता आहे. तुटवडा अनुभवास येत आहे. हा कोविडचा परिणाम आहे. आम्ही पायाभूत सेवासुविधांवर भर देत आहोत. रोजगारनिर्मितीवर भर देत आहोत. कोरोनामुळे वर्षभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती महाराष्ट्राने पाहिली नव्हती. पैशांची चणचण आहे आणि हे मान्य करावेच लागेल. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पहिल्या तीन दिवसांत ज्यांनी विरोध केला त्यांनी आपले म्हणणे मांडले. मात्र राज्याच्या अधिकारांना बाधा येत नाही, अशी स्वागताची भूमिका ॲटर्नी जनरल यांनी मांडली आहे. सात दिवस सुनावणी चालणार आहे. जय्यत तयारी सुरु आहे.  आरक्षणाचा लढा यशस्वी होऊ शकतो.- अशोक चव्हाण

सरकार पाच वर्षे चालणार!आमच्या सरकारमध्ये एकवाक्यता आहे. अधिवेशनाचे काम करताना तिन्ही पक्षांच्या बैठका होत होत्या. आम्ही कामाचे नियोजन करत होतो. सचिन वाझे प्रकरणातही आमच्यात एकवाक्यता आहे. शिवसेना अधिवेशनात कधीही एकटी पडली नव्हती. मात्र विरोधकांना वातावरणनिर्मिती करायची आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की कागदपत्रे द्यावीत. पुरावा द्यावा. मात्र अद्याप विरोधकांनी पुरावा दिलेला नाही. बिनबुडाचे आरोप करण्याचे, लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. वावड्या उठविल्या जात आहेत. विरोधकांच्या कामाचा हा भाग आहे. त्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही; पण आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत हे देशाला माहीत आहे. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार आले आहे. पाच वर्षे हे सरकार चालणार आहे आणि पुढील २५ वर्षे विरोधकांना विचारच करावा लागणार आहे.- अनिल परब

देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केला, म्हणून...एखादा अधिकारी चुकत असेल तर कारवाई होणार. वाझे प्रकरणात चुका झाल्याने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगाफटका केल्याने हे सरकार आले. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे सरकार आले. - नवाब मलिक 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020Anil Parabअनिल परबAshok Chavanअशोक चव्हाणnawab malikनवाब मलिक